शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

बीडमध्ये तर लॉकडाऊन, होय आता कसं करायचं? ३ लाख ऊस तोडणी कामगारांसमोर प्रश्न 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 20:42 IST

घरी परतणे झाले कठीण

पुणे: बीडमध्ये १० दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे ऊसतोडणीसाठी जिल्ह्याबाहेर गेलेले ३ लाख कामगार जिल्ह्याबाहेरच अडकून राहणार आहेत. त्यांना घरी परतण्यासाठी विशेष परवानगी द्यावी अशी मागणी ऊसतोडणी कामगार संघटनांनी केली आहे. 

जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांच्याकडे महाराष्ट्र राज्य श्रमिक ऊसतोडणी कामगार संघटनेने यासंदर्भात निवेदन दिले. संघटनेचे अध्यक्ष जीवन राठोड यांनी सांगितले की जिल्ह्यातून ५ लाख मजूर साखर कारखाना गाळप हंगामात जिल्ह्याबाहेर जातात. पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र तमीळनाडू या राज्यांमध्येही बीडमधील कामगार आहेत. आता गाळप हंगाम पुर्ण होत आला आहे. कामगारांची घरी परतण्याची वेळ झाली आहे आणि इकडे लॉकडाऊन जाहीर झाला आहे. 

या गरीब कामगारांना आता प्रशासन जिल्ह्याच्या सीमांवरच अडवेल. त्यांना बाहेरून आलात म्हणून प्रवेश दिला जाणार नाही. चार महिने कष्टाचे काम करून घरी परत येणार्यांना अशी वागणूक देणे माणूसकीला धरून होणार नाही. प्रशासन त्यांना त्रास देईल. विलगीकरणाचा आग्रह धरेल व कष्टाने केलेली त्यांची कमाई त्यातच खर्च होईल.अशी भीती राठोड यांनी व्यक्त केली. 

बरेच कामगार परत आले आहेत, मात्र आता सगळीकडचाच गाळप हंगाम संपत आल्याने परतणार्या कामगारांची संख्या फार मोठी असेल. त्यांच्यासाठी विशेष बाब म्हणून वेगळा निर्णय घ्यावा, काम करत असताना या कामगारांमुळे कोणाला कोरोनाचा त्रास झाला असे एकही ऊदाहरण एकाही कारखान्यावर नाही असे राठोड यांनी सांगितले. जिल्हाधिकारी जगताप यांनी यावर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याSugar factoryसाखर कारखानेLabourकामगारcollectorजिल्हाधिकारी