शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

जागतिक महिला दिन विशेष : नाट्यलेखन दिग्दर्शनाचा महिलांचा झोका उंच का नाही?  अतुल पेठे यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2020 08:00 IST

अगदी मोजक्याच महिला नाट्यलेखन व दिग्दर्शनात दिसतात

ठळक मुद्देपुरुषी मानसिकता कारणीभूत

राजू इनामदार - पुणे : गेली अनेक वर्षे मी नाट्यक्षेत्रात लहानमोठ्या स्वरूपाची कामे करीत आहे. या इतक्या वर्षांत जाणवलेली एक गोष्ट म्हणजे अगदी मोजक्याच महिला नाट्यलेखन व दिग्दर्शनात दिसतात. हे असे का होत असावे, याचा विचार व्हायला हवा. यामागच्या कारणाचा मी स्वत: विचार करतो, त्या वेळी मला काही गोष्टी प्रमुखपणे लक्षात येतात.खरे तर महिला चांगले लेखन करू शकतात, त्यांचे भावविश्व नाटकाची कथावस्तू तयार करायला पोषक असेच असते; मात्र त्यांच्याकडून लेखन होऊ शकत नाही. समस्त पुरुषांना आजही महिलांना काय कळते असेच वाटते, हे यामागचे कारण आहे. लिहिण्यासाठी म्हणून महिलांना आत्मविश्वास देण्यात पुरुष कमी पडतात. हे विधान एखादे उदाहरण समोर आहे म्हणून केलेले नाही, तर सार्वत्रिक म्हणून केले आहे. महिला काय लिहिणार किंवा त्यांनी लिहिलेल्या नाटकात काय काम करायचे, असा विचार पुरुष अभिनेत्यांच्या मनात येतच नसेल, असे नाही. त्यांना तसे वाटते, असे महिला लेखकांना पक्के माहिती असल्यासारखेच वातावरण भोवताली असते. त्यातून महिला लिहीत नसाव्यात किंवा लिहायला प्रवृत्त होत नसाव्यात.दिग्दर्शनाचेही तसेच आहे. वास्तविक, महिलांचे निरीक्षण चांगले असते. एखादा विषय त्या जास्त प्रभावीपणे उलगडून दाखवू शकतात; पण ते होत नाही. विजया मेहता वगळल्या तर आपल्याकडे महिला नाट्य दिग्दर्शकांची संख्या बोटांवर मोजावी इतकीही नाही. एखाद्या महिलेने सांगावे व आपण तसे करावे, हेच अनेकांना त्यांच्या वर्षानुवर्षांच्या मानसिकतेमुळे पटत नसावे कदाचित. त्यामुळेही मोठ्या संख्येने कोणी पुढे येत नसावे. ही मानसिकता बदलणे फार गरजेचे आहे. त्यांना काय समजते, त्या काय सांगणार, त्यांना कळणार तरी आहे का? याप्रकारचे पुरुषी विचारच महिलांचे पुढे येणे रोखून धरतात. हे काही ठरवून वगैरे होत नाही, तर अनेक वर्षांच्या मानसिकतेतून ते नकळतपणे होत असते. यात बदल होणे गरजेचे आहे. नाट्यलेखन-दिग्दर्शनात महिलांचे अंगण अगदीच सुने आहे, असे नाही. मुंबईत ज्योती डोगरा म्हणून एक लेखक-दिग्दर्शिका आहेत. त्यांनी ‘नोटंस आॅन चाय, ब्लॅक होल’ अशी काही नाटके लिहिली, स्वत:च दिग्दर्शित केली. मनस्विनी लता रवींद्र, इरावती कर्णिक अशी काही आणखी नावे आहेत. सई परांजपे यांचेही नाव घेता येईल; पण त्या जास्तकरून चित्रपटाशी संबधित आहेत. अशी काही नावे आहेत; पण ती अपवाद म्हणून व त्यांच्या कर्तृत्वामुळेच स्मरणात राहिलेली आहेत.या वाटेवर गर्दी का नाही, असे माझे म्हणणे आहे. सक्षमपणे लिहिणाºया महिला मोठ्या संख्येने पुढे यायला हव्यात. त्यासाठी त्यांनी पुरुषांना तसा अवकाश मोकळा करून द्यायला हवा. प्रोस्ताहन, उत्तेजन, कौतुक झाले तर अनेक महिला लिहित्या होतील, असा मला विश्वास आहे. तसे झाले तर आतापर्यंत लपलेले, कधीही बाहेर न आलेले असे अनेक सामाजिक, कोटुंबिक, विषय पुढे येतील, याची मला खात्री आहे.०००

टॅग्स :PuneपुणेTheatreनाटकAtul Petheअतुल पेठे