शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
2
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
3
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
4
संतापलेले भारतीय तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकिस्तानला मदत करणारे इन्कम गमावून बसणार
5
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
6
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
7
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
8
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
9
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
10
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?
11
सॅल्यूट! अ‍ॅसिड हल्ल्याने गेली दृष्टी, मानली नाही हार; बारावीत मिळवले ९५%, IAS होण्याचं स्वप्न
12
"तुम्हा सर्वांना सलाम..."; तेजस्वी यादव यांचा शहीद जवान रामबाबू सिंह यांच्या भावाला Video कॉल
13
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
14
अबब! तब्बल ४ लाखांची पोपटाची पर्स घेऊन 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये पोहोचली उर्वशी रौतेला, सर्वजण पाहतच राहिले
15
CJI BR Gavai Oath Ceremony : महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
16
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
17
'या' दिग्गज कंपनीतून बाहेर पडण्याच्या तयारीत Reliance; ५०० कोटींची केलेली गुंतवणूक, मिळणार ११,१४१ कोटी रुपये
18
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
19
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
20
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...

४५ टक्के उपाहारगृहे, मॉल्स असुरक्षितच! दरवर्षी साडेचार हजार ठिकाणी आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 03:27 IST

सर्वेक्षणात उघड : अग्निरोधक नियमांचे उल्लंघन; पालिका टाकणार अचानक धाड

मुंबई : लोअर परळ येथील कमला मिल कंपाउंडमधील आगीच्या भीषण दुर्घटनेनंतर महापालिकेने मुंबईतील उपाहारगृह, मॉल्सची झाडाझडती घेतली. नियमांचे उल्लंघन करून आगीशी खेळ करणाऱ्या काही उपहारगृहांना टाळेही ठोकण्यात आले. मात्र, गेल्या सहा महिन्यांतील या सर्वेक्षणात आग प्रतिबंधक कायद्याचे नियम न पाळण्याचे प्रमाण ४५ टक्के असल्याचे आढळून आले.

कमला मिल कंपाउंड येथील मोजो बिस्ट्रो आणि वन अबव्ह या दोन रेस्टो-पबमध्ये लागलेल्या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला. या रेस्टो पबमध्ये आगशी खेळ सुरू होता, असे चौकशीतून समोर आल्यानंतर, पालिकेने मुंबईतील सर्व उपाहारगृहे, मॉल्स, मल्टिप्लेक्सची कसून तपासणी केली. नियमांचे उल्लंघन करणाºया उपाहारगृहांना नोटीस बजाविण्यात वेळ न घालविता, तेथेच सील करण्याची कारवाई पालिकेने सुरू केली होती. कारवार्इंनंतरही उपाहारगृहे, मॉल्सध्ये नियमांचे उल्लंघन, अग्निरोधक यंत्रणा निकामी असणे, अशा पद्धतीने ग्राहकांच्या जिवाशी खेळ सुरू आहेत. वारंवार नोटीस पाठवूनही मुंबईत दररोज सरासरी १३ आगीच्या घटना घडत आहेत. निष्पाप जिवांचा बळी जात आहे. बडगा दाखवूनही निम्मी उपाहारगृह नियम पालन करीत असतील, अशी नाराजी अग्निशमन दलातील अधिकाºयाने व्यक्त केली.अन्यथा खटला दाखल होणारनोटीस पाठवूनही आगीपासून सुरक्षित न करणाºया इमारतींवर खटला दाखल करण्याचे अधिकार पालिकेला आहेत.मुंबईत दरवर्षी सरासरी साडेचार हजार ठिकाणी आगीच्या घटना घडत असतात. मात्र, गेल्या वर्षीपासून यात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. २०१७ मध्ये आगीच्या दुर्घटनेचे प्रमाण दररोज सरासरी १३ एवढे होते.३८० उपाहारगृहे जमीनदोस्तजानेवारी ते जुलै या सात महिन्यांमध्ये महापालिकेने केलेल्या पाहणीत तीन हजार २६४ पैकी १,५०० ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत असल्याचे उजेडात आले. गेल्या सात महिन्यांत महापालिकेने नियमांचे उल्लंघन करणारी ३८० उपाहारगृह जमीनदोस्त केली, तर ३६ सील करण्यात आली आहेत.अचानक टाकणार धाडसध्या निवासी इमारतींमधील रहिवाशांनी फायर सेफ्टी आॅडिट करून, त्याचा अहवाल अग्निशमन दलाकडे पाठविणे अपेक्षित आहे. नवीन परिपत्रकानुसार मुंबईतील इमारतींची वर्गवारी त्यांच्या उंचीनुसार करण्यात आली आहे. उत्तुंग इमारतींची पाहणी वरिष्ठ अधिकाºयांमार्फत करण्यात येणार आहे. या अधिकाºयांनी इमारतींना नोटीस न पाठविता, अचानक धाड टाकून पाहणी करणे अपेक्षित आहे.दर महिन्याला ३०० इमारतींचे लक्ष्यपरळ येथील क्रिस्टल टॉवर येथील इमारतीला लागलेल्या आगीत चार जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर महापालिकेने पुन्हा एकदा मुंबई सर्व इमारतींमध्ये अचानक धाड टाकून पाहणी करणार आहे. या पाहणीसाठी नियुक्त विशेष कक्षाला जुलै महिन्यातच परिपत्रकाद्वारे प्रत्येक महिन्यात तीनशे इमारतींची तपासणी करण्यास सांगण्यात आले होते.परवाना रद्द होणारबºयाच उपाहारगृहांमध्ये ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर, अग्निसुरक्षेचे नियम धाब्यावर बसविण्यात येत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतरही तीन महिन्यांत नियमांचे पालन न केल्यास, त्या उपाहारगृहाचा परवाना रद्द करण्याचा इशारा महापालिकेने दिला होता. 

टॅग्स :Raigadरायगडfireआग