शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

आरमाराविषयीचे लेखन विखुरलेले

By admin | Updated: March 30, 2017 02:45 IST

आजवरचा इतिहास केवळ जमिनीवरील लढायांवर केंद्रित झाला आहे. समुद्रातील लढायांकडे दुर्लक्ष झाले आहे.

पुणे : आजवरचा इतिहास केवळ जमिनीवरील लढायांवर केंद्रित झाला आहे. समुद्रातील लढायांकडे दुर्लक्ष झाले आहे. आरमार धोरण या दृष्टिकोनातून इतिहासाचे विश्लेषण झालेले नाही. मराठ्यांच्या आरमाराविषयीचे लेखन विखुरलेल्या स्वरूपात आहे, असे मत मुंबईतील इतिहास अभ्यासक आणि लेखक डॉ. सचिन पेंडसे यांनी व्यक्त केले.महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने सचिन पेंडसे यांच्या ‘मराठा आरमार : एक अनोखे पर्व’ या पुस्तकास शं. ना. जोशी पुरस्काराने गौरवण्यात आले. ज्येष्ठ प्राच्यविद्या अभ्यासक डॉ. अरुणचंद्र पाठक यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी मसापचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, परीक्षक डॉ. सदाशिव शिवदे, गणेश राऊत आदी उपस्थित होते.पेंडसे म्हणाले, ‘‘केवळ पुस्तके वाचून किंवा इंटरनेटवर माहिती आणि फोटो पाहून इतिहासाचा आणि किल्लयांचा अभ्यास करता येत नाही. त्यासाठी ऐतिहासिक ठिकाणांना प्रत्यक्ष भेट देऊन अभ्यास आवश्यक असतो. तसेच, या अभ्यासाचा आजच्या परिस्थितीशी संबंध जोडता यायला हवा. भारताचा नाविक इतिहास खूप प्राचीन आहे. त्याचाही अभ्यास होणे गरजेचे आहे.’’पाठक यांनी आरमार इतिहासाचा मागोवा घेतला. ते म्हणाले, ‘‘शिवाजी महाराजांच्या नौदल आरमाराचे महत्त्व बंगालच्या इतिहासकारांनी समजावून सांगितले. सागरी आक्रमण करून पोर्तुगीज भारतात आले, तेव्हा त्यांना अडवणारी कोणतीही समर्थ शक्ती अस्तित्वात नव्हती. या आक्रमकांना सत्तेच्या पलीकडे जाऊन धर्मप्रचाराचे काम करायचे होते. त्यासाठी त्यांनी नागरिकांवर अन्याय, अत्याचार केले. भारतीय इतिहास जागतिक नौकायुद्धाला प्रेरणा देणारा आहे.’’शिवदे म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजीमहाराज, कान्होजी आंग्रे आणि रामचंद्रपंत अमात्य यांनी सागरी आरमाराचे महत्त्व जाणले होते. ते महत्त्व पेंडसे यांनी अधोरेखित केले. मराठ्यांचे आरमार कसे बुडाले, हे त्यांनी लेखनातून निर्भीडपणे मांडले आहे. इतिहास अभ्यासकाला निर्भीडपणे निष्कर्ष नोंदवावे लागतात. ते त्यांने निर्भयतेने नोंदवावेत.’’ प्रकाश पायगुडे यांनी प्रास्ताविक केले. उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले.