शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

अभ्यास करून परीक्षा देऊन 'शून्य' गुण; विद्यार्थ्यांचा संताप, विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2022 18:47 IST

परीक्षा व्यवस्थित देऊनही इतक्या माेठ्या प्रमाणावर विद्यार्थी नापास हाेणे ही परीक्षा विभागाची चूक

कमलाकर शेटे 

पुणे : यंदा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने एप्रिल महिन्यात घेतलेल्या एलएलबी व बीएएलएलबी परीक्षांचे निकाल जाहीर झाले असून, त्यामध्ये अनेक विद्यार्थी नापास झाले आहेत. परीक्षा व्यवस्थित देऊनही इतक्या माेठ्या प्रमाणावर विद्यार्थी नापास हाेणे ही परीक्षा विभागाची चूक आहे. ती चूक तातडीने दुरूस्ती करून निकाल पुन्हा लावावेत, अशी मागणी अहमदनगरच्या न्यू लॉ कॉलेज, पिंपरीच्या डाॅ. डी. वाय. पाटील व इतर संलग्न विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडे केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी साेमवारी परीक्षा विभागाला दिले.

पेपर योग्य पद्धतीने लिहूनही काही विषयांमध्ये बहुतांश विद्यार्थी नापास झाले आहेत. यात खासकरून लँड लाॅ-२मध्ये सर्वाधिक व त्याखालोखाल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लाॅ व कंपनी लाॅ या विषयांचा समावेश आहे. बहुतांश विद्यार्थ्यांना १५ पेक्षाही कमी गुण मिळाले आहेत. एकवेळ कमी गुणांचे समजू शकताे. परंतु, पुरवणी लावून परीक्षा देऊनही शून्य गुण कसे पडले, असा सवाल या विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. पेपर पूर्णपणे व व्यवस्थित पद्धतीने लिहूनही चूक नसताना नापास झालेल्या या विद्यार्थ्यांच्या निकालांबाबत विद्यापीठाकडून चौकशी व्हावी व नक्की कुठल्या कारणास्तव विद्यार्थी नापास झाले आहेत, याचा खुलासा करण्याची मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे. पेपर तपासणी नीट न झाल्याने किंवा टायपिंग मिस्टेक झाली आहे का, याचा तपास व्हावा. तसेच येत्या ७ दिवसात या प्रकरणाची चाैकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

''एलएलबीच्या निकालामध्ये लॅन्ड लॉ-२ या विषयात बहुतांश विद्यार्थी नापास झाले आहेत. तसेच बीएएलएलबीमध्ये ॲडमिनिस्ट्रेशन लॉ, कंपनी लॉ आणि लॅन्ड लॉ-२ या तिन्हीही विषयात नापास आहेत. अनेक महाविद्यालयात असा प्रकार झालेला आहे. पुनर्मूल्यांकन, पुनर्तपासणी किंवा पुनर्तपासणी करायला सांगितले जाते. परंतु यासाठी आम्ही तयार नाहीत. कारण यामध्ये पूर्णपणे चूक तपासणीची किंवा गुण देण्यामध्ये झालेली आहे. याचा भुर्दंड विद्यार्थ्यांना बसू नये. - सीमा दरेकर, विद्यार्थिनी एल. एल. बी., न्यू लॉ कॉलेज, अहमदनगर''

''परीक्षा विभागाने जाहीर केलेल्या निकालामध्ये काेविड पूर्वच्या काळाच्या निकालाच्या तुलनेत आता संयुक्त उत्तीर्णता अर्थात कम्बाइन पासिंगमुळे ६६ टक्के व ८५ टक्के अशी वाढ झाल्याचे दिसून येते. यामुळे निकालामध्ये सध्या कोणताही बदल झालेला वाटत नाही. निकालाची टक्केवारी ही निश्चितपणाने समाधानकारक असल्याने पुनर्परीक्षेचा प्रश्न येत नाही. काही विषयांमध्ये अनुत्तीर्ण होण्याचे व शून्य गुण मिळण्याचे प्रमाण अधिक असल्याने पुनर्मूल्यांकन करून घेण्याबाबत परीक्षा विभाग सकारात्मक आहे. - डॉ. महेश काकडे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ'' 

टॅग्स :PuneपुणेPune universityपुणे विद्यापीठStudentविद्यार्थीexamपरीक्षा