शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

महामार्गावर २०१७ मध्ये ८७८ अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 07:17 IST

गोवा महामार्ग हा सततच्या अपघातामुळे मृत्यूचा सापळा बनलेला आहे. दरवर्षी हजारो अपघात होत असून हजारो प्रवासी जखमी तर शेकडो मृत्युमुखी पडत आहेत.

- सिकंदर अनवारेदासगाव : मुंबई - गोवा महामार्ग हा सततच्या अपघातामुळे मृत्यूचा सापळा बनलेला आहे. दरवर्षी हजारो अपघात होत असून हजारो प्रवासी जखमी तर शेकडो मृत्युमुखी पडत आहेत. मावळत्या २०१७ची अपघाताची आकडेवारीमध्ये पनवेल पळस्पे ते कसाल (सिंधुदुर्ग) या ४५० कि.मी.च्या अंतरामध्ये ८७८ अपघातांची नोंद झाली आहे. या अपघातामध्ये १२८३ प्रवासी जखमी झाले असून १०३ प्रवाशांचा बळी गेला आहे. त्याचबरोबर या मार्गावरून बेदरकारपणे चालणाºया व नियमाचा उल्लंघन करणाºया वाहनांची तपासणी करत १,०१,५०४ वाहनचालकांवर कारवाई करत २,०३,४७३०० रुपये दंड वसूल केला आहे.मुंबई-गोवा महामार्ग हा कोकणवासीयांचा महत्त्वाचा महामार्ग आहे. नेहमी सुट्टीच्या काळात व शिमगा व गणपती सणाच्या काळातला महामार्ग मोठ्या प्रमाणात गजबजलेला असतो. दरवर्षी महामार्ग पोलीस, महामार्ग बांधकाम विभाग, आरटीओ यांच्याकडून अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात. वाहनचालकांना सुरक्षिततेबाबतचे धडे दिले जातात. डोळे तपासणी शिबिर घेतली जातात. मात्र, एवढे होत असताना वाहनचालकांकडून त्याचप्रमाणे सहकार्यदेखील अपेक्षित असते. महामार्गावर पडणारे खड्डे, अवघड वळण, अरुंद महामार्ग हे सर्व पाहिले तरी नेहमी वाहनचालकांच्या चुकांमुळेच अपघात घडताना दिसून येतात. २०१७मध्ये महामार्ग वाहतूक शाखेमार्फत मोठ्या प्रमाणात वाहनचालकांवर कारवाई करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे या वाहनचालकांवर ठोस कारवाई करणे गरजेचे आहे. अपघातांना रोखता येईल. अनेक वर्षांपासून या मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. या अपघातांना थांबविण्यासाठी उपाय अद्यापही कोणाकडे नाही. हे सर्व झालेल्या अपघाताची नोंदीव्यतिरिक्त महामार्गावर किरकोळ अपघातांची नोंद नाही. वाहनचालकांनी आपसामध्ये तडजोड करून मिटवली आहे.मुंबई कोकणात येणारे वाहन चालक हे नेहमी नवीन असल्याने त्यांना रस्त्याचा अनुभव नसतो. घाट विभागात अनेक सुरक्षिततेचा अभाव आहे. अपघातामध्ये तरुणांचा समावेश जास्त आहे. अरुंद रस्ता, खड्डे, महामार्गावर लावलेलं दिशा दर्शनाना फलक कमी आहेत. तर खराब अवस्थेत आहेत. साइडपट्टी नाही. पावसामध्ये रस्त्याकडेला उगवलेल्या गवतामुळे समोरील वाहनांना येणारे वाहन दिसत नाही. वळणाशेजारी असलेल्या टेकड्या व वाहनचालकांनी नियमाचे पालन करूनच वाहन चालवणे. यामुळेच महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात.- डी. के. पाटील,पोलीस निरीक्षक महामार्गवाहतूक शाखा, रत्नागिरी 

टॅग्स :Accidentअपघातnewsबातम्या