शहरं
Join us  
Trending Stories
1
वायकर मेहुणे मोबाईल वाद पेटला! आता ठाकरे गटाच्या आमदारावरही गुन्हा दाखल
2
४-४-०-३! वर्ल्ड कप इतिहासातील भारी स्पेल, Lockie Ferguson ने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, Video 
3
ओबीसी नेते एकवटू लागले! "आरक्षणाला कसा धक्का बसणार नाही हे सांगा"; मुंडे बहीण-भाऊ हाकेंच्या भेटीला
4
Ohh No! सुपर ८ लढतीपूर्वी टीम इंडियाच्या प्रमुख शिलेदाराला दुखापत, वाचा अपडेट्स 
5
Rahul Gandhi: ज्या मतदारसंघाने संकटकाळात आसरा दिला, राहुल गांधी तीच सीट सोडणार; प्रियंका गांधी वायनाड लढणार
6
T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी?
7
रिल्सच्या नादात तरुणीचा जीव गेला, रिव्हर्समध्ये कार डोंगरावरून दरीत कोसळून भीषण अपघात
8
मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...
9
"गॅरी, पाकिस्तानसोबत वेळ वाया घालवू नकोस, टीम इंडियाला कोच करण्यासाठी ये!" 
10
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
11
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
12
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
13
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
14
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
15
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
16
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
17
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
18
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
19
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
20
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह

५०० महिला शेतकरी खाडीत आंदोलन करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2018 6:38 AM

अकरा गावांतील सुमारे दोन हजार कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे. पेण तालुक्यातील माचेला-ढोंबी गावच्या खाडी किनारी असलेल्या समुद्र संरक्षक बंधाऱ्यास २०१५ मध्ये उधाणाच्या भरतीमुळे भगदाडे पडून समुद्राचे खारे पाणी २७०० एकर भातशेती जमिनीत घुसून त्या जमिनी नापीक झाल्या.

- जयंत धुळपअलिबाग - अकरा गावांतील सुमारे दोन हजार कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे. पेण तालुक्यातील माचेला-ढोंबी गावच्या खाडी किनारी असलेल्या समुद्र संरक्षक बंधाऱ्यास २०१५ मध्ये उधाणाच्या भरतीमुळे भगदाडे पडून समुद्राचे खारे पाणी २७०० एकर भातशेती जमिनीत घुसून त्या जमिनी नापीक झाल्या. अनेक चर्चा, विनंत्या, आंदोलने,उपोषणे करून देखील गेल्या तीन वर्षांत संबंधित जेएसडब्ल्यू कंपनी वा शासन यापैकी कुणीही फुटलेल्या संरक्षक बंधाºयाची दुरुस्ती केली नाही. या साºया परिस्थितीस कंटाळून अखेरचा पर्याय म्हणून, येत्या १७ एप्रिलपर्यंत फुटलेल्या संरक्षक बंधाºयांच्या दुरुस्ती कामास प्रारंभ झाला नाही, तर त्याच फुटलेल्या बंधाºयातून वाहणाºया खाडीच्या पाण्यातच ठिय्या देऊन बसून राहाण्याचा निर्णय घेतला आहे.संरक्षक फुटीने बाधित झालेल्या आनंदनगर, देवळी, जुई, खारपाले, मौजेपाले, म्हैसबाड, ढोंबी जांभेळा, चीर्बी, घात, माचेला या अकरा गावांतील महिला शेतकºयांच्या निर्णय मेळाव्याचे आयोजन गुरुवारी खारपाले गावात कष्टकरी महिला आघाडी, खारडोंगर मेहनत आघाडी, हांदेकरी महिला, जोळे ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने सुनंदा चवरकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. यावेळी पांडुरंग तुरे,मंजुळा पाटील,काराव ग्रामपंचायतीचे उपसरपंच नितीन पाटील, सदस्या प्रतिभा म्हात्रे, दर्शन पाटील, प्रतिभा कोठेकर, सुरेखा ठाकूर, अमिता ठाकूर, धा. म. पाटील, रघुनाथ माधवी आदी उपस्थित होते, अशी माहिती या शेतकरी लढ्याचे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते अरुण शिवकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.फुटलेल्या संरक्षक बंधाºयाजवळील शासकीय जमीन स.नं.९४ बाबत हरित न्यायालयात दाखल एक याचिका, कांदळवने अशी कारणे पुढे करून जेएसडब्ल्यू कंपनीने वा शासनाने बंधारा दुरुस्तीचे काम गेल्या २७ नोव्हेंबर २०१५ पासून केले नाही. परिणामी फुटलेल्या संरक्षक बंधाºयांतून या ११ गावांच्या शेतजमिनीत खाडीमधून दर अमावस्या व पौर्णिमेच्या उधाणाला खारे पाणी शिरत आहे.दोन हजारच्या वर कुटुंबांच्या उपजीविकेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाकडे शिष्टमंडळ, उपोषण, जिल्हाधिकारी, आमदार धैर्यशील पाटील यांचा पाहणी दौरा, तहसीलदार व प्रांत अधिकाºयांचा दौरा, रास्ता रोको अशी आंदोलने शांततेच्या मार्गाने केली, परंतु दुरुस्तीचे काम अद्याप सुरूझाले नसल्याने शेतकरी ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट असल्याचे सामाजिक कार्यकर्ते शिवकर यांनी सांगितले....तर जबाबदारी अधिकाºयांची१७ एप्रिलपर्यंत फुटलेल्या संरक्षक बंधाºयाच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले नाही तर फुटलेल्या बंधाºयातून वाहणाºया खाडीच्या पाण्यात आम्ही बसणार आहोत. या वेळी आमच्या जिवाचे काही बरेवाईट झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी शासन म्हणून पेण प्रांताधिकारी, खारभूमी खाते आणि जेएसडब्ल्यू कंपनीची राहील.जेएसडब्ल्यू कंपनीने बंधाºयाची दुरुस्ती करण्याकरिता, फुटलेल्या संरक्षक बंधाºयापर्यंत जाण्याकरिता आवश्यक त्या सर्व कायदेशीर बाबींचा अवलंब करून, हरित न्यायालयाचा २७ आॅक्टोबर २०१५चा आदेश विचारात घेवून कोणत्याही परिस्थितीत कांदळवनांचे कोणतेही नुकसान होणार नाही,याची खबरदारी घेवून आवश्यक ती कार्यवाही तत्काळ करण्यात यावी.- प्रतिमा पुदलवाड, पेण प्रांताधिकारी

टॅग्स :Raigadरायगडnewsबातम्या