शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

सभोवताली इंद्रधनुष्याचे रंग असताना कायम तक्रार करत का जगायचं ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2019 21:58 IST

कुठल्या एका सार्वजनिक स्वच्छतागृहात आम्हाला जाऊ द्या. अद्याप नजरा काही बदलल्या नाहीत...

ठळक मुद्देएलजीबीटी समुहातील व्यक्तींच्या भावना डिव्हाईन डिवा कार्यक्रमातून दिले सामाजिक जाणीवांना शब्दरुप

पुणे : आपण कसेही असलो, वागलो तरीही समाज नावे ठेवायचा बंद होणार नाही. त्याला दरवेळी उत्तरे देऊन स्वत:तील उर्जा आणि सर्जनशीलता संंपविण्यापेक्षा त्याचा सकारात्मक उपयोग होणे गरजेचे आहे. आपल्या सभोवताली सगळे मळभ दाटून आले असून त्याच्या परिणामाला आपल्याला सामोरे जावे लागणार या भीतीत किती दिवस राहायचे? सातत्याने तक्रार करत जगण्यापेक्षा हिंमतीने आणि आत्मविश्वासाने तोंड देणे जास्त गरजेचे आहे. या शब्दांत एलजीबीटी समुहातील व्यक्तींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.  लोकमतच्या सहकायार्ने  इनसाईड आऊट या संवादात्मक कार्यक्रमाचे आयोजन क्राऊन प्लाझा येथे करण्यात आले होते. याप्रसंगी समपथिक ट्रस्टचे संस्थापक अनिल, बिंदुमाधव खिरे, श्रध्दा (क्वीर), त्रिनय (ट्रान्समँन), विजय आणि पायल (ट्रान्सवुमन) उपस्थित होते. याबरोबरच निवृत्त पोलीस अधिकारी भानुप्रताप बर्गे यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. डिव्हाईन डिवा क्लब हा महिलांचा क्लब चार वर्षांपूर्वी सुरु झाला. भावना मयुर, अंजली लोढा, रिटा गांधी, कोयल मुथा, तेजल शहा, रुपाली जैन, प्रीती सोळंकी, नुपूर पिल्ले आणि गायत्री मंत्री यांनी हा क्लब स्थापन केला आहे. एलजीबीटी समुहाविषयीचे समाजातील गैरसमज दूर व्हावेत याकरिता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. खिरे यांनी मनोगतातून कलम 377 कडे सर्वांचे लक्ष वेधून त्यातील बारकावे उपस्थितांना समजावून सांगितले. तसेच भविष्यात समलैंगिकांकरिता कायद्यात विशेष तरतुद गरजेचे असून कायद्यापुढे कुठल्याही प्रकारचा लिंगभेदभाव करता कामा नये. असे मत त्यांनी व्यक्त केले. आपण कुणी वेगळे आहोत अशी ओळख दाखविण्याची सुरुवात समाजातून सुरु होते. हाच समाज आपल्याला वेगळी ओळख देतो. त्याच्या सोयीनुसार एकाच चष्मातून आमच्याकडे पाहतो. अशावेळी आम्ही कोण आहोत, आमची वेदना जगणे काय आहे, आम्हाला काय हवे आहे, असे प्रश्न त्याला पडत नाहीत. म्हणून त्याच्याबद्द्ल तक्रार करत राहण्याचा उपयोग नाही. अशी परखडता तेजल यांनी व्यक्त केली. भवतालचे जग वेगाने बदलत असताना अद्याप त्याकडे धर्म, संस्कृती, परंपरा यांच्या दृष्टीकोनातून पाहणाºयांची संख्या कमी झालेली नाही. त्यांच्या जगण्यात, वागण्यात म्हणावी अशी लवचिकता आलेली नसल्याने समलैंगिक व्यक्तींकडे त्यांची पाहण्याची नजर प्रश्नार्थकच आहे. तरी देखील स्वबळावर स्वतमधील कार्यशीलता वाढवून वेगळे स्थान निर्माण करण्यावर भर देणे गरजेचे आहे. असे गायत्री मंत्री म्हणाल्या. बर्गे म्हणाले, पोलीसांकडून एलजीबीटीच्या समुहातील कुणाला त्रास दिला जातो. असे म्हणणे चुकीचे आहे. मुळात पोलिसांकडून त्यांना कुठल्याही प्रकारचा धोका नाही. मुळात आपण सर्वांनी मिळुन त्यांना समाजातील त्यांचे हक्क मिळवून देण्याकरिता एकत्र येण्याची गरज आहे. 

 * कुठल्या एका सार्वजनिक स्वच्छतागृहात आम्हाला जाऊ द्या. अद्याप नजरा काही बदलल्या नाहीत. विचार देखील नाहीत. तृतीयपंथीय समाजाविषयी लोकांमध्ये बुरसटलेल्या भावना आहेत. इतर नागरिकांप्रमाणेच आम्हाला देखील सार्वजनिक स्वच्छतागृह वापरु देण्याचा अधिकार मिळावा. तो मिळत नाही. याशिवाय शिक्षण आणि आरोग्यविषयक सुविधांचा आमच्याही उपयोगी पडाव्यात. या शब्दांत पायल हिने आपल्या भावनांना शब्दरुप दिले.  

टॅग्स :PuneपुणेLGBTएलजीबीटी