शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यासाठी शिंदे मुख्यमंत्री, आमच्यासाठी फडणवीसच सर्वस्व; गणेश नाईकांचे ठाण्यात सूचक वक्तव्य
2
टीडीपीने अद्याप पत्तेच खोललेले नाहीत, भाजप टेन्शनमध्ये; लोकसभा अध्यक्षपदासाठी बैठकांचे सत्र
3
'...अन्यथा मी राजकारण सोडेन', वायभासे कुटुंबियांचे सांत्वन करताना पंकजा मुंडेंना अश्रू अनावर
4
'जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद ठेचून काढा', गृहमंत्री अमित शाह यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश
5
लोकसभेत बालेकिल्ले राखले, आता विधानसभेच्या तयारीला लागा; CM शिंदेंचे शिवसैनिकांना निर्देश
6
“NDA सरकार कोसळून इंडिया आघाडीचे सरकार येईल, प्रणिती शिंदे मंत्री होतील”; काँग्रेसचा दावा
7
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
8
निखळ सौंदर्य.. निरागस हास्य.. पिवळ्या फ्लोरल फ्रॉकमध्ये आलिया भटचा 'क्यूट' लूक (Photos)
9
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
10
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
11
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
12
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
13
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
14
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
15
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
16
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
17
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
18
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा
19
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
20
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत

जागतिक ज्येष्ठदिन : कोणी तरी बोला रे आमच्याशी थोडं...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2018 1:13 AM

वृद्धांची आर्त हाक; कुटुंबातील संवाद हरवतोय

पुणे : नटसम्राट सिनेमातील नाना पाटेकर यांचा कोणी घर देत का घर, हा डायलॉग घरातील वृद्धांची स्थिती दाखवत असल्याचे अत्यंत दुर्दैवी उदाहरण आहे. मुलांनी घराबाहेर काढल्यानंतर सिनेमात नाना पाटेकर यांच्यावर दारोदार फिरण्याची वेळ आली. मात्र प्रत्यक्ष समाजात काहींनी आई-वडिलांना घराबाहेर काढले नसले तरी त्यांच्याबरोबर कोणी संवादच साधत नसल्याने आमच्याबरोबर कोणी बोलता का रे थोडं, अशी विनवणी करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. आज जागतिक ज्येष्ठ दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांच्या भावना समजावण्याचा हा प्रयत्न आहे.

ज्येष्ठ माणसे घरात नकोच, अशी मानसिकता शहरातील नोकरदारांमध्ये वाढली आहे. त्यामुळे वृद्धांना विविध प्रकारे त्रास देऊन गावाकडे जाण्याचा इशारा मुलगा किंवा सुनेकडून दिला जातो. त्यातून वाद झाल्यास कित्येक महिने वृद्धांबरोबर संवादच साधला जात नाही. तर काही परिस्थितींमध्ये घरातील सर्व व्यक्ती नोकरीला असतात. त्यामुळे त्याचा सकाळचा वेळ घरातील काम आवरण्यात, दिवसभर आॅफिसला आणि रात्री घरी आल्यानंतर टीव्ही पाहण्यातच जातो. तर घरातील लहान मुले गेम खेळण्यात किंवा व्हॉट्सअ‍ॅपवर गप्पा मारण्यात दंग असतात. त्यामुळे वृद्धांबरोबर बोलण्यासाठी कोणीच नसते. त्यात जर घरात एकच वृद्ध व्यक्ती असेल तर त्यांना दिवस कसा घालवायचा, अशा प्रश्न रोजच पडतो. वृद्धांचे हे प्रश्न मिटविण्यासाठी राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशावरून प्रत्येक जिल्ह्यात ‘वी आर नॉट अलोन’ ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्याद्वारे ज्येष्ठ नागरिक संघटनांना एकत्र करून त्याद्वारे वृद्धांचे प्रश्न मिटविण्यात येणार आहे. समस्यांच्या गर्तेत सापडलेल्यांना प्राधिकरणाकडून समुपदेशन करण्यात येत आहे. समुपदेशनासाठी येणारे नागरिकदेखील काही उपाययोजना सुचवत असून त्या अवलंबविण्यात येणार आहे, अशी माहिती उपक्रमाचे समन्वयक सचिन राऊत यांनी दिली.

आमच्याबरोबर बोलण्यासाठी कोणीच नाही. आम्ही तुम्हाला घरचा पत्ता देतो. कोणाला तरी आमच्याबरोबर बोलण्यासाठी पाठवता का, अशी विनवणी करणारे फोन येत आहेत. त्यानुसार आम्ही त्वरित एखादा स्वयंसेवक त्यांच्या घरी पाठवतो. त्यामुळे त्यांनादेखील बरे वाटते. संबंधित स्वयंसेवक त्यांचे समुपदेशनदेखील करीत असतात. ज्येष्ठांकडे खूप अनुभव असतो, असे राऊत यांनी सांगितले.आरोग्याची समस्या गंभीरवयाबरोबर आजारही वाढत असतात. त्यामुळे समुपदेशनासाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये आरोग्याची समस्या गंभीर असल्याचे जाणवते. त्यातील काहींकडे तर दैनंदिन गोळ्या-औषधांसाठीदेखील पैसे नसल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे आरोग्याच्या मुद्द्यावर मोठ्या प्रमाणात काम होण्याची गरज असल्याचे राऊत म्हणाले.ज्येष्ठांच्या धोरणात बदल सुचवणारज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य सरकारने धोरण तयार केले आहे. मात्र त्यात काही त्रुटी आहेत. त्यामुळे त्यात काही बदल करण्यासाठी ज्येष्ठांविषयी काम करणाºया काही तज्ज्ञ व्यक्ती एकत्र येऊन काम करीत आहेत. ज्येष्ठांना अपेक्षित असलेल्या बदलांचा आराखडा लवकरच केला जाईल.

टॅग्स :Puneपुणे