शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

"आमच्या मंत्रिमंडळात महिलांना योग्य प्रतिनिधित्व मिळणार", विरोधकांना फडणवीस यांचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2022 17:43 IST

आता मंत्रिमंडळाचा विस्तार पण झाला आणि सरकारही मजबूत

पुणे : मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही, हे सरकार लवकर पडेल असं काही लोक म्हणत होते. पण आता मंत्रिमंडळाचा विस्तार पण झाला आणि सरकारही मजबूत आहे. राज्याला महिला मंत्री नाही याबाबत जो आक्षेप घेतला जातोय. तो लवकरच दूर होऊन महिलांना योग्य प्रतिनिधित्व आमच्या मंत्रिमंडळात मिळणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे हर घर तिरंगा या उपक्रमाच्या शुभारंभासाठी ते आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.   

फडणवीस म्हणाले, आक्षेप घेणाऱ्यांनी सुद्धा पहिल्यांदा विस्तार केला तेव्हा पाच मंत्री घेतले. त्यात कुठलीही महिला घेतली नव्हती. त्यांना असं बोलण्याचा काही अधिकार नाही. संजय राठोड यासंदर्भात बोलताना फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले,  ज्या पक्षाचे दोन मंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जेलमध्ये आहेत. आणि अनेक नेत्यांवर त्या ठिकाणी खटले सुरु असतील, अशा पक्षाने अशा प्रकारची यादी टाकण्याचा त्यांना नैतिक अधिकार आहे का? असा प्रश्न फडणवीस यांनी विचारला. पहिल्यांदा त्यांनी आरसा पाहावा आणि नंतर त्यांनी अशा प्रकारची टीका करावी असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.  

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा अखेर 39 दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. शिंदे गटाचे 9 तर भाजपचे 9 असे एकूण 18 मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. मात्र, या मंत्रिमंडळात एकाही महिलेला स्थान देण्यात आलेलं नाही. त्यावरुन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह विरोधकांनी शिंदे आणि फडणवीस सरकारवर टीका केली होती. तसेच संजय राठोड यांच्यावरील गंभीर आरोप आणि अब्दुल सत्तार यांच्या टीईटी परीक्षेच्या प्रकाराबाबत अनेकांनी सवाल उपस्थित केले होते. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSupriya Suleसुप्रिया सुळेEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसSanjay Rathodसंजय राठोड