शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
4
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
5
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
6
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
7
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
8
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
9
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
10
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
11
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
12
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
13
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
14
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
15
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
16
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
17
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
18
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
19
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
20
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार

सात वर्षांनंतर कालव्याला आले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 3:41 AM

वाशी ते निवी विभाग झाला थंडगार : संघर्ष, आंदोलन आणि अथक प्रयत्नांना आले यश

रोहा : मागील सहा-सात वर्षे कालव्याला पाणी नव्हते. निवी, तळाघर, लांढर, वाशी पूर्ण विभागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला. तसेच गुरेढोरे, पशूपक्षी, झाडंझुडपं, पोल्ट्री, विविध शेतीला पाणी मिळाले नाही. अवघ्या परिसराला अक्षरश: वाळवंटाचे स्वरूप आले. बोअरवेल, विहिरी आटल्या. कालव्याला सुरळीत पाणी सोडावे अशी मागणी सातत्याने झाली. पण कालव्याच्या पाण्याकडे कोणी लोकप्रतिनिधींनी लक्षच दिले नाही. विभागात पाण्यासाठी संघर्ष आंदोलन उभे राहिले. पाण्यासाठी संघर्षाची धार अधिक प्रभावी बनली. तरीही सलग दोन वर्षे यश आले नाही. सर्वस्तरातून सुरु असलेले प्रयत्न, ग्रामस्थांच्या अथक संघर्षातून अखेर यशस्वी होवून कालव्याला अखेर पाणी आले आहे.कोलाड पाटबंधारेच्या आंबेवाडी ते निवी भुवनेश्वर कालव्याला पाणी सोडावे. संपूर्ण विभाग पुन्हा सुजलाम सुफलाम व्हावा अशी मागणी सातत्याने झाली. त्याआधी कालव्याचे काम पूर्ण होऊ द्यात, मग तुम्हाला अखंड पाणी मिळेल हे पाटबंधारे विभागाचे आश्वासन होते. याउलट कालवा दुरुस्तीच्या नावाखाली नको तिथे मोऱ्या, कालव्याला काँक्र ीटीकरण करण्यात आले. त्यानंतरही पाणी सोडले गेले नव्हते.या कालव्याच्या दुरूस्ती कामांत लाखोंचा गैरव्यवहार झाल्याचे आरोप झाले. लांढर, उडदवणे हद्दीतील काँक्र ीट पावसात अक्षरश: वाहून गेले. यातूनच ग्रामस्थांतून संताप व्यक्त झाला. सहा-सात वर्षे कालव्याला पाणी नाही. त्यामुळे वाशी, लांढर, बोरघर, तळाघर, निवी सर्वच गावांत पाण्यासाठी कायम संघर्ष राहिला. कालव्याला पाणी सोडा ही मागणी जोर धरू लागली. शेतकरी संघटना, वाशी, तळाघर, वरसे ग्रामपंचायत प्रशासन, लोकप्रतिनिधींनी पाण्यासाठी पाठपुरावा केला. अशात कालव्याला पाणी येणार नाही हे लक्षात येताच ग्रामस्थांनी सर्वांनाच धारेवर धरले आणि सर्वांच्याच प्रयत्नातून अखेर मंगळवारी निवी भुवनेश्वरपर्र्यंतच्या कालव्याला पाणी आले आहे. कालव्याला पाणी सोडण्यासाठी पाटबंधारेचे कार्य. अभियंता धनंजय गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली अभियंता श्वेता पाटील व सर्व अभियंता, कर्मचारी यांनी अथक प्रयत्न सुरू ठेवले.तब्बल महिनाभर कालव्यातील गाळ काढण्याचे काम युध्दपातळीवर सुरू होते. त्यासाठी अद्ययावत यंत्रणा सज्ज झाली. त्यात कालव्याचे पाणी पुढे सरकताच संभे, किल्ला व अनेक ठिकाणी गळती झाली. त्यावरही अधिकाºयांनी मात केली. वाशी, लांढर, तळाघर, निवी ग्रामस्थांनी संभे ग्रामस्थांशी पाण्याबाबत चर्चा केली. त्यांनीही पाण्यासाठी मार्ग मोकळा करून दिला. अखेर मंगळवारी सकाळी कालव्याचे पाणी शेवटच्या टोकातील निवी भुवनेश्वरपर्यंत आले.कालव्याला पाणी आल्याचे दिसताच सबंध विभागात आनंदोत्सव साजरा झाला. गुरेढोरे, पशूपक्षी तृप्त झाले. बालगोपाळांनी पाण्यात भिजण्याचा आनंद लुटला. पाणी आल्याने ग्रामस्थांनी आमदार, सरपंच, अधिकाºयांचे आभार मानले. शेतकरी, पोल्ट्री व्यावसायिक समाधानी झाले. आता पूर्वीसारखे कालव्याला पाणी सुरळीत सोडले जाईल असे आश्वासन मुख्य कार्य. अधिकारी धनंजय गोडसे यांनी दिले. अभियंता श्वेता पाटील व टीमच्या प्रयत्नाचे विभागात कौतुक झाले आहे.

टॅग्स :Waterपाणी