शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

Women's Day 2019 : हाेय... आम्हाला राजकारण करायचंय !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2019 20:36 IST

राजकारणातच करिअर करायचं असं म्हणणाऱ्या काही युवती असून त्यांना राजकारणात येऊन एक आदर्श समाज घडवायचा आहे.

पुणे : राजकारण हे पैसेवाल्यांच काम आहे. आपल्याला जमणार नाही, अशी सर्वसामान्य लाेकांची धारणा असते. राजकारण नकाेच असाच काहीसा सूर सामान्य कुटुंबातून उमटत असताे. त्यातही जर मुलीनेे राजकारण करायचं म्हंटलं तर अनेकदा घरुन तीव्र विराेध हाेत असताे. हे चित्र आता बदलण्यास सुरुवात झाली आहे. राजकारणातच करिअर करायचं असं म्हणणाऱ्या काही युवती असून त्यांना राजकारणात येऊन एक आदर्श समाज घडवायचा आहे. संध्या साेनवणे, शर्मिला येवले आणि कल्याणी माणगावे या पुण्यात शिक्षण घेणाऱ्या तरुणी राजकारणाकडे करिअर म्हणून पाहतायेत. 

सध्या पुण्यातील विविध महाविद्यालयांमध्ये या तिघी शिक्षण घेत आहेत. डाॅक्टर, इंजिनिअर, वकील हे पारंपारिक करिअरचे पर्याय न निवडता या तरुणींनी राजकारणात करिअर करण्याचे ध्येय मनाशी बांधले आहे. राजकारण हे केवळ पुरुषांनी करायचे, पैसेवाल्यांचे काम असल्याचा समज त्या पुसून टाकण्यासाठी पाऊले टाकत आहेत. त्यांचे विचार पक्के आहेत आणि त्यांची वाटचालही ठरली आहे. व्यवस्था बदलण्यासाठी युवकांनी राजकारणात येणे गरजेचे असल्याचे त्या म्हणतात. मुलगी ही मुलापेक्षा कुठेही कमी नाही मग ते राजकारण का असेना, त्यामुळे यात करिअर करण्यासाठी आणि राजकारणात माेठी पदे भूषवण्यासाठी त्या कष्ट करण्यास तयार आहेत. 

संध्या ही राष्ट्रवादी युवती काॅंग्रेसची अहमदनगरची जिल्हाध्यक्ष म्हणून काम करते, संध्या राजकारणात करिअर करण्याबाबत म्हणते, राजकारणात पुरुषांची मक्तेदारी आहे, असं आपण आजपर्यंत ऐकत आलाे आहे. ज्या महिला राजकारणात आहेत त्या सुद्धा याेगायाेगाने किंवा राजकारणी कुटुंब असल्याने राजकारणात आल्याचे सांगतात. परंतु मी राजकारणाकडे एक करिअर म्हणून पाहत आहे. लहानपणीची करिअर बाबतची स्वप्ने वेगळी असतात. परंतु ज्यावेळी  महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना आपण नेतृत्व करु शकताे, एखाद्या मुद्दा मांडू शकताे, तसेच आपण सामान्य जणांचा आवाज बनू शकताे असे जेव्हा वाटले तेव्हा राजकारणातच करिअर करायचे असे मनाशी पक्के ठरवले. आपल्यातील गुणांना आपण वाव दिल्यास राजकारणात देखील महिला आपला वेगळा ठसा उमटवू शकतील. राजकारणात येऊ इच्छिणाऱ्या युवक युवतींना मला सांगावेसे वाटते की राजकारण म्हंटलं की तेथे प्रस्थापितांचं वर्चस्व असतं, आपला तेथे निभाव लागणार का असा न्यूनगंड बाळगण्याची अजिबात गरज नाही. आपल्या काैशल्याच्या जाेरावर तसेच आपल्या प्रश्नांवर आवाज उठवत तुम्ही या क्षेत्रात यायला हवे. परिणामी तुमच्या मागण्यांंसाठी रस्त्यावर उतरण्याची गरज जरी पडली तरी रस्त्याावर उतरा. नक्कीच तुमची राजकारणात याेग्य ती दखल घेतली जाईल. 

स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेचे राज्य उपाध्यक्ष म्हणून काम करणारी शर्मिला येवले म्हणते, लहानपणीपासूनच शेतकरी चळवळ पाहत आली आहे. माझ्या आजूबाजूला सगळे चळवळीचे वातावरण हाेते. वयाच्या 12 व्या वर्षी आंदाेलनात सहभाग घेतला. पुढे जाऊन आपणही नेतृत्व करु शकताे हे लक्षात आले. आपल्याकडे ज्ञान असेल तर त्याचा वापर आपण नक्कीच करु शकताे. त्यामुळे मी राजकारणात यायचे ठरवले. सुरुवातीपासूनच विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील त्यांचा पाठपुरावा केला आहे. कुठलिही राजकीय पार्श्वभूमी नसताना केवळ आपण नेतृत्व करु शकताे या आत्मविश्वासावर मी राजकारणात पाऊल ठेवले आहे.ज्यांना राजकारणात यायचे आहे त्यांना एवढंच सांगिन की राजकारण हे वाईट नाही. तुम्ही जर तुमचे प्रश्न, तुमची महत्त्वकांक्षा घेऊन या क्षेत्रात आला तर तुम्ही नक्कीच चांगले काम करु शकाल.  

महाराष्ट्र प्रदेश युवक काॅंग्रेसची पश्चिम महाराष्ट्र युवती समन्वयक कल्याणी माणगावे म्हणते, सामान्य कुटुंबातून राजकारणात येणाऱ्या मुलीला कुठलाही राजकीय वारसा नसताे. त्यामुळे व्यक्ती व्यक्तीपर्यंत पाेहचणे हा माेठे चॅलेंज असते. अनेकदा एक मुलगी आपले प्रश्न साेडवू शकणार नाही असा समाजाचा मुलींकडे पाहण्याचा दृष्टिकाेन असताे. नावाला केवळ महिला राजकारणात आहेत हा समज जर बदलायचा असेल तर युवतींनी पुढे येऊन राजकारणात भाग घ्यावा लागेल. त्याचबराेबर लाेकांमध्ये जाऊन काम करणे गरजेचे आहे. राजकारणात येऊन खूप पैसे मिळवायचे हा दृष्टिकाेन राजकारणात येऊ इच्छिणाऱ्या तरुणांनी बदलायला हवा. हे पैसे मिळविण्याचे नाही तर समाजसेवेचे क्षेत्र आहे. राजकारण म्हणजे सामान्यजणांचे प्रश्न देशातील सर्वाेच्च सदनात मांडण्याची तुम्हाला संधी असते. लाेकांचे राहिणीमान तुम्हाला उंचवायचे असेल तर तुमच्याकडे कष्ट करण्याची तयारी पाहिजे. राजकारणात स्पर्धा असली तरी तुमची जर काम करण्याची वृत्ती असेल तर तुम्ही राजकारणात नक्की यशस्वी हाेऊ शकाल. 

टॅग्स :Women's Day Specialजागतिक महिला दिनPoliticsराजकारणStudentविद्यार्थी