शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

बोलीभाषेच्या माध्यमातून होणार ‘‘राष्ट्रभक्तीचा’’ जागर    

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 20:52 IST

राज्याचे हे भाषासंचित टिकून राहावे याकरिता राज्यस्तरीय राष्ट्रभक्ती साहित्य संमेलनात  ‘‘बोलीभाषेच्या’’ माध्यमातून राष्ट्रभक्तीचा जागर होणार आहे. 

ठळक मुद्देराज्यस्तरीय राष्ट्रभक्ती साहित्य संमेलन भाषा जागृतीचा साहित्यिक व्यासपीठावर पहिल्यांदाच प्रयोग

पुणे : भाषेला सीमांचे बंधन असते. सीमा ओलांडली की भाषेचा बाज, थाट, सगळे बदलते. मराठी भाषेला तर अशा वेगवेगळ्या भाषां भगिनी लाभलेल्या आहेत. घाटावरची भाषा, देशावरची भाषा, व-हाडी भाषा, खानदेशी भाषा, यांच्या माध्यमातून भाषा जिवंत राहते.  गेल्या काही वर्षांपासून भाषेवर विविध सांस्कृतिक आक्रमणे झाल्यानंतर भाषेचे वैभव काळाच्या पडद्याआड जाण्याची भीती भाषातज्ञांनी व्यक्त केली आहे. मात्र दुसरीकडे राज्याचे हे भाषासंचित टिकून राहावे याकरिता राज्यस्तरीय राष्ट्रभक्ती साहित्य संमेलनात  ‘‘बोलीभाषेच्या’’ माध्यमातून राष्ट्रभक्तीचा जागर होणार आहे. कर्नाळा चँरिटेबल ट्रस्ट पुणे व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृ ती मंडळाच्यावतीने येत्या 25 नोव्हेंबर रोजी राज्यस्तरीय राष्ट्रभक्ती साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.  एकीकडे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा याकरिता वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न होत आहेत. अशातच भाषेच लेणं असलेल्या बोलीभाषेच्या संवर्धन आणि समृध्दीकरिता देखील काही साहित्यिक संस्थांनी पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे. वृक्ष लागवड व वृक्षसंवर्धन ही या संमेलनाची मुख्य संकल्पना आहे. महाराष्ट्रातील बोली भाषेतुन भाषाविषयक जागृती आणि प्रबोधन संमेलनातून केले जाणार आहे. राज्यात एकूण 94 बोलीभाषा आहेत. त्यापैकी 52 बोलीभाषांना मराठी भाषेला अभिजाततेचा दर्जा मिळावा याकरिता हातभार लावण्यात मोलाची भूमिका पार पाडली आहे. मराठी भाषेतले आद्यकवी मुकूंदराज हे देखील झाडी बोलीभाषेतून आपल्या रचना करत. चंद्रपूरची राजभाषा देखील झाडी ही बोलीभाषा होती. चांदा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा यासारख्या भागात बोलली जाणा-या या भाषेसह अन्य विदर्भीय बोलीभाषांचा संबंध राष्ट्रभक्तीच्या साथीने उलगडला जाणार आहे. पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावरील श्री वर्धमान प्रतिष्ठान याठिकाणी होणा-या या संमेलनाचे अध्यक्षस्थान पुणे विभागाचे वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे भुषविणार आहेत.  पाश्चिमात्य भाषांचे आपल्याकडे झालेल्या अतिक्रमणामुळे मुळ मराठी भाषेच्या स्वरुपात झालेला बदल, त्याचा पर्यायाने मराठी बोलीभाषेवर झालेला परिणाम यासगळ्या प्रश्नांची उत्तरे यानिमित्ताने शोधली जाणार आहेत. पर्यावरणाची गंभीर समस्या सध्या असून त्याविषयी जनमाणसात जागृती आणणे हा या संमेलनाचा उद्देश आहे. मात्र त्याबरोबरच ऐरणी, कोकणी, गोंड, माडी, व-हाडी भाषेचा गोडवा नव्या पिढीपर्यंत पोहचविण्याकरिता या साहित्य व्यासपीठाचा उपयोग केला जाणार असल्याची भूमिका नाईकडे यांनी यावेळी व्यक्त केली. संमेलन काळात आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादातून जे ठराव मांडण्यात येतील ते राज्यसरकारकडे पाठविण्यात येवून त्याची वेळोवेळी दखल घेतली जाणार आहे.................................*संमेलनात मराठीच्या बोलीभाषा यात राष्ट्रभक्तीचा मानबिंदु झाडीबोली व अन्य वैदर्भीय बोलीभाषा यावर प्रा.डॉ.हरिश्चंद्र बोरकर, प्रा.ना.गो.थुटे बोलणार आहेत. कोकणी बोलीचा राष्ट्रभक्ती प्रेरक इतिहास प्रा.विनय मडगांवकर मांडणार असून डॉ.रमेश सुर्यवंशी हे अहिराणी बोलीभाषेतील राष्ट्रीय अविष्कार यावर मार्गदर्शन करणार करणार आहेत. विशेष म्हणजे अभ्यासक प्रमाणभाषे बरोबरच संबंधित बोलीभाषेतच विचार व्यक्त करणार असल्याने भाषाअभ्यासक, मराठी वाचक, रसिकांना आगळी पर्वणी असणार असल्याचे संमेलनाचे आयोजक चंद्रकांत शहासने यांनी सांगितले. 

टॅग्स :Puneपुणे