शहरं
Join us  
Trending Stories
1
Labour law: वेळेत पगार, ओव्हरटाइमसाठी दुप्पट पैसे, महिलांना समान वेतन; नवे कामगार कायदे लागू!
2
India- Israel: भारत-इस्रायल मैत्री गतिमान होणार, पंतप्रधान नेतान्याहू भारतात येणार!
3
आजचे राशीभविष्य- २२ नोव्हेंबर २०२५, अचानक धनलाभ संभवतो, नोकरीतील वातावरण अनुकूल राहील
4
Aaditya Thackeray: ‘इलेक्शन’ कशाला ‘सिलेक्शन’ करा!' मतदारयादीतील गोंधळावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर आरोप
5
Malegaon: 'नराधमाला फाशी द्या !" मालेगाव अत्याचार प्रकरणाचे तीव्र पडसाद, संतप्त जमावाने न्यायालयाचे प्रवेशद्वार तोडले
6
Mumbai: मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी, काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार
7
Thane: श्रेयवादाची लढाई ठाण्यात हातघाईवर, भाजप नेत्याकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण!
8
पंतच्या नेतृत्त्वात भारताची मालिका बचाव मोहीम! IND vs SA 2nd Test मॅच Live Streaming बद्दल सविस्तर
9
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
10
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
11
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
12
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
13
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
14
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
15
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
16
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
17
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
18
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
19
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
20
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
Daily Top 2Weekly Top 5

४५ टक्के उपाहारगृहे, मॉल्स असुरक्षितच! दरवर्षी साडेचार हजार ठिकाणी आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 03:27 IST

सर्वेक्षणात उघड : अग्निरोधक नियमांचे उल्लंघन; पालिका टाकणार अचानक धाड

मुंबई : लोअर परळ येथील कमला मिल कंपाउंडमधील आगीच्या भीषण दुर्घटनेनंतर महापालिकेने मुंबईतील उपाहारगृह, मॉल्सची झाडाझडती घेतली. नियमांचे उल्लंघन करून आगीशी खेळ करणाऱ्या काही उपहारगृहांना टाळेही ठोकण्यात आले. मात्र, गेल्या सहा महिन्यांतील या सर्वेक्षणात आग प्रतिबंधक कायद्याचे नियम न पाळण्याचे प्रमाण ४५ टक्के असल्याचे आढळून आले.

कमला मिल कंपाउंड येथील मोजो बिस्ट्रो आणि वन अबव्ह या दोन रेस्टो-पबमध्ये लागलेल्या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला. या रेस्टो पबमध्ये आगशी खेळ सुरू होता, असे चौकशीतून समोर आल्यानंतर, पालिकेने मुंबईतील सर्व उपाहारगृहे, मॉल्स, मल्टिप्लेक्सची कसून तपासणी केली. नियमांचे उल्लंघन करणाºया उपाहारगृहांना नोटीस बजाविण्यात वेळ न घालविता, तेथेच सील करण्याची कारवाई पालिकेने सुरू केली होती. कारवार्इंनंतरही उपाहारगृहे, मॉल्सध्ये नियमांचे उल्लंघन, अग्निरोधक यंत्रणा निकामी असणे, अशा पद्धतीने ग्राहकांच्या जिवाशी खेळ सुरू आहेत. वारंवार नोटीस पाठवूनही मुंबईत दररोज सरासरी १३ आगीच्या घटना घडत आहेत. निष्पाप जिवांचा बळी जात आहे. बडगा दाखवूनही निम्मी उपाहारगृह नियम पालन करीत असतील, अशी नाराजी अग्निशमन दलातील अधिकाºयाने व्यक्त केली.अन्यथा खटला दाखल होणारनोटीस पाठवूनही आगीपासून सुरक्षित न करणाºया इमारतींवर खटला दाखल करण्याचे अधिकार पालिकेला आहेत.मुंबईत दरवर्षी सरासरी साडेचार हजार ठिकाणी आगीच्या घटना घडत असतात. मात्र, गेल्या वर्षीपासून यात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. २०१७ मध्ये आगीच्या दुर्घटनेचे प्रमाण दररोज सरासरी १३ एवढे होते.३८० उपाहारगृहे जमीनदोस्तजानेवारी ते जुलै या सात महिन्यांमध्ये महापालिकेने केलेल्या पाहणीत तीन हजार २६४ पैकी १,५०० ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत असल्याचे उजेडात आले. गेल्या सात महिन्यांत महापालिकेने नियमांचे उल्लंघन करणारी ३८० उपाहारगृह जमीनदोस्त केली, तर ३६ सील करण्यात आली आहेत.अचानक टाकणार धाडसध्या निवासी इमारतींमधील रहिवाशांनी फायर सेफ्टी आॅडिट करून, त्याचा अहवाल अग्निशमन दलाकडे पाठविणे अपेक्षित आहे. नवीन परिपत्रकानुसार मुंबईतील इमारतींची वर्गवारी त्यांच्या उंचीनुसार करण्यात आली आहे. उत्तुंग इमारतींची पाहणी वरिष्ठ अधिकाºयांमार्फत करण्यात येणार आहे. या अधिकाºयांनी इमारतींना नोटीस न पाठविता, अचानक धाड टाकून पाहणी करणे अपेक्षित आहे.दर महिन्याला ३०० इमारतींचे लक्ष्यपरळ येथील क्रिस्टल टॉवर येथील इमारतीला लागलेल्या आगीत चार जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर महापालिकेने पुन्हा एकदा मुंबई सर्व इमारतींमध्ये अचानक धाड टाकून पाहणी करणार आहे. या पाहणीसाठी नियुक्त विशेष कक्षाला जुलै महिन्यातच परिपत्रकाद्वारे प्रत्येक महिन्यात तीनशे इमारतींची तपासणी करण्यास सांगण्यात आले होते.परवाना रद्द होणारबºयाच उपाहारगृहांमध्ये ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर, अग्निसुरक्षेचे नियम धाब्यावर बसविण्यात येत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतरही तीन महिन्यांत नियमांचे पालन न केल्यास, त्या उपाहारगृहाचा परवाना रद्द करण्याचा इशारा महापालिकेने दिला होता. 

टॅग्स :Raigadरायगडfireआग