शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

"G20 द्वारे नरेंद्र मोदी जगाला भारतीय संस्कृतीची ओळख करून देतील"

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2022 08:48 IST

सहमतीतून समस्या सोडवण्याचा मार्ग नरेंद्र मोदी जगाला दाखवतील, असा विश्वास भाजपचे खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी व्यक्त केला...

पुणे : जी-२० चे अध्यक्ष म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी जगाला भारतीय संस्कृतीची ओळख करून देतील. याआधीचे विकसित राष्ट्रांनी पर्यावरणाला धोका निर्माण करायचा आणि हे नुकसान इतर देशांनी भरून काढायचे हे धोरण यापुढे चालणार नाही. सहमतीतून समस्या सोडवण्याचा मार्ग नरेंद्र मोदी जगाला दाखवतील, असा विश्वास भाजपचे खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान मोदी जी-२० परिषदेचे अध्यक्ष झाल्यानंतर भारतात होणाऱ्या या परिषदेबाबत केंद्र सरकारकडून सुरू असलेल्या नियोजनाची माहिती सहस्रबुद्धे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले की, कोरोनाची साथ, रशिया युक्रेन युद्ध, हवामानातील बदल यामुळे जगभरात गोंधळ सुरू झाला आहे. विकसित देश विकसनशील देशांवर नको ते नियम लादू पाहत आहेत. अशा समस्यांचा सामना करण्यासाठी पंतप्रधान मोदी नैसर्गिक स्त्रोतांवर सर्वांची समान मालकी आणि ‘एक पृथ्वी, एक कुटुंब आणि एक भविष्य’ या सूत्रानुसार, लोकशाहीची मातृभूमी असलेल्या भारताच्या ‘वसुधैव कुटुंबकम् या सांस्कृतिक मूल्याची ओळख जगाला करून देतील.

‘युद्धाला नकार आणि शांततेचा पुरस्कार’ ही पंतप्रधानांची भूमिका या परिषदेच्या सदस्य राष्ट्रांनी स्वीकारली असून त्यासाठी जागतिक पातळीवर जनमत उभे केले जाईल, असे सहस्रबुद्धे यांनी सांगितले. जी- २० परिषदेचे २० देश सदस्य असले तरी भारताने स्पेन, नेदरलँड, इजिप्त, बांगलादेश, ओमान यासह इतर देशांनाही पाहुणे म्हणून निमंत्रित केले आहे. एकूण ४३ देशांचे प्रतिनिधी पुढील वर्षभरात भारतात येणार आहेत. महाराष्ट्रात नागपूर, पुणे येथेही बैठका होतील अशी माहिती सहस्रबुद्धे यांनी दिली.

काँग्रेस छोडो भारत जोडो

भारतीय जनता पक्षाला प्रत्येक निवडणुकीत यश मिळते आहे. पक्षाच्या ध्येयधोरणांना भारतीय जनतेकडून मिळणारा हा पाठिंबा आहे. काँग्रेस छोडो, भारत जोडो हेच हे निकाल दाखवून देतात असा टोला सहस्रबुद्धे यांनी काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचे नाव न घेता मारला.

टॅग्स :PuneपुणेNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा