शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

जिल्ह्यात ५ वर्षांत ४१ बांगलादेशींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 00:01 IST

घुसखोरी रोखण्यासाठी मोहीम : ३३ जणांची मायदेशी रवानगी

अलिबाग : बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी रोखण्याकरिता २०१३ पासून रायगड पोलीस दलाने राबवलेल्या शोधमोहिमेमुळे मागील दोन वर्षांत एकही बांगलादेशी नागरिक रायगडमध्ये आढळून आलेला नाही. परंतु त्यापूर्वी बेकायदेशीरपणे रायगड जिल्ह्यात वास्तव्यास राहिलेल्या ४१ बांगलादेशींना शोधून काढून गुन्हे दाखल करण्यात आले होते.

बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी वाढल्याच्या पार्श्वभूमीवर २०१३ मध्ये बांगलादेशी घुसखोर नागरिक विरोधी पथकाची स्थापना करण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत १६ गुन्हे दाखल केले आहेत, तर ४१ बांगलादेशी नागरिकांना अटक केली होती. त्यापैकी ३३ जणांना बांगलादेशात परत पाठवले तर चार जणांची जामिनावर न्यायालयाने मुक्तता केली आहे.

परवानगीशिवाय भारतात राहणाऱ्या नागरिकांना शोधण्यासाठी गृहविभागाने बांगलादेशी विरोधी पथकाला विशेष अधिकार देवून शोधमोहिमा राबवण्यासाठी आदेश दिले होते. रेल्वे स्थानक परिसरात हे नागरिक जास्त दिसतात. मागील तीन वर्षांत १७४ शोधमोहिमा पथकाने राबवल्या असून, तीन बांगलादेशी नागरिक आढळले आहेत. कारखान्यांमधील लेबर कॉन्ट्रॅक्टर, बांधकाम व्यावसायिकांकडे हे नागरिक काम मागण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे रायगड जिल्ह्यात परराज्यातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची माहिती पोलिसांना कळवण्याच्या सूचना कंपनी व्यवस्थापकांना देण्यात आल्या आहेत. तसेच मोहल्ला बैठका घेऊ न अशा नागरिकांची माहिती कळवण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.

परराज्यातून येणाºया संशयित कामगारांची कागदपत्रे नियमित तपासली जातात. पश्चिम बंगालमधून आलेल्या नागरिकांची बोलीभाषा आणि बांगलादेशातील नागरिकांच्या भाषेत साम्य आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमधील नागरिकांवर जास्त नजर असल्याची माहिती बांगलादेशी विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक प्रल्हाद माने यांनी दिली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी