शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
2
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
3
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
4
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
5
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
6
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
7
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
9
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
10
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
11
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
12
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
13
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
14
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
19
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
20
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
Daily Top 2Weekly Top 5

वाघोलीतील कचऱ्याने महापालिकेचे डोकेदुखी वाढणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:13 IST

वाघोली : वाघोली गाव लवकरच पुणे महापालिकेत समाविष्ट होण्यासाठी प्रशासकीय स्तरांवर जोरदार तयारी झाली आहे. वाढत्या नागरीकरणाबरोबर नागरी सुविधा ...

वाघोली : वाघोली गाव लवकरच पुणे महापालिकेत समाविष्ट होण्यासाठी प्रशासकीय स्तरांवर जोरदार तयारी झाली आहे. वाढत्या नागरीकरणाबरोबर नागरी सुविधा देखील उपलब्ध करून देण्याचे आव्हान महापालिकेसमोर असणार आहे. आताचा विचार केला तर वाढत्या लोकसंख्येबरोबर वाघोलीमधील कचऱ्याची मोठी समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होत आहे.

वाघोलीत नगर रोड, केसनंद रोड, आव्हाळवाडी रोड, लोहगाव रोड, वाघोली, खांदवेनगर येथील हद्द येथे रोडच्या कडेला सर्रासपणे जागोजागी नागरिकांच्या कडून कचरा टाकला जात आहे. तर हाॕॅटेल व्यावसायिक, सोसायटीधारक, नागरिक यांच्याद्वारे जाता येता कचरा थेट रस्त्यांच्या कडेला दुचाकीवरून किंवा चारचाकीतून फेकला जात आहे. त्या दृष्टीने हा भाग जणू काही कचरा फेकण्यासाठी हक्काची जागा असल्यासारखा वापरला जात आहे. यामुळे सर्वच वाघोलीतील राहणाऱ्या नागरिकांना आपली वाघोली सुंदर वाघोलीचा विसर पडला असल्याचे दिसून येत आहे. परिणामी अस्वच्छता आणि दुर्गंधींचा सामना या रस्त्याने आणि परिसरातून ये-जा करणाऱ्यांना नागरिकांना करावा लागत आहे.

वाघोलीत एक माणूस दररोज अंदाजे सरासरी ५०० ग्रॅम कचरा तयार करतो. या कचऱ्यातील ३०० ग्रॅम कचरा हा विघटन होणार असतो. त्यामुळे दररोज अंदाजे ३० ते ४० टन घनकचरा तयार होतो. या कचऱ्यातून ओला कचरा, सुका कचरा,जैविक कचरा वेगळा करण्याची कोणतीही यंत्रणा सध्या तरी अस्तित्वात नाही. वाघोली ग्रामपंचायतच्या वतीने काही दिवसापुर्वी ओला, सुका, कचरा वेगळ्या पद्धतीने जमा करून त्यांचे विघटन, त्याची शास्त्रोक्त विल्हेवाट, कचऱ्यापासून कोळसा, आॕइल, गॕस ,खतनिर्मिती सारखा प्रकल्प उभा केला होता. परंतु, त्याच्या योग्य नियोजनाअभावी व्यवस्थित कार्यन्वित झाला नाही.

त्यामुळे कचरा प्रश्नावरून बिकट अवस्था झाली आहे. यामुळे कचऱ्याबरोबरच पाणी, वाहतूककोंडी, अतिक्रमण, अश्या अनेक समस्याठी महानगरपालिकेची डोकेदुखी ठरणार का? हेच येत्या काळात आपणास पाहावे लागणार आहे.

कोट

वाघोली मनपामध्ये समाविष्ट झाल्यानंतर खासदार गिरीश बापट, पुणे मनपाचे महापौर व आयुक्त यांच्याकडे पाठपुरावा करून कचरा, पाणी व वाहतूककोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

- संदीप सातव, संघटन सरचिटणीस, पुणे जिल्हा युवा मोर्चा

कोट

वाघोलीतील कचरा समस्या सोडविण्यासाठी कचरावर प्रकिया करणाऱ्या प्रकल्पांना प्राधान्य देत अद्यावत मोठे युनिटची निर्मिती करणे ही काळाची गरज आहे. भामा आसखेडचे पाणी आणि वाहतूककोंडी बाबतीत पाच फ्लायओर बांधण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी सातत्याने पाठपुरावा चालू आहे.

- अशोक पवार, आमदार, शिरुर-हवेली

फोटो : वाघोलीमध्ये महामार्गावर नागरिक कचरा टाकत असल्याने ठिकठिकाणी असे कचऱ्याचे ढीग साठलेले दिसत आहे.