शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

रायगडमध्ये दहा महिन्यांत 9 लाख 46 हजार दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 23:24 IST

ट्रिपल सीट वाहन चालविणाऱ्या ४ हजार ५८४ चालकांवर कारवाई

निखिल म्हात्रेलोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात केलेल्या संचारबंदीपासून आतापर्यंत ट्रिपल सीट वाहन चालविणाऱ्या ४ हजार ५८४ वाहन चालकांकडून मागील १० महिन्यांत ९ लाख ४६ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्या वाहन चालकांना समजही देण्यात आली आहे. तर नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी वाहतूक विभागामार्फत तालुक्याच्या मुख्य ठिकाणी फलकही लावण्यात आले आहेत.

जानेवारी ते नोव्हेंबर २०२० या दहा महिन्यांत वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करताना शालेय विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष केंद्रित करता येत आहे. अनेक विद्यार्थी आपल्या महागड्या मोटारसायकल आणि स्कूटर घेऊन शाळा, काॅलेजमध्ये येत असतात. परवाना, महत्त्वाची कागदपत्रे नसणे, ट्रिपल सीट अशा प्रकारे वाहतुकीचे नियम मोडण्याचे प्रकार विद्यार्थ्यांकडून घडत असतात. त्यामुळे नागरिकांसह महाविद्यालयीन मुलांकडून वाहतुकीच्या नियमांचे पालन व्हावे म्हणून सध्या पोलीस विभागाकडून कारवाई करण्यात येत आहे.

मागील १० महिन्यांचा ट्रिपल सीट वाहन चालविले म्हणून कारवाईचा आकडा पाहता ऑक्टोबर महिन्यात सर्वांत जास्त ३३ लाख १२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. जानेवारी महिन्यात ४७७ प्रकरणे झाली असून ९५ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

अलिबाग शहरात सर्वाधिक दंड वसूलट्रिपल सीट गाडी हाकणाऱ्यांविरोधात अलिबाग शहरात वाहतूक विभागाने सर्वाधिक कारवाई करीत दंड वसूल केला आहे. तसेच दंडात्मक कारवाई केलेल्या वाहन चालकांना समजही देण्यात आली आहे. ट्रिपल सीट वाहन चालविणाऱ्या ४ हजार ५८४ वाहन चालकांकडून दंड वसूल केला आहे.

ऑक्टोबरमध्ये १,६५६ चालकांवर कारवाई अनलाॅक ५ मध्ये सारे काही सुरळीत झाल्यावर नागरिक मोठ्या प्रमाणावर घरातून बाहेर पडले. अचानक बाहेर पडलेले नागरिक वाहतुकीचे नियमही विसरल्याने ऑक्टोबर महिन्यात १,६५६ वाहन चालकांवर कारवाई करीत त्यांच्याकडून ३ लाख ३१ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला.

फेब्रुवारी महिन्यात ४०४ प्रकरणे झाली फेब्रुवारी महिन्यात ४०४ प्रकरणे झाली असून ८० हजार ८०० रुपयांचा दंड, मार्च महिन्यात ४९२ प्रकरणे झाली असून ९८ हजार ४०० रुपयांचा दंड, एप्रिल महिन्यात १४९ प्रकरणे झाली असून २९ हजार ८०० रुपयांचा दंड, मे महिन्यात ३३४ प्रकरणे झाली असून ६६ हजार ८०० रुपयांचा दंड, जून महिन्यात ४०४ प्रकरणे झाली असून ८० हजार ८०० रुपयांचा दंड, जुलै महिन्यात २४८ प्रकरणे झाली असून ४९ हजार ६०० रुपयांचा दंड, ऑगस्ट महिन्यात २०२ प्रकरणे झाली असून ४० हजार ४०० रुपयांचा दंड, सप्टेंबर महिन्यात ३६८ प्रकरणे झाली असून ७३ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

रायगड पोलीस क्षेत्रातील वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध विषेश मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये अल्पवयीन, शालेय विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या बालकांकडून सध्या दंड वसूल करण्यात येत आहे. याबरोबरच त्या मुलांचे व त्यांच्या पालकांचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न रायगड पोलीस विभाग करीत आहेत.-  रवींद्र शिंदे, वाहतूक पोलीस निरीक्षक, रायगड जिल्हा 

टॅग्स :Policeपोलिस