शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

आरमाराविषयीचे लेखन विखुरलेले

By admin | Updated: March 30, 2017 02:45 IST

आजवरचा इतिहास केवळ जमिनीवरील लढायांवर केंद्रित झाला आहे. समुद्रातील लढायांकडे दुर्लक्ष झाले आहे.

पुणे : आजवरचा इतिहास केवळ जमिनीवरील लढायांवर केंद्रित झाला आहे. समुद्रातील लढायांकडे दुर्लक्ष झाले आहे. आरमार धोरण या दृष्टिकोनातून इतिहासाचे विश्लेषण झालेले नाही. मराठ्यांच्या आरमाराविषयीचे लेखन विखुरलेल्या स्वरूपात आहे, असे मत मुंबईतील इतिहास अभ्यासक आणि लेखक डॉ. सचिन पेंडसे यांनी व्यक्त केले.महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने सचिन पेंडसे यांच्या ‘मराठा आरमार : एक अनोखे पर्व’ या पुस्तकास शं. ना. जोशी पुरस्काराने गौरवण्यात आले. ज्येष्ठ प्राच्यविद्या अभ्यासक डॉ. अरुणचंद्र पाठक यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी मसापचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, परीक्षक डॉ. सदाशिव शिवदे, गणेश राऊत आदी उपस्थित होते.पेंडसे म्हणाले, ‘‘केवळ पुस्तके वाचून किंवा इंटरनेटवर माहिती आणि फोटो पाहून इतिहासाचा आणि किल्लयांचा अभ्यास करता येत नाही. त्यासाठी ऐतिहासिक ठिकाणांना प्रत्यक्ष भेट देऊन अभ्यास आवश्यक असतो. तसेच, या अभ्यासाचा आजच्या परिस्थितीशी संबंध जोडता यायला हवा. भारताचा नाविक इतिहास खूप प्राचीन आहे. त्याचाही अभ्यास होणे गरजेचे आहे.’’पाठक यांनी आरमार इतिहासाचा मागोवा घेतला. ते म्हणाले, ‘‘शिवाजी महाराजांच्या नौदल आरमाराचे महत्त्व बंगालच्या इतिहासकारांनी समजावून सांगितले. सागरी आक्रमण करून पोर्तुगीज भारतात आले, तेव्हा त्यांना अडवणारी कोणतीही समर्थ शक्ती अस्तित्वात नव्हती. या आक्रमकांना सत्तेच्या पलीकडे जाऊन धर्मप्रचाराचे काम करायचे होते. त्यासाठी त्यांनी नागरिकांवर अन्याय, अत्याचार केले. भारतीय इतिहास जागतिक नौकायुद्धाला प्रेरणा देणारा आहे.’’शिवदे म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजीमहाराज, कान्होजी आंग्रे आणि रामचंद्रपंत अमात्य यांनी सागरी आरमाराचे महत्त्व जाणले होते. ते महत्त्व पेंडसे यांनी अधोरेखित केले. मराठ्यांचे आरमार कसे बुडाले, हे त्यांनी लेखनातून निर्भीडपणे मांडले आहे. इतिहास अभ्यासकाला निर्भीडपणे निष्कर्ष नोंदवावे लागतात. ते त्यांने निर्भयतेने नोंदवावेत.’’ प्रकाश पायगुडे यांनी प्रास्ताविक केले. उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले.