शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

चार गावांत ७०० एकर शेती धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 04:23 IST

अलिबाग तालुक्यातील चरी गावातील आणि ७०० एकर भातशेतीतील पावसाचे पाणी वहिवाटीच्या मार्गावरून वाहून जाते. या मार्गावर राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स (आरसीएफ) थळ येथील खत कारखान्याकरिता रेल्वेमार्ग टाकण्यात आला असून, त्यासाठी मोठा भराव करण्यात आला आहे.

- जयंत धुळपअलिबाग - तालुक्यातील चरी गावातील आणि ७०० एकर भातशेतीतील पावसाचे पाणी वहिवाटीच्या मार्गावरून वाहून जाते. या मार्गावर राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स (आरसीएफ) थळ येथील खत कारखान्याकरिता रेल्वेमार्ग टाकण्यात आला असून, त्यासाठी मोठा भराव करण्यात आला आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाण्याचा निचरा होऊ शकत नाही. गेल्या २५ वर्षांत याबाबत कोणत्याही उपाययोजना न केल्याने ७०० एकर भातशेती व चरी, गोपचरी, कांडविरा व खोपणेखार या चार गावांतील मानवी वस्तीला धोका निर्माण झाल्याची शक्यता आहे. याबाबत लेखी निवेदन चरी गावातील शेतकरी रवींद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली चरी, गोपचरी, कांडविरा व खोपणेखार गावांतील २४ बाधित शेतकऱ्यांनी अलिबाग तहसीलदार प्रकाश संकपाळ यांना सोमवारी दिले.सरकारने या गंभीर समस्येबाबत सत्वर उपाययोजना करावी, या अपेक्षेने याच निवेदनाच्या प्रती रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, अलिबाग उप विभागीय महसूल अधिकारी सर्जेराव सोनावणे आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनाही देण्यात आल्याचे चरी गावातील शेतकरी रवींद्र पाटील यांनी सांगितले.चरी खारभूमी योजनेत ७०० एकर भातशेती आहे, त्यावरच शेतकºयांची उपजीविका चालते. याच भातशेतीला लागून चरी, गोपचरी, कांडविरा व खोपणेखार ही गावे व त्यांची शेती आहे. या गावांचे व भातशेतीतील पावसाचे पडणारे पाणी नैसर्गिकरीत्या निचरा होण्याचा मार्ग म्हणजे ‘टाशी’(नाला) आहे. गावकरी दरवर्षी सामूहिक श्रमदान करून त्यातील साचलेला गाळ काढायचे. परिणामी, पावसाळ््यात पाण्याचा निचरा सुयोग्य प्रकारे होऊन भातशेती आणि गावांना कोणत्याही प्रकारे धोका निर्माण होत नसे, असा पूर्वइतिहास या निवेदनात लक्षात आणून देण्यात आला आहे.१९८०च्या सुमारास आरसीएफ थळ रेल्वेलाइनकरिता महसुली गाव चरीमधील सलग क्षेत्राचे संपादन करताना नेमके पाणी जाण्याच्या नाल्यावर मातीचा भराव केला गेला. त्यानंतर या रेल्वेलाइनच्या दोन्ही बाजूस पाणी जाण्याकरिता पर्यायी नाला आरसीएफने खणून दिला. मात्र, त्या नाल्यातील गाळ दरवर्षी काढला जात नसल्याने ७०० एकर भातशेतीचे पाणी नैसर्गिकरीत्या निचरा होऊन वाहून जात नसल्याने भातपीक व भाजीपाला कुजतो आणि शेतकºयांची लागवड व त्यावर वर्षभर केलेली मशागत फुकट जाऊन, शेतकºयांच्या हातात काही उत्पन्न येत नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.रेल्वेलाइनलगतच्या नालेसफाईची मागणीस्थानिक पातळीवर अनेकदा ही बाब लक्षात आणून देऊनही गेल्या २५ वर्षांत या समस्येकडे कृषी खाते वा खारभूमी विकास खाते यांनी लक्ष घातले नसल्याने समस्या गंभीर झाली आहे. नैसर्गिकरीत्या पाणी वाहून जाण्याच्या पर्यायी नाल्यातील गाळ काढण्याची जबाबदारी आरसीएफ थळची असून, पावसाळ््यापूर्वी लक्ष घालून रेल्वेलाइनलगतच्या नाल्यातील गाळ उपसण्याची कार्यवाही त्यांच्याकडून करून घेऊन शेती पिकासहित वाचवावी, अशी विनंती या निवेदनात अखेरीस करण्यात आली आहे.

टॅग्स :RaigadरायगडagricultureशेतीFarmerशेतकरी