शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

वर्ल्ड बायोडायव्हर्सिटी डे' : नाल्याच्या पाण्यावर पोसली २७ हजार झाडांची वनराई : 'ग्रीन थंब'चा उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 06:45 IST

कोविड काळात नाल्यावर फुलले नंदनवन..... 

लक्ष्मण मोरे

 पुणे : नाल्यामधून नदीपात्रात जाणाऱ्या मैलापाण्यामुळे खालील गावांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. हे पाणी नदीमध्ये जाऊ नये याकरिता कोविड काळात घोरपडी येथील सोपानबागे शेजारील नाल्यावर सुरू झाला अनोखा प्रयोग. नाला खोलीकरण-रुंदीकरण करून  दीड वर्षात तब्बल २७ हजार झाडे लावण्यात आली. नाल्याचे पाणी वळवून पाच तळ्यांमध्ये आणण्यात आले. हे पाणी झाडांना देण्यात आले. आजमितीस याठिकाणी पपई, पेरू, केळी, नारळ आदी फळझाडे लगडली आहेत. तर, अनेक प्रकारची फुलझाडे बहरून डोलू लागली आहेत. सगाचीही लागवड करण्यात आली आहे. ही किमया साधली आहे 'ग्रीन थंब' या संस्थेच्या पुढाकारातून. लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) सुरेश पाटील यांच्या ग्रीन थंब संस्थेने यापूर्वी खडकवासला धरणातील गाळ काढून तेथेच सुंदरशी वनराई फुलवली आहे. कोरोना काळात सर्वाधिक आवश्यकता भासते आहे ती ऑक्सिजनची आणि या नाला गार्डनमध्ये ऑक्सिजन पार्क निर्माण झाले आहे. या उपक्रमात अनेक पर्यावरण प्रेमी गटही सहभागी झाले आहेत. लोकसहभागातून याठिकाणी जमिनीचे सपाटीकरण करण्यात आले. विविध प्रजातींची तब्बल २७ हजार झाडे लावण्यात आली. यामध्ये १३ हजार बांबूच्या झाडांचा समावेश आहे. तब्बल दोन किलोमीटरचा परिसर हिरवागार आणि निसर्गरम्य करण्यात आला आहे. -----नाल्याच्या पाण्यामध्ये नायट्रोजन, कॅल्शियम यासोबतच झाडांना आवश्यक असलेली सर्व पोषणमूल्ये असल्याने झाडांना त्याचा फायदा झाला. ही झाडे आठ नऊ महिन्यांची असली तरी त्याची वाढ आठ ते दहा वर्षांची झाडे असल्यासारखी झाली आहे. वर्षभरातच झाडांना फळे - फुले धरू लागली आहेत. नाल्याच्या पाण्यावर फुलवलेली ही बाग पाहून अनेक तरुण आणि उत्साही नागरिक या कामात जोडले जाऊ लागले आहेत.

-----पुण्यामध्ये महत्वाचे सात ओढे आहेत. त्यांचे आता नाले-गटार झाले आहेत. यातील हा नाला एक आहे. मागील वर्षी शहरात पूर आलेला असतानाही या नाल्याचे खोलकरण आणि रुंदीकरण करण्यात आल्याने इथे मात्र पूर आला नाही. तसेच झाडेही सुरक्षित राहिली.-----या कामामध्ये प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी मोठी मदत केली. त्यांनी ही वनराई फुलविण्यासाठी यंत्र सामुग्री दिली आहे. या नाल्याची वनराई आता भैरोबानाल्यापर्यंत वाढविली जाणार आहे. या कामासाठीही पाटेकर यांनी मदत देण्याची तयारी दर्शविली आहे.-----पूर्वी या नाल्याचा परिसर रुक्ष होता. याठिकाणी झाडांची लागवड करण्यात आली. मोरांसाठी मक्याची झाडे लावण्यात आली. तर, पोपटांसाठी सूर्यफूल लावण्यात आले. आता या बागेत मोर, पोपट, चिमण्या, बुलबुल आदी पक्षी स्वच्छंदी विहार करीत आहेत.

----मी माझ्या मित्रांच्या सोबतीने या बागेत आलो होतो. लेफ्ट. कर्नल पाटील साहेबांनी उभ्या केलेल्या कामामुळे मी भारावून गेलो आहे. मी या कामात सहभागी झालो असून निसर्गठेवा जपण्यासाठी आणि हे नंदनवन आणखी फुलविण्यासाठी या मोहिमेत काम करीत आहे. भविष्यात ही बाग भैरोबा नाल्यापर्यंत विकसित करण्याचे नियोजन केले आहे. पुणेकरांना अभिमान वाटावा असा नैसर्गिक ठेवा याठिकाणी निर्माण झाला आहे.- वजीर शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नागपूर शहर, रा. पुणे------नदीपात्रातून जाणाऱ्या आपल्या मैलापाण्यामुळे पुढील ग्रामस्थांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांना विविध आजार होत आहेत. नदीपात्रात हे पाणी जाऊ नये याकरिता नाल्याचे पाणी वळविण्यात आले. पाच तळ्यांमधून हे पाणी झाडांना देण्यात येत आहे. याठिकाणी २७ हजार झाडे लावण्यात आली. नाल्याच्या पाण्यावर ही बाग जोपासण्याचा यश आले आहे. केवळ लोकसहभागातून हें शक्य झाले आहे. नागरिकांनी आपापल्या शहरात-भागात वनराई उभी करण्यासाठी पुढाकार घ्यावा. येणाऱ्या पिढीला 'ऑक्सिजन' देऊयात.- सुरेश पाटील, लेफ्ट. कर्नल (निवृत्त), संस्थापक, ग्रीन थंब

टॅग्स :Puneपुणेenvironmentपर्यावरणWaterपाणीNatureनिसर्ग