शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
3
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
4
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
5
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
6
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
7
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
8
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
9
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
10
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
11
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
12
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
13
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
14
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
15
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
16
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
17
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
18
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
19
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
20
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!

महामार्गावर २०१७ मध्ये ८७८ अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 07:17 IST

गोवा महामार्ग हा सततच्या अपघातामुळे मृत्यूचा सापळा बनलेला आहे. दरवर्षी हजारो अपघात होत असून हजारो प्रवासी जखमी तर शेकडो मृत्युमुखी पडत आहेत.

- सिकंदर अनवारेदासगाव : मुंबई - गोवा महामार्ग हा सततच्या अपघातामुळे मृत्यूचा सापळा बनलेला आहे. दरवर्षी हजारो अपघात होत असून हजारो प्रवासी जखमी तर शेकडो मृत्युमुखी पडत आहेत. मावळत्या २०१७ची अपघाताची आकडेवारीमध्ये पनवेल पळस्पे ते कसाल (सिंधुदुर्ग) या ४५० कि.मी.च्या अंतरामध्ये ८७८ अपघातांची नोंद झाली आहे. या अपघातामध्ये १२८३ प्रवासी जखमी झाले असून १०३ प्रवाशांचा बळी गेला आहे. त्याचबरोबर या मार्गावरून बेदरकारपणे चालणाºया व नियमाचा उल्लंघन करणाºया वाहनांची तपासणी करत १,०१,५०४ वाहनचालकांवर कारवाई करत २,०३,४७३०० रुपये दंड वसूल केला आहे.मुंबई-गोवा महामार्ग हा कोकणवासीयांचा महत्त्वाचा महामार्ग आहे. नेहमी सुट्टीच्या काळात व शिमगा व गणपती सणाच्या काळातला महामार्ग मोठ्या प्रमाणात गजबजलेला असतो. दरवर्षी महामार्ग पोलीस, महामार्ग बांधकाम विभाग, आरटीओ यांच्याकडून अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात. वाहनचालकांना सुरक्षिततेबाबतचे धडे दिले जातात. डोळे तपासणी शिबिर घेतली जातात. मात्र, एवढे होत असताना वाहनचालकांकडून त्याचप्रमाणे सहकार्यदेखील अपेक्षित असते. महामार्गावर पडणारे खड्डे, अवघड वळण, अरुंद महामार्ग हे सर्व पाहिले तरी नेहमी वाहनचालकांच्या चुकांमुळेच अपघात घडताना दिसून येतात. २०१७मध्ये महामार्ग वाहतूक शाखेमार्फत मोठ्या प्रमाणात वाहनचालकांवर कारवाई करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे या वाहनचालकांवर ठोस कारवाई करणे गरजेचे आहे. अपघातांना रोखता येईल. अनेक वर्षांपासून या मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. या अपघातांना थांबविण्यासाठी उपाय अद्यापही कोणाकडे नाही. हे सर्व झालेल्या अपघाताची नोंदीव्यतिरिक्त महामार्गावर किरकोळ अपघातांची नोंद नाही. वाहनचालकांनी आपसामध्ये तडजोड करून मिटवली आहे.मुंबई कोकणात येणारे वाहन चालक हे नेहमी नवीन असल्याने त्यांना रस्त्याचा अनुभव नसतो. घाट विभागात अनेक सुरक्षिततेचा अभाव आहे. अपघातामध्ये तरुणांचा समावेश जास्त आहे. अरुंद रस्ता, खड्डे, महामार्गावर लावलेलं दिशा दर्शनाना फलक कमी आहेत. तर खराब अवस्थेत आहेत. साइडपट्टी नाही. पावसामध्ये रस्त्याकडेला उगवलेल्या गवतामुळे समोरील वाहनांना येणारे वाहन दिसत नाही. वळणाशेजारी असलेल्या टेकड्या व वाहनचालकांनी नियमाचे पालन करूनच वाहन चालवणे. यामुळेच महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात.- डी. के. पाटील,पोलीस निरीक्षक महामार्गवाहतूक शाखा, रत्नागिरी 

टॅग्स :Accidentअपघातnewsबातम्या