शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

'प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये महिला तक्रार निवारण कक्ष स्थापन करा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2021 20:40 IST

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री यांनी याबाबत आता कठोर पावले उचलण्याची गरज आहे. इतर देशाच्या धरतीवर महाराष्ट्रात कायदा कडक करावा

पुणे: राज्यात दिवसेंदिवस महिला, मुलींवर अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. पुण्यातदेखील एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीवर चाकूने हल्ला करून निर्घृण खून करण्यात आला. महिला व मुलींच्या अत्याचारावरील कायदा कडक करून सर्व तालुक्यांत पोलीस स्टेशनमध्ये महिला तक्रार निवारण कक्ष स्थापन करावे, अशी मागणी पुण्यातील संघटनांनी केली आहे. याबाबत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (balasaheb thorat) यांना भेटून निवेदन दिले.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री यांनी याबाबत आता कठोर पावले उचलण्याची गरज आहे. इतर देशाच्या धरतीवर महाराष्ट्रात कायदा कडक करावा. तसेच २१ दिवसांच्या आत आरोपींना फाशीची शिक्षा करावी. तरच यापुढे अशा घटना होणार नाहीत. याशिवाय अशाप्रकारचे गुन्हे करणाऱ्या आरोपींची माहिती एकत्र करून त्यांच्यावर तातडीने कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. रस्त्यावरील महिला आणि मुलांसाठी योग्य निवारा आणि पुनर्वसन यालाही प्राधान्य देणे आवश्यक आहे, अशी मागणी प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष सुरेखा ढवळे यांनी केली.

मुंबईतील साकीनाका येथील महिला अत्याचार, ससून हॉस्पिटलमधून तीन महिन्यांच्या मुलीला पळवणे, पुणे रेल्वे स्टेशनच्या आवारात सहा वर्षांच्या मुलीवर रिक्षाचालकाने केलेला अत्याचार, जुन्नर येथील आळेफाटा येथे १६ वर्षीय मुलीची फसवणूक करून तिच्यावर अत्याचार करून घरातील बावीस तोळे सोने लंपास केले; तर नुकतेच बिबवेवाडीत अल्पवयीन मुलींची झालेली हत्या या सर्व घटना संतापजनक आणि दुःखद आहे. अशा घटनांनंतर चर्चासत्रे होतात, राजकीय आरोप-प्रत्यारोप होतात, पण पुढे काहीच ठोस होत नाही, असे सुरेखा ढवळे म्हणाल्या.

टॅग्स :Puneपुणेpimpri-acपिंपरीCrime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्रWomenमहिलाPoliceपोलिस