शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

जिल्ह्यात ५ वर्षांत ४१ बांगलादेशींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 00:01 IST

घुसखोरी रोखण्यासाठी मोहीम : ३३ जणांची मायदेशी रवानगी

अलिबाग : बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी रोखण्याकरिता २०१३ पासून रायगड पोलीस दलाने राबवलेल्या शोधमोहिमेमुळे मागील दोन वर्षांत एकही बांगलादेशी नागरिक रायगडमध्ये आढळून आलेला नाही. परंतु त्यापूर्वी बेकायदेशीरपणे रायगड जिल्ह्यात वास्तव्यास राहिलेल्या ४१ बांगलादेशींना शोधून काढून गुन्हे दाखल करण्यात आले होते.

बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी वाढल्याच्या पार्श्वभूमीवर २०१३ मध्ये बांगलादेशी घुसखोर नागरिक विरोधी पथकाची स्थापना करण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत १६ गुन्हे दाखल केले आहेत, तर ४१ बांगलादेशी नागरिकांना अटक केली होती. त्यापैकी ३३ जणांना बांगलादेशात परत पाठवले तर चार जणांची जामिनावर न्यायालयाने मुक्तता केली आहे.

परवानगीशिवाय भारतात राहणाऱ्या नागरिकांना शोधण्यासाठी गृहविभागाने बांगलादेशी विरोधी पथकाला विशेष अधिकार देवून शोधमोहिमा राबवण्यासाठी आदेश दिले होते. रेल्वे स्थानक परिसरात हे नागरिक जास्त दिसतात. मागील तीन वर्षांत १७४ शोधमोहिमा पथकाने राबवल्या असून, तीन बांगलादेशी नागरिक आढळले आहेत. कारखान्यांमधील लेबर कॉन्ट्रॅक्टर, बांधकाम व्यावसायिकांकडे हे नागरिक काम मागण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे रायगड जिल्ह्यात परराज्यातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची माहिती पोलिसांना कळवण्याच्या सूचना कंपनी व्यवस्थापकांना देण्यात आल्या आहेत. तसेच मोहल्ला बैठका घेऊ न अशा नागरिकांची माहिती कळवण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.

परराज्यातून येणाºया संशयित कामगारांची कागदपत्रे नियमित तपासली जातात. पश्चिम बंगालमधून आलेल्या नागरिकांची बोलीभाषा आणि बांगलादेशातील नागरिकांच्या भाषेत साम्य आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमधील नागरिकांवर जास्त नजर असल्याची माहिती बांगलादेशी विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक प्रल्हाद माने यांनी दिली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी