शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

बीडमध्ये तर लॉकडाऊन, होय आता कसं करायचं? ३ लाख ऊस तोडणी कामगारांसमोर प्रश्न 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 20:42 IST

घरी परतणे झाले कठीण

पुणे: बीडमध्ये १० दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे ऊसतोडणीसाठी जिल्ह्याबाहेर गेलेले ३ लाख कामगार जिल्ह्याबाहेरच अडकून राहणार आहेत. त्यांना घरी परतण्यासाठी विशेष परवानगी द्यावी अशी मागणी ऊसतोडणी कामगार संघटनांनी केली आहे. 

जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांच्याकडे महाराष्ट्र राज्य श्रमिक ऊसतोडणी कामगार संघटनेने यासंदर्भात निवेदन दिले. संघटनेचे अध्यक्ष जीवन राठोड यांनी सांगितले की जिल्ह्यातून ५ लाख मजूर साखर कारखाना गाळप हंगामात जिल्ह्याबाहेर जातात. पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र तमीळनाडू या राज्यांमध्येही बीडमधील कामगार आहेत. आता गाळप हंगाम पुर्ण होत आला आहे. कामगारांची घरी परतण्याची वेळ झाली आहे आणि इकडे लॉकडाऊन जाहीर झाला आहे. 

या गरीब कामगारांना आता प्रशासन जिल्ह्याच्या सीमांवरच अडवेल. त्यांना बाहेरून आलात म्हणून प्रवेश दिला जाणार नाही. चार महिने कष्टाचे काम करून घरी परत येणार्यांना अशी वागणूक देणे माणूसकीला धरून होणार नाही. प्रशासन त्यांना त्रास देईल. विलगीकरणाचा आग्रह धरेल व कष्टाने केलेली त्यांची कमाई त्यातच खर्च होईल.अशी भीती राठोड यांनी व्यक्त केली. 

बरेच कामगार परत आले आहेत, मात्र आता सगळीकडचाच गाळप हंगाम संपत आल्याने परतणार्या कामगारांची संख्या फार मोठी असेल. त्यांच्यासाठी विशेष बाब म्हणून वेगळा निर्णय घ्यावा, काम करत असताना या कामगारांमुळे कोणाला कोरोनाचा त्रास झाला असे एकही ऊदाहरण एकाही कारखान्यावर नाही असे राठोड यांनी सांगितले. जिल्हाधिकारी जगताप यांनी यावर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याSugar factoryसाखर कारखानेLabourकामगारcollectorजिल्हाधिकारी