शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्रिया कर्तृत्व दाखवू शकतात - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2022 09:08 IST

नवनवीन विषय घेऊन त्यांचे व्यक्तिमत्त्व घडवले पाहिजे

वानवडी : लहान वयातच मुला- मुलींच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होत असतो. त्यामुळे नवनवीन विषय घेऊन त्यांचे व्यक्तिमत्त्व घडवले पाहिजे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्रिया कर्तृत्व दाखवू शकतात असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. 

वानवडीतील महात्मा फुले सांस्कृतिक भवन येथे रयत शिक्षण संस्था पश्चिम विभाग पुणे आणि अण्णासाहेब आवटे महाविद्यालय मंचर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शरद रयत चषक आंतर महाविद्यालय राज्यस्तरीय वक्तृत्व आणि निबंध स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभावेळी शरद पवार बोलत होते. यावेळी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, शिक्षण संस्थेचे चेअरमन अनिल पाटील उपस्थित होते.

स्त्रियांना संधी देण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. हे जर रयतेमध्ये घडले तर ते सामान्य कुटुंबापर्यंत जाईल. रयतेमध्ये हे घडवायची जबाबदारी आपली सर्वांची असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त कोरोनाकाळात ऑनलाइन राज्यस्तरीय निबंध व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. निबंध स्पर्धेत यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय आंबेगावमधील इयत्ता दहावीतील आविष्कार रमेश वैरागर याचा प्रथम क्रमांक आला. महाविद्यालयीन स्तरावरील या स्पर्धेत प्रथम फेरीत महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यांतून ६७० स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घेतला. यामध्ये मुलींचा सहभाग ७५ टक्के एवढा उल्लेखनीय होता. प्रथम फेरीतून सुपर ८१ स्पर्धकांची निवड करण्यात आली. या स्पर्धेत ३६ जिल्ह्यातील मुला- मुलींनी भाग घेतलेला आहे. या स्पर्धेत शरद रयत चषकाचा मानकरी गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या मुलींचा संघ ठरला आहे.

टॅग्स :WanvadiवानवडीSharad Pawarशरद पवारWomenमहिलाSocialसामाजिक