शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
2
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
3
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
4
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
5
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
6
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
7
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
8
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
9
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
10
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
11
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
12
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
13
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
14
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
15
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
16
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
17
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
18
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
19
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
20
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास

'अन्न मिळेल, पण पाणी कठीण; १९७२ पेक्षा भयानक दुष्काळी परिस्थिती उद्भवणार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 02:00 IST

अधिकाऱ्यांनी भ्रमात राहू नये; अन्यथा मोठ्या दुष्काळाला सामोरे जावे लागेल, असे मत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांनी व्यक्त केले.

दौैंड : महाराष्ट्रात १९७२ च्या दुष्काळापेक्षा भयानक परिस्थिती निर्माण होणार आहे. तेव्हा पाण्याचे नियोजन करणे काळाची गरज आहे. एकवेळेस अन्न मिळेल, पण पाणी मिळणे कठीण होईल. तेव्हा अधिकाऱ्यांनी भ्रमात राहू नये; अन्यथा मोठ्या दुष्काळाला सामोरे जावे लागेल, असे मत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांनी व्यक्त केले.दौंड येथे टंचाई बैठकीत ते बोलत होते. शासकीय अधिकाºयांनी दुष्काळाच्या संदर्भात चालढकल केली, तर कुठल्याही अधिकाºयाला पाठीशी घातले जाणार नाही. या बैैठकीत टंचाई आराखड्याबाबत तालुकापातळीवर नियोजन आणि समन्वय नसल्यामुळे वरिष्ठांनी नाराजी व्यक्त केली. पंचायत समितीचे उपसभापती प्रकाश नवले यांनी खडकी येथील बंधारा वाहून गेल्याची खंत व्यक्त केली. या कामाची मी पाहणी करणार आहे. दोषी व्यक्तींवर कारवाई केली जाईल.मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे म्हणाले की, पुणे जिल्ह्याची स्थापना झाल्यापासून पहिल्यांदाच नोव्हेंबर महिन्यात जिल्ह्यात ५0 टँकर सुरू झाले, ही गंभीर बाब आहे. त्यातच दौंड तालुक्यात ९ टँकर सुरू आहेत. तेव्हा टँकर कमी करण्यासाठी योग्य ते नियोजन झाले पाहिजे. जनावरांच्या चाºयाचा प्रश्न सुटला पाहिजे आणि याचबरोबरीने दुष्काळी परिस्थितीत रोजगारांना मजुरी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. टँकरने पाणी देत असताना पाण्याची गुणवत्ता तपासून घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबरीने टँकरच्या फेºया वेळेवर होतात की नाही, याचीदेखील नोंद ग्रामस्थांनी आणि लोकप्रतिनिधींनी घ्यावी. जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे म्हणाले की, तालुक्यातील टँकर मंजुरीचे अधिकार स्थानिक पातळीवर तहसीलदारांना दिले पाहिजेत. त्यानुसार पाणीटंचाई कमी होण्यास मदत होईल किंबहुना टंचाईचे नियोजन होणे काळाची गरज आहे. सभापती झुंबर गायकवाड म्हणाले की, तालुक्यातील ८0 टक्के गावे पाण्याखाली आहेत, तर २0 टक्के गावे टंचाईग्रस्त आहेत.पंचायत समितीच्या माध्यमातून टँकर कमी करण्यासाठी आणि पाणीटंचाई भासणार नाही याचे नियोजन केले जाईल, अशी हमी गायकवाड यांनी दिली. उपसभापती प्रकाश नवले म्हणाले की, पाण्याच्या नियोजनाबरोबरीने जनावरांच्या चाºयाचा प्रश्नदेखील महत्त्वाचा आहे. त्यासाठी चारा छावण्यांचे नियोजन करणे गरजेचे आहे. पाटबंधारे खात्याने पाण्याचे नियोजन केल्यास टँकरची मागणी घटेल. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गटविकास अधिकारी गणेश मोरे यांनी टंचाई बैठकीचा आढावा घेऊन तालुक्यातील टंचाईची परिस्थिती स्पष्ट करुन यावर योग्य ते नियोजन केले जाईल, असे सांगितले. या वेळी तहसीलदार बालाजी सोमवंशी, पुणे जिल्हा महिला बालकल्याण समितीच्या राणी शेळके, जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण सातपुते, गणेश कदम, सारिका पानसरे, पंचायत समिती सदस्या ताराबाई देवकाते यांच्यासह विविध शासकीय अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते.उन्हाळ्यात बंधारा बांधला पावसाळ्यात वाहून गेलाटंचाई बैठकीत उपसभापती प्रकाश नवले म्हणाले की, खडकी येथे बंधाºयासाठी माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी खासदार फंडातून २६ लाख खोलीकरणासाठी आणि १४ लाख रुपये बंधारा उभारण्यासाठी निधी दिला. त्यानुसार उन्हाळ्यात बंधारा बांधला गेला आणि पावसाळ्यात कॅनॉलच्या पाण्याने अगदी तीन महिन्यांतच बंधारा वाहून गेला. जर हा बंधारा टिकला असता तर परिसराला पाण्याची टंचाई भासली नसते.

टॅग्स :droughtदुष्काळ