शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कोटगाव- काळाधोंडा येथील ८० शेतकऱ्यांची सिडको, रेल्वे प्रशासनाकडून फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2021 00:22 IST

Raigad News : दिवा-पनवेल-उरण रेल्वे प्रकल्पासाठी १९६२ साली दहा महिने १५ दिवसांसाठी कोटनाका-काळाधोंडा येथील ८० शेतकऱ्यांच्या नाममात्र भुईभाड्याने घेतलेल्या १२९ एकर जमिनीचा कोणत्याही प्रकारचा मोबदला न देता कब्जा करण्याचा घाट रेल्वे प्रशासनाने घातला आहे.

उरण : दिवा-पनवेल-उरण रेल्वे प्रकल्पासाठी १९६२ साली दहा महिने १५ दिवसांसाठी कोटनाका-काळाधोंडा येथील ८० शेतकऱ्यांच्या नाममात्र भुईभाड्याने घेतलेल्या १२९ एकर जमिनीचा कोणत्याही प्रकारचा मोबदला न देता कब्जा करण्याचा घाट रेल्वे प्रशासनाने घातला आहे. शासनाकडूनच होत असलेल्या फसवणुकीविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. सलग २५ दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनानंतरही शासनाकडून न्याय मिळण्यास दिरंगाई होत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी शेतकरी संघटना व कोटगाव ग्रामसुधारणा मंडळाच्या नेतृत्वाखाली प्रकल्पाचे काम बंद पाडून उच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतल्याची माहिती रविवारी संध्याकाळी आयोजित पत्रकार परिषदेतून देण्यात आली.उरण तालुक्यातील कोटगाव - काळाधोंडा येथील ८० शेतकऱ्यांची १२९ एकर जमीन दिवा-पनवेल-उरण रेल्वे प्रकल्पासाठी तात्पुरत्या स्वरूपात रेल्वे प्रशासनाने संपादन केली होती. चीन-पाकिस्तान विरोधातील युध्दाच्या पार्श्वभूमीवर ९ जुलै १९६२ साली तात्पुरत्या स्वरूपात भुईभाडे तत्वावर घेण्यात आलेल्या व वापरात आलेल्या जमिनीचे १० महिने १५ दिवसांचे भाडेही शेतकऱ्यांना २३ मे १९६३ रोजी १० रुपये भुईभाड्याप्रमाणे ३१८२ रुपये अदा करण्यात आल्याची नोंदही शासन दप्तरी आढळून आली आहे. २०१२ पर्यंत शेतकऱ्यांच्या नावे असलेल्या जमिनींच्या सातबाऱ्यावर २०१३ पासून अचानक रेल्वे प्रशासनाच्या नाव-शिक्के नोंदले गेले आहेत.त्यानंतर २०१३ पासून सिडको- रेल्वेच्या माध्यमातून रखडलेल्या नेरुळ-उरण रेल्वे प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली आहे.१८ किमीच्या लांबीच्या अंतरासाठी व्यावसायिक उरण रेल्वे स्टेशनच्या कामाला मागील दोन वर्षांपासून जोरदार सुरुवात झाली आहे.मात्र शेेेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारेे विश्वासात न घेता आणि जमिनीचा मोबदला न देता रेल्वे स्थानकाचे काम सुरू करण्यात आले आहे. यामुळे संतप्त झालेल्या प्रकल्पग्रस्तांनी कोटगाव ग्राम सुधारणा मंडळ आणि स्थानिक रेल्वे प्रकल्पग्रस्त कृती समितीच्यावतीने ८ जानेवारी २०२१ पासून काम सुरु असलेल्या रेल्वे स्टेशनाच्या जागेशेजारीच बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.दरम्यानच्या काळात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, रेल्वे, सिडकोच्या अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन शेतकऱ्यांच्या १२९ एकर जमिनी संदर्भात वस्तुस्थिती जाणून घेण्यात आली. याप्रसंगी काळाधोंडा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नवनीत भोईर, कोटगाव ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष निलेश भोईर आदी आणि महिला बहुसंख्येने उपस्थित होते. कोणत्याही प्रकारचा दिलासा नाहीयाआधी मोर्चे, आंदोलन, निदर्शने करून रेल्वे स्टेशनच्या माती भरावाचे काम बंद पाडले होते. त्यानंतरही आंदोलनकर्त्यांना शासनाकडून कोणत्याही प्रकारचा दिलासा मिळाला नाही. त्यामुळे ८ जानेवारी २०२१ पासून विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे.मात्र २५ दिवसांच्या साखळी उपोषणानंतरही सिडको-रेल्वे प्रशासनाला अद्याप तरी जाग आलेली नाही.  त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शेतकरी संघटना व कोटगाव ग्रामसुधारणा मंडळाच्या नेतृत्वाखाली उच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती रविवारी पत्रकार परिषदेतून देण्यात आली.

टॅग्स :Raigadरायगडrailwayरेल्वेcidcoसिडकोFarmerशेतकरी