शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

World Post Day : हे हाेतं या सेलिब्रेटींनी लिहीलेलं शेवटचं पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2018 18:06 IST

अाज जागतिक टपाल दिन अाहे. त्यानिमित्त सेलिब्रेटींनी शेवटचं पत्र केव्हा लिहीले हाेते हे जाणून घेण्याचा अाम्ही प्रयत्न केला.

पुणे : मामाचं पत्र हरवलं...ते मला सापडलं हा खेळ अात्ताच्या व्हाॅट्सअॅपवरील तरुणाईला क्वचितच अाठवत असेल. मनातील भावना शब्दात मांडून ते पत्र अापल्या व्यक्तीपर्यंत पाठवून त्याचे उत्तर येईपर्यंत मनाला लागणारी हुरहुर अाताच्या लास्ट सिनमध्ये येणार नाही. तंत्रज्ञान कितीही प्रगत झालं तरी पत्राचं, टापालाचं प्रत्येकाच्या मनात वेगळं स्थान अाहे. पत्र वाचून ज्या भावना मनात प्रकट हाेतात त्या मेसेज वाचून कदाचित हाेणार नाहीत. तंत्रज्ञान जसजसं प्रगत हाेत गेलं टपाल तसतसं मागे पडत गेलं. अापल्यातील प्रत्येकाला अापण शेवटचं पत्र केव्हा अाणि काेणाला लिहीले अाहे, हे अाठवत ही नसेल. विविध कलेतून संदेश अापल्यापर्यंत पाेहचवणाऱ्या कलाकारांनी त्यांच्या अायुष्यात शेवटचं पत्र केव्हा लिहीलं हे अाम्ही जाणून घ्यायचा प्रयत्न केला. 

    अमेय वाघ अाणि पत्राचं एक वेगळंच नातं अाहे. त्यानी लिहीलेल्या पत्रांची कहाणी भन्नाट अाहे. नववीत असताना एका अांतरशाेलेय स्पर्धेत एका मुलीशी त्याची अाेळख झाली हाेती. त्यानंतर ती त्याची चांगली मैत्रिण झाली. पुढे अनेक वर्ष त्यांचा पत्र व्यवहार सुरु हाेता. अमेय म्हणताे या पत्रव्यवहारातून अामची निखळ मैत्री अाणखिनच वृद्धिंगत झाली. तीलाच कदाचित शेवटचे पत्र लिहीले असेल. नवीन तंत्रज्ञान अापण अात्मसात करायलाच हवे परंतु लिहिलेल्या पत्रांची वेगळीच गम्मत हाेती. कुठल्याही गाेष्टीच्या हार्ड काॅपीचे अापल्या अायुष्यात महत्व असते. पत्र हे स्वतःच्या हाताने लिहीलेले असल्याने शब्दांमध्ये लिहीणाऱ्याच्या भावना उतरलेल्या असतात. मी अनेक जुनी पत्र अजूनही जपून ठेवलेली अाहेत. 

    पत्रांमुळे अक्षय टंकसाळे अाणि त्याच्या अाजीचं नातं अधिकच घट्ट झालं. लहाणपणी अक्षय अाजीकडे गेल्यानंतर त्याची अाजी तीला अालेली पत्रे अक्षयकडून वाचून घेत असत. त्याचबराेबर काही पत्रांना अक्षयकडून उत्तर लिहून घेत असत. अक्षयला ही पत्रे वाचायला तसेच पत्रांना उत्तर द्यायला खूप मजा यायची. ती मजा व्हाॅट्सअॅप मेसेजिंग मध्ये नसल्याचे ताे सांगताे. तसेच इतकी वर्ष उन्हातान्हात घराेघरी पत्र घेऊन जाणारे पाेस्टमन अजूनही सायकल वापरतात याचे त्याला दुःख हाेते. त्यांना शासनाने दुचाकी द्यावी अशी त्याची मागणी अाहे. 

    टपाल ही अाता दुर्मिळ हाेत चाललेली गाेष्ट अाहे, याचं सावनी रविंंद्रला वाईट वाटतं. काेणाच्या तरी पत्राची वाट बघण्यात एक वेगळीच उत्सुकता हाेती असं तीला वाटतं. लहानपणी पत्रातून सावनी अाजी-अाजाेबांशी संवाद साधायची. सावनी म्हणते, माझं बालपण चिंचवडमध्ये गेलं. माझं अाजाेळ काेकणात असल्याने लहानपणी अाजी-अाजाेबा मला पत्र पाठवायचे. त्यांच्या पत्रांची मी नेहमी वाट पाहायचे. अामच्या काेकणातील दापाेलीच्या घरातच छाेटसं पाेस्ट अाॅफिस हाेतं. त्यामुळे पूर्वी अनेक लाेक अामचं पत्र अाला का याची विचारणा करण्यासाठी येत असतं. पूर्वी भावनांना अधिक महत्व हाेतं. पत्र हे त्याचं मुख्य कारण हाेतं. हे सगळं अनुभवायाला मिळत नाही याची कुठेतरी खंत वाटते. मी पाेस्टाने केलेला शेवटचा व्यवहार म्हणजे लहानपणी मी राखी पाेस्टाने माझ्या भावंडांना पाठवली हाेती. 

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसCelebrityसेलिब्रिटीAmey Waghअमेय वाघ