शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

विज्ञान वाढत का नाही याचे कारण आपल्यातच शाेधायला हवे : डाॅ. जयंत नारळीकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2020 18:43 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आयुकामध्ये विज्ञान दिनानिमित्त शास्त्रज्ञांशी संवादाच्या कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते.

पुणे : शालेय विद्यार्थ्यांना विज्ञान हे मंत्रासारखे पाठ करुन शिकवले जाते. त्यामुळे विद्यार्थी मार्क मिळविण्यापुरते विज्ञान शिकतात. माेठे झाल्यावर त्यांचे कुतूहल कमी हाेत जाते, त्यामुळे विज्ञान वाढत का नाही याचे कारण आपण आपल्यातच शाेधायला हवे असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डाॅ. जयंत नारळीकर यांनी व्यक्त केले. 

विज्ञान दिनानिमित्त आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आयुकामध्ये शास्त्रज्ञांशी संवादाच्या कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते, त्यावेळी ते बाेलत हाेते. नारळीकर आणि आयुकाचे शास्त्रज्ञ साेमक रायचाैधरी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. अवकाशात तारे असताना अवकाश काळे का दिसते ?,  या प्रश्नाचे उत्तर देताना नारळीकर म्हणाले, अवकाशात जेवढे तारे आहेत तेवढे अवकाश प्रकाशमान करण्यासाठी पुरेसे नाहीत त्यामुळे ते तारे आपल्याला दिव्यांसारखे दिसतात. ताऱ्यांच्या रंगाबाबत बाेलताना ते म्हणाले, भाैतिक शास्त्रानुसार रेडिएशनच्या तापमानावरुन त्या ताऱ्याचा रंग ठरत असताे. आपल्याला लाल रंग सर्वात जास्त तप्त असताे असे वाटते, परंतु विज्ञानानुसार निळा रंग हा लालपेक्षा अधिक तप्त असताे. सुर्याबाबत बाेलताना ते म्हणाले, सुर्यासारखे अनेक तारे अकाशगंगेत आहेत. एका टप्यानंतर सुर्यात अनेक बदल हाेतील त्याचे तापमान बदलेल तसेच त्याचा आकारही बदलण्याची शक्यता आहे. 

ग्रामीण भागात विज्ञान जास्तीत जास्त कसे पाेहचायला हवे ?, या प्रश्नाचे उत्तर देताना नारळीकर म्हणाले, विज्ञान सर्वांपर्यंत पाेहचायला हवे, केवळ शहरांपुरते ते मर्यादित असता कामा नये. विविध संस्थाकडून मदत घेऊन गावांमध्ये विज्ञान सेंटर सुरु करता येऊ शकतील. बर्मुडा ट्रंगलमध्ये अनेक विचित्र गाेष्टी घडतात असे सांगितले जाते परंतु तिथे काही नसून त्या ठिकाणी हाेणारे अपघात इतर ठिकाणी सुद्धा हाेऊ शकतात असे बर्मुडा ट्रंगलजवळ राहणाऱ्या आपल्या मित्राने सांगितल्याचेही नारळीकर म्हणाले.  

टॅग्स :Jayant Narlikarजयंत नारळीकरscienceविज्ञानPuneपुणे