शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कोरोनासाठी ५० टक्के निधी, जिल्हा नियोजन समितीकडून ३८ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2020 23:50 IST

जिल्हा नियोजन समितीकडून ३८ कोटी : विकासकामांना कात्री लागल्याने अवलंबून असणारे ठप्प

आविष्कार देसाई।

रायगड : कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारने दिलेला निधी संपलेला आहे, तर दुसरीकडे जिल्हा नियोजन समितीच्या तिजोरीतून निधीची कमतरता भरून काढली जात आहे. सुमारे ७७ कोटींपैकी ५० टक्के म्हणजे ३८ कोटींचा निधी हा कोरोनासाठी वापरण्यात येत आहे. त्यामुळे अन्य विकासकामांना आपोआपच कात्री लागली असल्याचे दिसून येते.

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध घटकांचा विकास करण्यात येतो. पाणी, रस्ते, नाले, समाजमंदिर, बंधारे, शाळा इमारत दुरुस्ती यासह अन्य कामे मार्गी लावली जातात. मात्र कोरोनाचा मुकाबला करताना कोणत्याही परिस्थितीमध्ये निधीची कमतरता पडू नये यासाठी जिल्हा नियोजन समितीचा ५० टक्के निधी वळवल्याने विकासकामे ठप्प पडली आहेत. परिणामी, यावर अवलंबून असणारे ठेकेदार, मंजूर, बांधकाम व्यवसायाचे साहित्य पुरवणारे यांचे काम काही अंशी ठप्प झाले आहे. कोरोनाचा कहर लवकर थांबेल असे दिसत नाही. त्यामुळे आगामी कालावधीत निधीची गरज भासणार असल्याने विकासकामांना निधी मिळेस असे वाटत नसल्याचे एका ठेकेदाराने ‘लोकमत’ला सांगितले.कोरोनाच्या महामारीमुळे सर्वच यंत्रणांची दमछाक होत आहे. नागरिकांचे रक्षण व्हावे यासाठी सरकार आणि प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाशी दोन हात करताना आर्थिक रसद कमी पडू नये यासाठी सर्वच स्तरावरून निधी कसा उपलब्ध होईल याकडे लक्ष दिले जात असल्याचे पालकमंत्री अदिती तटकरे यांनी जाहीर केले आहे. आरोग्य सुविधा, नव्याने कोविड रुग्णालय, आॅक्सिजन, आयसीयू बेड, व्हेंटिलेटर, औषधे यासह अन्य बाबी नागरिकांच्या रक्षणासाठी निर्माण केल्या जात आहेत. त्यासाठी निधीची आवश्यकता भासत आहे. राज्य सरकारने जिल्हा प्रशासनाला मार्चपासून १४ कोटी ५० लाखांचा निधी दिला आहे. तो खर्चही झाला आहे. निधीची कमतरता पडू नये यासाठी जिल्हा नियोजन समितीचा निधी मोठ्या प्रमाणात वापरण्यात येत आहे.२३४ कोटी रुपयांचा आराखडा मंजूरच्२०२०-२१ साठी जिल्हा नियोजन समितीचा २३४ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर झाला आहे. त्यापैकी ३३ टक्के म्हणजे ७७ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. त्यातील ५० टक्के निधी हा कोरोना निर्मूलनासाठी आहे.च्आतापर्यत सुमारे १३ कोटी ३२ लाखांचा निधी जिल्हा नियोजन समितीने कोरोनासाठी वितरित केला आहे. कोरोनाला हरवणे हे सरकार आणि प्रशासनासमोरचे प्राथमिक आव्हान आहे. त्यामुळे निधी दिला आहे.च्जिल्हा नियोजन समितीकडे सुमारे २८कोटींच्या विकासकामांची मागणी केली आहे. कोरोनामुळे प्राधान्यक्रमानुसार कामांना मान्यता देण्यात येणार आहे. त्यामुळे अन्य प्रस्ताव रखडण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Raigadरायगडcorona virusकोरोना वायरस बातम्या