शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांसाठी आणखी ११ हजार कोटी रुपये; मदत वाटपात विलंबावरून मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी
2
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
3
आठव्या वेतन आयोगाला केंद्राची मान्यता; ५० लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार, निवृत्त कर्मचाऱ्यांनाही लाभ
4
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
5
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
6
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
7
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
8
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
9
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
10
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
11
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
12
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
13
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
14
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
15
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
16
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
17
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
18
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
19
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
20
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक

पुंरदरसाठीच्या ‘पॅकेज’ची लवकरच घोषणा? राज्य सरकारच्या पातळीवर चर्चा सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 09:29 IST

भूसंपादनाबाबत आतापर्यंत ६४० हरकती आल्या आहेत. येत्या ३० मेपर्यंत हरकती दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे.

पुणे :पुरंदरविमानतळासाठीच्या भूसंपदनावरून झालेल्या आंदोलनानंतर तिढा निर्माण झाला होता. मात्र, यानंतर राज्य सरकारच्या पातळीवर मोबदल्याबाबत चर्चा सुरू असून यांसदर्भात लवकरच पॅकेजची घोषणा केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानंतर हा तिढा सुटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, एकूण भूसंपादन होणाऱ्या शेतकऱ्यांपैकी ३ हजार शेतकरी भूमिहीन होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. तसेच, भूसंपादनाबाबत आतापर्यंत ६४० हरकती आल्या आहेत. येत्या ३० मेपर्यंत हरकती दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे.

प्रस्तावित पुरंदरविमानतळासाठी वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, खानवडी आणि पारगाव या सात गावांमधील २ हजार ६७३ हेक्टरचे भूसंपादन केले जाणार आहे. मात्र, या भूसंपादनाला सर्व सात गावांतील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. भूसंपादनासाठी करण्यात येणाऱ्या ड्रोन सर्वेक्षणादरम्यान शेतकऱ्यांनी आंदोलन करत सर्वेक्षण बंद पाडले होते. त्यानंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बाधित शेतकऱ्यांची भेट घेत भूसंपादनाच्या मोबदल्याबाबत सात दिवसांत प्रस्ताव देण्यास सांगितले होते. असा प्रस्ताव न आल्यास राज्य सरकार १५ दिवसांत राज्य सरकार वेगवेगळ्या कायद्यानुसार मोबदल्याचे पॅकेजचा प्रस्ताव देईल, असे जाहीर केले होते. या घटनेला आता २२ दिवस उलटून गेले आहेत.

यासंदर्भात राज्य सरकारच्या वतीने जलदगतीने पाऊले उचलली जात असून, सरकारी पातळीवर चर्चा सुरू आहे. तसेच, इतर कायद्यांचा आधार घेऊन शेतकऱ्यांना मोबदला काय देता येईल, यावर सुद्धा विचारमंथन अंतिम टप्प्यात आले आहे. यासंदर्भातील पॅकेज पुढील काही दिवसांत घोषित करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यानंतर शेतकऱ्यांची भूमिका काय राहणार, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. पुरंदरमधील या सात गावांमधील साडेचार हजार शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर एमआयडीसीचे शिक्के पडले आहेत. यातील तीन हजारांपेक्षा जास्त शेतकरी पूर्णपणे भूमिहीन होणार आहेत.भूसंपादनाबाबत ३० मेपर्यंत हरकती नोंदविता येणार आहे. आतापर्यंत ७९४ शेतकऱ्यांनी हरकती नोंदविल्या आहेत. यांनतर या हरकतीवर सुनावणी घेतली जाणार आहे, तर वनपुरी येथील शेतकऱ्यांनी हरकती मांडण्यासाठी अजून १० दिवसांची मुदत वाढवून देण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रPurandarपुरंदरAirportविमानतळ