शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

पाणी संकलन योजनेचे १२९ प्रस्ताव रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 22:59 IST

तांत्रिक अडचणीमुळे योजना सुरू होण्यासाठी ऑगस्ट २०२० उजाडणार : टंचाईच्या कालावधीत नागरिकांना टँकरच्या पाण्याचा आधार

आविष्कार देसाई अलिबाग : रायगड जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गाव आणि वाड्यांतील पाणीटंचाई दूर व्हावी, यासाठी जिल्हा परिषदेने पाणी संकलन योजनेचे तब्बल १२९ प्रस्ताव तयार केलेले आहेत. हे प्रस्ताव तांत्रिक मान्यतेअभावी रखडले आहेत. २०१८-१९ या कालावधीत आकार घेणारी योजना आता २०१९-२० या कालावधीत पूर्ण होऊन ऑगस्ट २०२० मध्ये प्रत्यक्षात उभारण्यात येणाऱ्या टाक्यांमध्ये पाणी साठवता येणार आहे. त्यामुळे योजना पूर्ण होईपर्यंत नागरिकांना टँकरच्याच पाण्यावर आपली तहान भागवावी लागणार असल्याचे दिसून येते.

जिल्ह्यात मोठ्या संख्येने पाऊस पडूनही त्याचे योग्य नियोजन न केल्याने सर्व पाणी समुद्राला जाऊन मिळते. मोठी धरण बांधणे सध्या सरकारला परवडणारे नसल्याने पाणी साठवण्याचे विविध पर्याय विचारात घेतले जात आहेत. त्यातीलच पाणी संकलन योजना हा पर्याय सरकारने निवडलेला आहे. कमी लोकसंख्येच्या गावांमध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अशा योजना आखण्यात येत आहेत.पाणी ही जीवनाश्यक गरज असल्याने सरकार प्रशासनामार्फत करोडो रुपये खर्च करून नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करते. मात्र, हे सातत्याने सुरू असलेले हे दुष्टचक्र भेदण्यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे सरकारच्या लक्षात आले आहे. त्यानुसार जलस्वराज्य टप्पा क्रमांक- दोन अंतर्गत गाव, वाड्या आणि वस्त्यांवर पिण्याचे पाणी देण्यासाठी सरकारने पाऊस पाणी संकलन म्हणजेच पाघोळी विहीर योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेसाठी जागतिक बँक १०० टक्के अर्थसाहाय्य करत आहे.

जलस्वराज्य टप्पा क्रमांक-दोन अंतर्गत एकूण १२९ गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने महाड, पोलादपूर, म्हसळा, रोहे, खालापूर आणि कर्जत तालुक्यातील गावांचा समावेश आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ही योजना उत्तम असल्याने वर्षभर पिण्याचे पाणी याद्वारे कुटुंबांना उपलब्ध होणार आहे. फेरो सिंमेटच्या माध्यमातून आरसीसी पद्धतीने पाण्याच्या टाकीचे बांधकाम केले जाते. दहा हजार लीटर पाण्याची टाकी बांधण्यासाठी सुमारे ५० ते ६० हजार रुपयांचा खर्च येतो. जागतिक बँक यासाठी १०० टक्के अर्थसाहाय्य करणार आहे. लाभार्थ्याला या योजनेचा लाभ घेताना कोणतीच रक्कम खर्च करावी लागत नाही. २०१८-१९ या कालावधीत १२९ गावांनी आपापले प्रस्ताव पाणी व स्वच्छता विभागाकडे पाठवले होते; परंतु काही तांत्रिक कारणांनी हे प्रस्ताव मान्यतेसाठी सरकारकडे पाठवण्यात आले आहेत. २०१९-२० या कालावधीत सदरची योजना पूर्ण होऊन गावांना पाणी उपलब्ध होईल. या प्रकल्पासाठी सुमारे सहा कोटी रुपयांचा खर्च येणार आहे, असे पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी पुंडलिक साळुंखे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

पाघोळी योजनापावसाळ्यात लाभार्थ्याच्या घरावर पडणारे पाणी पाघोळीच्या साहाय्याने घराशेजारी उभारलेल्या टाकीत साठविले जाते. सदरची टाकीची पाणी साठवण्याची क्षमता ही दहा ते २० हजार लीटरपर्यंत असते. पावसाळ्यात आॅगस्ट महिन्यात पडणारे पावसाचे पाणी या टाक्यांमध्ये साठवण्यात येते. यातील पाणीटंचाईच्या कालावधीत प्रतिमाणसी २० लीटर याप्रमाणे वापरायचे आहे. याआधी उभारण्यात आलेल्या टाक्या जुलै महिन्यात स्वच्छ केल्या जातात आणि त्यामध्येही आॅगस्ट महिन्यात पडणारे पावसाचे पाणी साठवले जाते.

५०० पेक्षा अधिक लोकसंख्येची आवश्यकता या योजनेसाठी आवश्यक आहे. त्याचप्रमाणे सदरची योजना राबवताना त्या गावामध्ये आधी कोणतीच पाण्याची योजना राबवली गेलेली नसणे आवश्यक आहे. एखादी योजना बंद पडली असेल तर प्रशासकीय स्तरावर त्याचा विचार केला जातो. पाण्याच्या टाक्या उभारताना तेथील भौगोलिक रचना कशी आहे याचाही शास्त्रीय अभ्यास केला जातो.

टॅग्स :Waterपाणी