शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

ही हिंमत गुंडांपुढे दाखवाल का? हॉटेल चालकाला चतु:श्रृंगी पोलिसांकडून नाहक त्रास

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2024 14:57 IST

शहरात रात्री दीड वाजेपर्यंत हॉटेल्स सुरू ठेवण्यास परवानगी असतानाही पोलिसांनी रात्री ११ वाजता हॉटेल बंद करण्यासाठी हॉटेलमध्ये घुसून मालकासह दोघांना मारहाण करत गाडीत कोंबले

पुणे : शहरात रात्री दीड वाजेपर्यंत हॉटेल्स सुरू ठेवण्यास परवानगी आहे. असे असताना देखील चतुःश्रृंगी पोलिसांनी मात्र सोमवारी (दि. ९) रात्री सव्वा अकरा वाजता हॉटेल बंद करण्यासाठी हॉटेलमध्ये घुसून मालकासह दोघांना मारहाण करत गाडीत कोंबले. एवढेच नाही तर हॉटेल मधील साहित्याची मोडतोड करून धमकावले. एकाचवेळी तीन गाड्यांचा ताफा घेऊन पोलिस ही कारवाई करण्यासाठी आले होते. दुसरीकडे शहरात गुंडांचा धुडगूस सुरू आहे. खुनाचे सत्र थांबता थांबत नाहीये. रस्तोरस्ती जबरी चोरट्यांची दहशत कायम आहे. असे असताना, प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना विशिष्ट हेतू ठेवून धमकावले जात असेल तर, पोलिस ही पोलिसगिरी गुंडांपुढे दाखवण्यात का अयशस्वी होत आहेत, असा संतप्त सवाल व्यवसायिकांनी उपस्थित केला आहे.

ज्ञानेश्वर पादुका चौकातील एका हॉटेलमध्ये सोमवारी रात्री हा प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे याचवेळी चतुःश्रृंगी हद्दीतील बाणेर, बालेवाडी, औंध, सेनापती बापट रस्ता परिसरातील सर्व हॉटेल्स, अंडाभुर्जीच्या गाड्या, पान टपऱ्या रात्री उशिरापर्यंत चालू होत्या. कदाचित पोलिसांच्या नजरेस हे दिसले नसावे.मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेल मालक हॉटेल बंद करण्याच्या तयारीत होते. रात्रीचे ११ वाजून १४ मिनिटे झाली होती. तेवढ्यात चतुःश्रृंगी पोलिसांच्या तीन गाड्यांचा ताफा तेथे आला. त्यामध्ये एक सीआर मोबाइल, पीटर मोबाइल व अन्य एक डीबीची गाडी असावी. हॉटेलचे गेट बाहेरून बंद होते. पांढरा शर्ट घातलेले पोलिस कर्मचारी आतमध्ये आले. त्यांच्या हातात काठ्या होत्या. पोलिसांनी गल्ल्यावर बसलेल्या हॉटेल मालकाला धक्काबुक्की करत बाहेर ओढले. एखाद्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी असल्यासारखे समजून त्याच्या मानगुटीला पकडून बाहेर ओढले. त्याचवेळी त्याच्या पाठीत पोलिसाने काठी मारली. तुला समजत नाही का? पोलिस आल्यानंतर गाडीत जाऊन बसायचे असे म्हणून धमकावले. त्यानंतर हॉटेलमधील आचाऱ्याला पकडून मारहाण करत गाडीत बसवले. त्याच्या हाताला काठीचा मार लागला. पोलिसांनी हॉटेल सुद्धा त्यांना बंद करू दिले नाही. त्यानंतर दोघांना गाडीत बसवून, आधी वडारवाडी पोलिस चौकीत नेले त्यानंतर पोलिस ठाण्यात आणले.

तेथे हॉटेल मालकाला मी रात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरू ठेवले, असे लिहून देण्यासाठी धमकावले. रात्री उशिरापर्यंत त्यांना बसवून ठेवून सोडून देण्यात आले. पोलिसांच्या अशा वर्तणुकीमुळे सर्वसामान्य नागरिकांनी पोलिस ठाण्यात जावे की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी अशा पदाचा गैरवापर करणाऱ्या संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी देखील होत आहे.

टॅग्स :Puneपुणेchatushrungi policeचतु:श्रृंगी पोलीसhotelहॉटेलGovernmentसरकारCrime Newsगुन्हेगारी