शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

पुण्यात वकील महिलेचा विनयभंग करून खंडणीची मागणी; पोलिसांनी केले दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 08:00 IST

फेसबुक व युट्यूब चॅनेलच्या माध्यमातूनही त्यांची बदनामी केली....

पुणे : वकीलपत्र सोडण्यासाठी दबाव टाकून महिला वकिलाचा विनयभंग करीत खंडणी मागण्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयाने कोंढवा पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे. कॅन्टोन्मेंट न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सी. एन. ओंडारे यांनी हा आदेश दिला आहे.

त्यानुसार वसीम इकबाल खान (वय ३५), नदीम सय्यद (वय ३५), भरत जाधव (वय ५८) आणि अतीका नदीम सय्यद (वय ३२, सर्व रा. सनशाईन हिल्स, पिसोळी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. याबाबत एका तक्रारदार वकील महिलेने न्यायालयात ॲड. साजिद शाह, ॲड. अमित मोरे यांच्यामार्फत खासगी तक्रार दाखल केली होती.

ॲड. शाह यांनी सांगितले की, तक्रारदार महिला ही वकील असून सोसायटीमधील गैरव्यवहारात सहभागी असलेल्यांविरोधात कारवाई करण्यासाठी सोसायटीतील नागरिकांनी तक्रारदार महिलेची कायदेशीर सल्लागार म्हणून नेमणूक केली होती. हे संशयित आरोपींना समजल्यानंतर त्यांनी तक्रारदारावर व त्यांच्या परिवाराला मानसिक, शारीरिक त्रास देत कायदेशीर मदत न करण्याची धमकी दिली. परंतु आरोपींच्या दबावाला त्या बळी पडल्या नाहीत. त्यांच्यावर पाळतही ठेवली जात असल्याने त्यांनी याबाबत संशयितांना विचारणा केली. त्यावेळी यातील एकाने मी एका टोळीचा सदस्य असल्याचे सांगत ही केस सोडण्याची व तिचे अपहरण करण्याची धमकी दिली. कोंढवा पोलिसांनी त्यांची तक्रार घेतली नाही. त्यानंतर १६ जानेवारीला आरोपींपैकी एकाने अपमानजनक व अश्लील शब्द वापरून फिर्यादीचा विनयभंग केला. तसेच त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचेही न्यायालयीन तक्रारीत म्हटले होते.

पोलिसांनी केले दुर्लक्ष

फेसबुक व युट्यूब चॅनेलच्या माध्यमातूनही त्यांची बदनामी केली. तसेच त्यांच्या घराबाहेरील सीसीटीव्ही तोडून टाकले, दरवाजा तोडून घरात घुसण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांच्या घराच्या भिंतीवर पत्र चिकटवून ३० हजारांची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद करताना पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतल्याचे म्हटले. त्यावर न्यायालयाने याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश कोंढवा पोलिसांना दिले आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी