शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
5
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
6
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
7
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
8
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
9
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
10
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
11
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
12
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
13
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
14
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
15
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
16
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
17
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
18
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
19
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
20
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?

पुढील काळात आपल्याला बिबट्या समवेतच राहावे लागेल..

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 21:24 IST

जंगलापेक्षा उस शेतीचा घेतोय बिबट्या आसरा..

ठळक मुद्देसर्पदंश व विंचूदंशाची संख्या व त्याने जीवितहानी होण्याचे प्रमाण जास्त ‘मानव व वन्यजीव संघर्ष : चिंता व निराकरण’ या विषयावर आयोजित परिषद

पुणे : ऊस शेती हा बिबट्याला आश्रयस्थान म्हणून मिळालेला पर्याय आहे. तो, जंगलापेक्षा ऊस शेतातच अधिक दिसून येत आहे. त्यामुळे या पुढील काळात आपल्याला बिबट्या सोबतच रहायचे असून, ते सहजीवन असेल असे माणिकडोह बिबट निवारा केंद्राचे पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय देशमुख यांनी सांगितले. बायोस्फिअर्स व वनस्पतीशास्त्र विभाग, मॉडर्न महाविद्यालय, गणेशखिंड यांच्या वतीने ‘मानव व वन्यजीव संघर्ष : चिंता व निराकरण’ या विषयावर आयोजित परिषदेत ते बोलत होते. अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनिल लिमये, सर्पदंश उपचार तज्ज्ञ डॉ. सदानंद राऊत, ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील जीवशास्त्रज्ञ अनिरुद्ध चाउजी, वरिष्ठ वन अधिकारी व कुरण विकास संशोधक सुभाष बडवे, जुन्नरच्या सरपंच प्रमिलाताई शिंदे, पुण्याचे उपवनसंरक्षक रमेशकुमार, पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. सचिन पुणेकर यावेळी उपस्थित होते.  डॉ. देशमुख म्हणाले, बिबट्याला जंगला व्यतिरिक्त राहण्याचा पर्याय मिळाला आहे. कटू असले तरी आपल्याला या पुढील काळात बिबट्या समवेत रहावे लागणार आहे. येणाऱ्या काळात त्याच्याशी संघर्ष नसून सहजीवन असेल. ‘आगंतुक व उपद्रवी परदेशी वनस्पती फोफावल्यामुळे स्थानिक चारा-वनस्पती कमी होऊ लागल्या आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांमध्ये एकप्रकारचा तणाव निर्माण झाला आहे. म्हणून ते जंगल सोडून मानवी वस्तीमध्ये, शेतीमध्ये हस्तक्षेप करतात. त्यामुळे संघर्ष अटळ असल्याचे’ डॉ. पुणेकर म्हणाले. सुभाष बडवे म्हणाले, कुरणांची संख्या कमी होत चालल्यामुळे पाळीव जनावरांना चारा नाही. त्यामुळे ते जंगलात जातात. तिथे वन्य प्राण्यांची ते शिकार बनतात. म्हणून कुरणे वाढवणे आणि चाऱ्याची उपलब्धता वाढविणे आवश्यक आहे. ताडेबातील जीवशास्त्रज्ञ चाउजी म्हणाले, जंगल पर्यटन वाढले पाहिजे. त्यामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होऊन, त्यांचे जंगलावरील अवलंबित्व कमी होईल. परिणामी मानव-वन्यजीव संघर्ष रोखता येईल. डॉ. राऊत म्हणाले, सर्पदंश व विंचूदंशाची संख्या व त्याने जीवितहानी होण्याचे प्रमाण जास्त आहे. पण सर्पदंश झाल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांसाठी शासनाकडून मदतीची कुठलीही व्यवस्था नाही. शासनाने त्यांना मदत करावी. तसेच, सर्पदंश झाल्यावर काय करायला पाहिजे याबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण केली पाहिजे.यानिमित्त महाविद्यालयातील विद्यार्थी व नागरिकांसाठी वेताळ टेकडीवर निसर्ग परिचय फेरी आयोजित करण्यात आली होती. टेकडीवरील स्थानिक, देशी, परदेशी वनस्पती, बुरशी, कीटक, हिवाळ्यात खास येणारे पक्षी, पर्यावरण विषयातील अनेक घटकांची कीटक शास्त्रज्ञ किशोर राऊत व वनस्पती अभ्यासक डॉ. पुणेकर यांनी माहिती दिली. ---------------

टॅग्स :Puneपुणेleopardबिबट्याforestजंगल