शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
6
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
7
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
8
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
9
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
10
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
12
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
13
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
14
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
15
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
16
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
17
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
18
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
19
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
20
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक

श्रीवर्धन तालुक्यात ९० टक्के मदत वाटप; ३२ कोटी ४५ लाख निधी प्राप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 12:50 AM

वादळाने तालुक्यातील घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक घरांच्या भिंती पडलेल्या आहेत, घरावरची कौले व पत्रे पूर्णपणे फुटलेली आहेत. अनेक घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत.

श्रीवर्धन : निसर्ग चक्रीवादळाने श्रीवर्धन तालुक्यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान केले. तालुक्यातील सर्वसामान्य व्यक्ती, शेतकरी, व्यापारी ते नोकरदार सर्वांनाच चक्रीवादळाचा फटका बसला आहे. अनेकांचे संसार उघड्यावर पडले, हातातील उपजीविकेचे साधन नाहीसे झाले. अशा कठीण प्रसंगी सर्वसामान्यांना सावरण्यासाठी सरकारकडून पंचनाम्यानुसार मदतनिधीचे वाटप करण्यात आले. तालुक्यात ३२ कोटी ४५ लाख रुपयांच्या मदतनिधीचे वाटप करण्यात आले आहे.वादळाने तालुक्यातील घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक घरांच्या भिंती पडलेल्या आहेत, घरावरची कौले व पत्रे पूर्णपणे फुटलेली आहेत. अनेक घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत. घरांसाठी अंशत: मदतनिधी १५ हजार रु पये देण्यात आला आहे, तसेच पूर्ण घर पडले असेल, तर दीड लाख रुपये मदतनिधी देण्यात आली आहे. तालुक्यातील १९ हजार १३३ व्यक्तींना २६ कोटी ९२ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. ज्यांच्या जनावरांचा मृत्यू झाला, अशा १०७ व्यक्तींना २३ लाख ८० हजार रुपयांचा मदतनिधी देण्यात आला आहे. श्रीवर्धन तालुक्यातील क्षतिग्रस्त १२७ दुकानदारांना १० लाख रुपयांचा मदत निधी देण्यात आला आहे, तसेच घरातील कपडे, धान्य आणि भांडी यांचे नुकसान झालेल्या ४,४८९ नागरिकांना तीन कोटी १७ लाख ६० हजार रुपये मदतनिधीची रक्कम देण्यात आलेली आहे. तालुक्यातील १९६ होड्यांच्या नुकसानीसाठी संबंधित व्यक्तींना आठ लाख ९६ हजार ६०० रुपये मदतनिधी देण्यात आलेला आहे, अशी माहिती प्राप्त झाली असून, ९० टक्के मदतनिधी वाटपाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. उर्वरित दहा टक्के काम लवकरच पूर्ण करण्यात येईल, असे तहसीलदार सचिन गोसावी यांनी सांगितले.शेतकऱ्यांना लवकर मिळणार भरपाईमदतनिधीचा पहिला टप्पा जवळपास पूर्ण होत आलेला आहे. दुसºया टप्प्यामध्ये तालुक्यातील कृषी विभागाची मदतवाटप करण्यात येणार आहे. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या नारळ-सुपारीच्या बागांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. नारळ, सुपारी, केळी आणि आंबा या पिकांना वादळाचा फटका बसला आहे.अनेक सातबारांवरती एकापेक्षा जास्त व्यक्तींची नावे असल्याने, मदतनिधी देण्यात अडचणी निर्माण होत आहेत. सातबारावरील एका व्यक्तीकडून इतर व्यक्तींची ना हरकत घेतल्यानंतर मदतनिधी वाटपाचा मार्ग मोकळा होणार आहे. तालुक्यातील २,७३६ हेक्टर क्षेत्र बाधित असल्याचे निदर्शनास येते आहे.श्रीवर्धन तालुक्यातील निसर्ग चक्रीवादळाने बाधित झालेल्या प्रत्येक घटकापर्यंत शासनाचा मदतनिधी पाठविणे हे माझे दायित्व आहे. त्यानुसार, प्रशासकीय यंत्रणा कार्यरत आहे. लवकरच पूर्ण श्रीवर्धनमधील नुकसानग्रस्तांना मदतनिधीचे वाटप करण्यात येईल.- सचिन गोसावी, तहसीलदार श्रीवर्धनवादळानंतर असंख्य अडीअडचणींना सामोरे जात, महसूल, ग्रामविकास, शिक्षक, डेटा आॅपरेटर यांनी जनतेला मदतनिधी वाटप करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. बाधित प्रत्येक व्यक्तीपर्यंत मदतनिधी पाठविला जाईल, त्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे.- अमित शेडगे, प्रांताधिकारी, श्रीवर्धनमाझ्या घराचा अंशत: मदतनिधी मला मिळालेला आहे. मात्र, नारळ-सुपारीचा मदतनिधी अद्याप मिळालेला नाही.- उदय आवळस्कर,नागरिक, श्रीवर्धनमाझे घर वादळात पडले आहे. मात्र, मला काहीच मदतनिधी मिळाला नाही.- गुलाब निगुडकर, महिला, श्रीवर्धन

टॅग्स :Raigadरायगड