शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

पुण्यातील एक हजार गावात वीज अटकाव यंत्रणा बसवण्याचे काम सुरु; मात्र ग्रामस्थांना काही माहीतच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 11:07 IST

जिल्हाधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन,  सार्वजनिक बांधकाम मात्र अंधारात

ठळक मुद्देवीज अटकाव यंत्रणा बसवल्याचे स्थानिकांना माहीतच नाही

पुणे : पुणे जिल्ह्यासह गडचिरोली आणि चंद्रपूर या तीन जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर वीज अटकाव यंत्रणा बसविण्यात येत आहे. यासाठी थेट मंत्रालयातून तब्बल ५८ कोटींची टेंडर प्रक्रीया राबविण्यात आली व ठेकेदारांची नियुक्ती करण्यात आली. या अंतर्गत पुणे जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ८५५ व नंतर २०० गावांमध्ये ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे. परंतु याबाबत पुणे जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात किती गावांत ही यंत्रणा बसविण्यात येणार,  आता पर्यंत कुठे बसविण्यात आली, कामाची प्रगती या संदर्भात ना जिल्हाधिकारी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किंवा पुणे बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता यांना काहीच माहिती नाही. जिल्ह्यातील शेकडो गावांमध्ये ही वीज अटकाव यंत्रणा बसविण्यात येत असताना जिल्हास्तरावरील सर्वच यंत्रणांना मात्र अंधारात ठेवण्यात आले आहे. 

दर वर्षी मान्सूनपूर्व पावसात जिल्ह्यात वीज पडण्याच्या अनेक घटना घडतात. यात पुणे जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत ७ लोकांचा वीज पडून मृत्यु झाला. तर काही ठिकाणी मोठी वित्त हानी देखील झाली आहे. या पार्श्वभूमीवरच राज्य शासनाने प्रायोगिक तत्त्वावर पुणे, चंद्रपूर आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यात वीज अटकाव यंत्रणा बसविण्यात येत आहे. यामध्ये चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील शंभर टक्के गावे आणि पुणे जिल्ह्यातील ८५५ गावांमध्ये ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे. यासाठी तब्बल ५८ कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे. 

वीज अटकाव यंत्रणा बसवल्याचे स्थानिकांना माहीतच नाही 

एका गावात हे यंत्र बसविण्यासाठी सरासरी दोन लाखांपेक्षा अधिक खर्च येतो. जिल्ह्यात आता पर्यंत ६६८ गावांमध्ये ही यंत्रणा बसविण्यात देखील आली असल्याचे मंत्रालयातून सांगण्यात आले. परंतु पुणे जिल्ह्यात स्थानिक प्रशासनाला मात्र याची कल्पना देखील नाही. खरच या गावांमध्ये ही यंत्रणा बसली आहे का, यंत्रणा बसविल्यानंतर देखभाल दुरूस्तीचे काय, यंत्रणा चालु किंवा बंद कसे कळणार, काही अडचण आल्यास स्थानिक प्रशासनाला कुणाकडे संपर्क करायचा याबाबत कोणत्याही प्रकारची स्पष्टता नाही. स्थानिक प्रशासनाकडे चौकशी केली असता काही माहिती नसल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यातील काही गावांमध्ये चौकशी केली असता त्यांना देखील आपल्या गावांत अशी काही यंत्रणा बसविण्यात आल्याचे सरपंच, तलाठी, ग्रामसेवक यांना कल्पना नाही. कोट्यवधी खर्च करून बसविण्यात येत असलेल्या वीज अटकाव यंत्रणेच्या मुंबई कनेक्शनमुळे स्थानिक मात्र सर्वच अंधारात आहेत. 

नियोजन व नियंत्रण मंत्रालयातूनच 

जिल्ह्यातील लोकांच्या फायद्यासाठी, सोयीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करुन बसविण्यात येत असलेल्या वीज अटकाव यंत्रणेचे नियोजन आणि नियंत्रण पूर्णपणे मंत्रालयातून करण्यात येत आहे. यासाठी सेंटर पध्दतीने टेंडर देण्यात आले आहे. देखभाल दुरुस्तीची जबाबदारी पाच वर्षांसाठी संबंधित ठेकेदारांची आहे. पण यंत्रणा चालु किंवा बंद पडली याची मंत्रालयातून कधी तरी रँडमली तपासणी करण्यात येणार असल्याचे मंत्रालयातील बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता पाटील यांनी सांगीतले. यंत्रणा चोरीला गेली, बंद पडली, गावाला काही अडचण आली तर कुणाला संपर्क करायचा यांचे कोणतेही उत्तर याचे काम पाहणारे अधीक्षक अभियंता पाटील यांना देता आले नाही.

टॅग्स :PuneपुणेelectricityवीजGovernmentसरकारcollectorजिल्हाधिकारीRural Developmentग्रामीण विकास