शहरं
Join us  
Trending Stories
1
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
2
"खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
3
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
4
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
5
मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
6
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
7
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
8
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
9
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
10
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
11
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
12
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
13
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
14
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
15
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
16
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
17
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
18
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
19
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
20
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?

तुम्हाला डोळे येऊ नये, अक्कल येऊ नये, हीच व्यवस्थेची इच्छा! नागराज मंजुळेंचे सूचक वक्तव्य

By श्रीकिशन काळे | Updated: November 28, 2024 15:09 IST

महापुरूषांमुळे आज आपण चांगले जगू शकतो, पण त्यांना आपण वाटून घेतले, तर जगण्याला काहीच अर्थ राहणार नाही

पुणे : ‘‘तुम्हाला अक्कल येऊ नये, तुम्हाला डोळे येऊ नये, अशी आजच्या व्यवस्थेची इच्छा आहे. कारण तुम्ही शहाणे व्हाल ना ! पण तुम्ही संविधान वाचा, महात्मा फुले यांचे साहित्य वाचा, तुम्हाला समतेचा, योग्य विचार समजेल, मी देखील फुलेंचे साहित्य वाचल्यानंतरच योग्य मार्गावर आलो,’’अशी भावना प्रसिध्द दिग्दर्शक, लेखक, अभिनेते नागराज मंजुळे यांनी व्यक्त केली. तसेच महापुरूषांमुळे आज आपण चांगले जगू शकतो, पण त्या महापुरूषांनाही आपण वाटून घेतले, तर जगण्याला काहीच अर्थ राहणार नाही, असेही ते म्हणाले.

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे महात्मा फुले पुण्यतिथीच्या दिवशी दिला जाणारा ‘महात्मा फुले समता पुरस्कार’ यावर्षी प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते नागराज मंजुळे यांना गुरूवारी (दि.२८) प्रदान करण्यात आला. रुपये एक लाख, फुले पगडी, मानपत्र शाल आणि स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली समता भूमी, फुले वाडा, पुणे येथे हा पुरस्कार प्रदान सोहळा झाला. या वेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, समता परिषदेचे पुणे विभागीय अध्यक्ष प्रीतेश गवळी, वैशाली बनकर, शहर अध्यक्ष पंढरीनाथ बनकर, महिला शहर अध्यक्ष वैष्णवी सातव आदी उपस्थित होते.

मंजुळे म्हणाले, माझी आणि महात्मा फुले यांची ओळख एक वेगळ्या टप्प्यावर झाली. मी अंधश्रद्दा, भांडणे, व्यसनाधीता या विश्वात वावरत होतो. पण फुले यांचे साहित्य, त्यांचे विचार आत्मसात केल्यानंतर योग्य मार्गावर आलो. आज समाजात संकुचित विचार खूप वाढत आहे. लोक भक्त होत आहेत. खरंतर समतेचा विचार घेऊन आपण पुढे जायला हवे. शिवरायांनी सर्वांना सोबत घेतले, शाहू महाराज, महात्मा फुले, आंबेडकर अशा महापुरूषांनी सर्वांना सोबत घेतले होते. तो विचार आज आपल्याला पुढे न्यायचा आहे. विचार पुढे नेणारे खरे वंशज असतात. आपण या महापुरूषांचे वंशज आहोत. त्यांचे विचार नेऊया.’’

भुजबळ म्हणाले, आपले प्रेरणास्थान हे फुलेवाडा आहे. वैचारिक ‘पावर स्टेशन’ म्हणजे हा वाडा. ही समताभूमी. येथे मंजुळे यांना आपण समता पुरस्कार देतोय. कारण त्यांनी सर्व क्षेत्रात ठसा उमटवला. त्यांनी चित्रपटातून सामाजिक प्रश्नावंर आवाज उठवला. लोकांसमोर हे प्रश्न मांडणे हे खूप महत्त्वाचे आहे. ते समतेचा विचार घेऊन पुढे जात आहेत. आपण सर्वांनी देखील तेच करणे अपेक्षित आहे.’’

टॅग्स :PuneपुणेNagraj Manjuleनागराज मंजुळेChhagan Bhujbalछगन भुजबळMahatma Phule Wadaमहात्मा फुले वाडाSavitri Bai Phuleसावित्रीबाई फुलेMaharashtraमहाराष्ट्र