शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
2
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
5
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
6
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
7
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
8
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
9
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
10
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
11
VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू
12
Shreyasi Joshi : पुण्याच्या लेकीची कमाल; आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय
13
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
14
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
15
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
17
रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकची गेल्या महिन्यात रेकॉर्ड ब्रेक विक्री; खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड!
18
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
19
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...

अभ्यास करून परीक्षा देऊन 'शून्य' गुण; विद्यार्थ्यांचा संताप, विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2022 18:47 IST

परीक्षा व्यवस्थित देऊनही इतक्या माेठ्या प्रमाणावर विद्यार्थी नापास हाेणे ही परीक्षा विभागाची चूक

कमलाकर शेटे 

पुणे : यंदा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने एप्रिल महिन्यात घेतलेल्या एलएलबी व बीएएलएलबी परीक्षांचे निकाल जाहीर झाले असून, त्यामध्ये अनेक विद्यार्थी नापास झाले आहेत. परीक्षा व्यवस्थित देऊनही इतक्या माेठ्या प्रमाणावर विद्यार्थी नापास हाेणे ही परीक्षा विभागाची चूक आहे. ती चूक तातडीने दुरूस्ती करून निकाल पुन्हा लावावेत, अशी मागणी अहमदनगरच्या न्यू लॉ कॉलेज, पिंपरीच्या डाॅ. डी. वाय. पाटील व इतर संलग्न विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडे केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी साेमवारी परीक्षा विभागाला दिले.

पेपर योग्य पद्धतीने लिहूनही काही विषयांमध्ये बहुतांश विद्यार्थी नापास झाले आहेत. यात खासकरून लँड लाॅ-२मध्ये सर्वाधिक व त्याखालोखाल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लाॅ व कंपनी लाॅ या विषयांचा समावेश आहे. बहुतांश विद्यार्थ्यांना १५ पेक्षाही कमी गुण मिळाले आहेत. एकवेळ कमी गुणांचे समजू शकताे. परंतु, पुरवणी लावून परीक्षा देऊनही शून्य गुण कसे पडले, असा सवाल या विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. पेपर पूर्णपणे व व्यवस्थित पद्धतीने लिहूनही चूक नसताना नापास झालेल्या या विद्यार्थ्यांच्या निकालांबाबत विद्यापीठाकडून चौकशी व्हावी व नक्की कुठल्या कारणास्तव विद्यार्थी नापास झाले आहेत, याचा खुलासा करण्याची मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे. पेपर तपासणी नीट न झाल्याने किंवा टायपिंग मिस्टेक झाली आहे का, याचा तपास व्हावा. तसेच येत्या ७ दिवसात या प्रकरणाची चाैकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

''एलएलबीच्या निकालामध्ये लॅन्ड लॉ-२ या विषयात बहुतांश विद्यार्थी नापास झाले आहेत. तसेच बीएएलएलबीमध्ये ॲडमिनिस्ट्रेशन लॉ, कंपनी लॉ आणि लॅन्ड लॉ-२ या तिन्हीही विषयात नापास आहेत. अनेक महाविद्यालयात असा प्रकार झालेला आहे. पुनर्मूल्यांकन, पुनर्तपासणी किंवा पुनर्तपासणी करायला सांगितले जाते. परंतु यासाठी आम्ही तयार नाहीत. कारण यामध्ये पूर्णपणे चूक तपासणीची किंवा गुण देण्यामध्ये झालेली आहे. याचा भुर्दंड विद्यार्थ्यांना बसू नये. - सीमा दरेकर, विद्यार्थिनी एल. एल. बी., न्यू लॉ कॉलेज, अहमदनगर''

''परीक्षा विभागाने जाहीर केलेल्या निकालामध्ये काेविड पूर्वच्या काळाच्या निकालाच्या तुलनेत आता संयुक्त उत्तीर्णता अर्थात कम्बाइन पासिंगमुळे ६६ टक्के व ८५ टक्के अशी वाढ झाल्याचे दिसून येते. यामुळे निकालामध्ये सध्या कोणताही बदल झालेला वाटत नाही. निकालाची टक्केवारी ही निश्चितपणाने समाधानकारक असल्याने पुनर्परीक्षेचा प्रश्न येत नाही. काही विषयांमध्ये अनुत्तीर्ण होण्याचे व शून्य गुण मिळण्याचे प्रमाण अधिक असल्याने पुनर्मूल्यांकन करून घेण्याबाबत परीक्षा विभाग सकारात्मक आहे. - डॉ. महेश काकडे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ'' 

टॅग्स :PuneपुणेPune universityपुणे विद्यापीठStudentविद्यार्थीexamपरीक्षा