शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
3
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
4
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
5
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
6
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
7
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
8
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
9
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
10
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
11
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
12
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
13
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
14
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
15
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
16
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
17
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
18
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
19
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
20
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
Daily Top 2Weekly Top 5

तुमचे हक्क काढून घेतले आहेत, त्या विरोधात आवाज उठवला पाहिजे - बाळासाहेब थोरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 12:27 IST

माहितीच्या अधिकारात माहिती मागवा, पण तुम्हाला कागद दिला जात नाही अशी परिस्थिती केली आहे

पुणे: समाज संवेदनशील असला पाहिजे. तुमचे हक्क काढून घेतले आहेत. त्या विरोधात आवाज उठवला पाहिजे, असे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. माजी नगरसेवक धनंजय थोरात यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा ‘आदर्श कार्यकर्ता पुरस्कार’ अशोक देशमाने आणि जुगल राठी यांना बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते देण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार उल्हास पवार, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, संपादक पराग करंदीकर उपस्थित होते.

थोरात म्हणाले, शास्त्रीय संगीतात जात, भेद नाही. कुणी कुणाचाही गुरू होऊ शकतो. जे शुद्ध असते ते भेद निर्माण करत नाही. माहिती अधिकार कायदा आणण्यासाठी आम्हीही होतो. माहितीच्या अधिकारात माहिती मागवा; पण तुम्हाला कागद दिला जात नाही अशी परिस्थिती केली आहे. तुमचे हक्क काढून घेतले आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी डिजिटल स्वरूपात मतदार मागवल्या; पण दिल्या नाहीत. ४५ दिवसांत सर्व नष्ट करून टाकायचा निर्णय घाईगडबडीत घेतला. इतिहासात हा कालखंड देशाचा घातक असेल. पण वाचवणारे आहेत आपण देश वाचवणारे व्हायचे आहे. कायदे तेच असतात, वापरणारे कसे आहेत त्यावर त्याचे यश अवलंबून असते. प्रगत राज्य हे शब्द वापरायचे पण शेतकरी आत्महत्या होते हे योग्य नाही.

अशोक देशमाने म्हणाले, आयटीमधील नोकरी सोडून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी स्नेहवन सुरू केले. दोनशे मुलांच्या निवासाची व्यवस्था उभी राहिली. जुगल राठी यांनी मनोगत व्यक्त केले. शास्त्रीय गायक रघुनंदन पणशीकर यांना हा पुरस्कार देण्यात येत होता; पण ते उपस्थित राहू शकले नाही. त्यामुळे हा पुरस्कार त्यांच्या मुलाने स्वीकारला पराग करंदीकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले तर आभार मोहन जोशी यांनी मानले.

टॅग्स :PuneपुणेBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातcongressकाँग्रेसPoliticsराजकारणRahul Gandhiराहुल गांधीElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग