शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
2
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
3
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
4
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
5
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
6
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
7
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
9
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
10
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
11
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
12
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
13
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
14
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
19
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
20
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
Daily Top 2Weekly Top 5

...अखेर हरणेश्वर अँग्रो निघणार मोडकळीत ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:12 IST

-- कळस : इंदापूर तालुक्यातील कळस येथील शर्कराकंदापासून इथेनॉल निर्मिती करणारा हरणेश्‍वर ॲग्रो या प्रकल्पाचा अवसायक काढून लिलाव ...

--

कळस : इंदापूर तालुक्यातील कळस येथील शर्कराकंदापासून इथेनॉल निर्मिती करणारा हरणेश्‍वर ॲग्रो या प्रकल्पाचा अवसायक काढून लिलाव थांबवण्यासाठी कारखाना व्यावस्थापनाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी संध्याकाळपर्यंत न्यायालयाने सुनावणीसाठी तारीख दिली नाही, त्यामुळे कारखान्याचा मंगळवारी (दि. २०) लिलाव होऊन कारखाना मोडकळीस निघणार असल्याची शक्यता बळावली आहे. दरम्यान, स्थगिती आणण्यासाठी कारखाना संचालक प्रयत्नशील असल्याची माहिती माऊली चवरे यांनी दिली.

लिलावामुळे कारखान्याची मोठी मालमत्ता असूनही कारखाना कवडीमोल किमतीत भंगारात विकला जाण्याची शक्यता आहे. कारखाना व्यवस्थापनाने बँक व अवसायक यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यामध्ये कारखाना व्यावस्थापन कर्ज भरण्यास तयार असून लिलाव रद्ध करावा, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र सोमवार दि. १९ पर्यंत कोणतीही सुनावणीसाठी तारीख मिळाली नाही त्यामुळे लिलाव होण्याची शक्यता बळावली आहे.

शर्कराकंदपासून इथेनाॅल निर्मिती करण्यात यश न आल्याने त्यामधील अडचणी व शासन धोरण ओळखून साखर कारखाना परवाना मिळवण्यासाठी प्रयत्न झाला मात्र अंतराची अट आल्याने परवाना दिला गेला नाही त्यामुळे उसापासून गूळ पावडर,निर्मिती करण्यास सुरुवात झाली व गूळ पावडर,यावर ह्या कारखान्याची आर्थिक गणिते कोलमडली. कारखान्यावर अनेक बँकांचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज झाले त्यामुळे कारखाना डबघाईला आला तडजोडीअंतर्गत सुमारे २५ कोटी रुपयांचे अनेक बँकाचे कर्ज आहे कारखान्याची स्थावर व मशनिरी अशी सुमारे ४५ कोटी रूपयांची मालमत्ता आहे मात्र लिलाव झाल्यास नुकसान होण्याची शक्यता आहे.

इथेनाॅल निर्मितीला प्रोस्ताहान देणारे केंद्रशासनाचे धोरण असल्याने २०२५ पर्यंत ३० टक्के इथेनाँल मिश्रणाला परवानगी मिळणार आहे. त्यामुळे प्रकल्पाचा लिलाव नुकसानकारक आहे कारखान्यावर सत्ता असणारी मंडळी पुर्वाश्रमीपासून भाजपात आहेत केंद्रात सरकार असूनही लक्ष दिले जात नाही ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे तसेच इंदापूर, बारामती, दौंड फलटण ,पुरंदर येथील सुमारे बारा हजार सभासदांनी आपले शेअर्स जमा केले होते त्यांचेही नुकसान होणार आहे .

जिल्हातील यशवंत सहकारी व हरणेश्वर अॅग्रो हे कारखाने कर्जाचा बोजा वाढल्याने एकाचवेळी बंद पडले व अवसायक नेमले गेले दोन्ही कारखान्यांकडे २०० एकर पेक्षा जास्त जमिनी आहेत यशवंत बचावासाठी जोरदार राजकिय व प्रशासकिय प्रयत्न चालु आहेत मात्र हरणेश्वरला कोणी कैवारीच राहीला नाही.

--

कोट

प्रकल्पाला स्थगिती मिळावी म्हणून आम्ही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, कोविडमुळे सुनावणी होऊ शकली नाही, त्यामुळे लिलावास स्थगिती मिळालेली नाही अवसायककडुन (मंगळवार, दि. २०) रोजी लिलावाची प्रकिया होणार असल्याने आम्ही उद्याही न्यायालयीन स्थगीतीसाठी प्रयत्नशील आहोत.

-माऊली चवरे,

संचालक