शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

अभ्यास करून परीक्षा देऊन 'शून्य' गुण; विद्यार्थ्यांचा संताप, विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2022 18:47 IST

परीक्षा व्यवस्थित देऊनही इतक्या माेठ्या प्रमाणावर विद्यार्थी नापास हाेणे ही परीक्षा विभागाची चूक

कमलाकर शेटे 

पुणे : यंदा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने एप्रिल महिन्यात घेतलेल्या एलएलबी व बीएएलएलबी परीक्षांचे निकाल जाहीर झाले असून, त्यामध्ये अनेक विद्यार्थी नापास झाले आहेत. परीक्षा व्यवस्थित देऊनही इतक्या माेठ्या प्रमाणावर विद्यार्थी नापास हाेणे ही परीक्षा विभागाची चूक आहे. ती चूक तातडीने दुरूस्ती करून निकाल पुन्हा लावावेत, अशी मागणी अहमदनगरच्या न्यू लॉ कॉलेज, पिंपरीच्या डाॅ. डी. वाय. पाटील व इतर संलग्न विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडे केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी साेमवारी परीक्षा विभागाला दिले.

पेपर योग्य पद्धतीने लिहूनही काही विषयांमध्ये बहुतांश विद्यार्थी नापास झाले आहेत. यात खासकरून लँड लाॅ-२मध्ये सर्वाधिक व त्याखालोखाल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लाॅ व कंपनी लाॅ या विषयांचा समावेश आहे. बहुतांश विद्यार्थ्यांना १५ पेक्षाही कमी गुण मिळाले आहेत. एकवेळ कमी गुणांचे समजू शकताे. परंतु, पुरवणी लावून परीक्षा देऊनही शून्य गुण कसे पडले, असा सवाल या विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. पेपर पूर्णपणे व व्यवस्थित पद्धतीने लिहूनही चूक नसताना नापास झालेल्या या विद्यार्थ्यांच्या निकालांबाबत विद्यापीठाकडून चौकशी व्हावी व नक्की कुठल्या कारणास्तव विद्यार्थी नापास झाले आहेत, याचा खुलासा करण्याची मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे. पेपर तपासणी नीट न झाल्याने किंवा टायपिंग मिस्टेक झाली आहे का, याचा तपास व्हावा. तसेच येत्या ७ दिवसात या प्रकरणाची चाैकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

''एलएलबीच्या निकालामध्ये लॅन्ड लॉ-२ या विषयात बहुतांश विद्यार्थी नापास झाले आहेत. तसेच बीएएलएलबीमध्ये ॲडमिनिस्ट्रेशन लॉ, कंपनी लॉ आणि लॅन्ड लॉ-२ या तिन्हीही विषयात नापास आहेत. अनेक महाविद्यालयात असा प्रकार झालेला आहे. पुनर्मूल्यांकन, पुनर्तपासणी किंवा पुनर्तपासणी करायला सांगितले जाते. परंतु यासाठी आम्ही तयार नाहीत. कारण यामध्ये पूर्णपणे चूक तपासणीची किंवा गुण देण्यामध्ये झालेली आहे. याचा भुर्दंड विद्यार्थ्यांना बसू नये. - सीमा दरेकर, विद्यार्थिनी एल. एल. बी., न्यू लॉ कॉलेज, अहमदनगर''

''परीक्षा विभागाने जाहीर केलेल्या निकालामध्ये काेविड पूर्वच्या काळाच्या निकालाच्या तुलनेत आता संयुक्त उत्तीर्णता अर्थात कम्बाइन पासिंगमुळे ६६ टक्के व ८५ टक्के अशी वाढ झाल्याचे दिसून येते. यामुळे निकालामध्ये सध्या कोणताही बदल झालेला वाटत नाही. निकालाची टक्केवारी ही निश्चितपणाने समाधानकारक असल्याने पुनर्परीक्षेचा प्रश्न येत नाही. काही विषयांमध्ये अनुत्तीर्ण होण्याचे व शून्य गुण मिळण्याचे प्रमाण अधिक असल्याने पुनर्मूल्यांकन करून घेण्याबाबत परीक्षा विभाग सकारात्मक आहे. - डॉ. महेश काकडे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ'' 

टॅग्स :PuneपुणेPune universityपुणे विद्यापीठStudentविद्यार्थीexamपरीक्षा