शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

पती-पत्नीच्या सुंदर नात्यात हिंसा का वाढतेय?

By नम्रता फडणीस | Updated: December 4, 2024 10:27 IST

गेल्या काही वर्षांत घरगुती हिंसाचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

पुणे : पतीने मोड आलेले हरभरे खाल्ले आणि त्याचा राग पत्नीला आला. त्यानंतर तिने चक्क पतीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. लाटणे, मिक्सरच्या भांड्याने मारहाण केली, नखांनी जोरात ओरखडले, पतीच्या उजव्या हाताच्या करंगळीला चावा घेऊन दुखापत केली. अखेर पतीला पोलिसांकडे धाव घ्यावी लागली आणि समर्थ पोलिस स्टेशनमध्ये पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला. ही रविवारी (दि. १) घडलेली ताजी घटना आहे.

गेल्या काही वर्षांत घरगुती हिंसाचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे पाहायला मिळत असून, किरकोळ कारणांवरून पती-पत्नींमध्ये होणारे वाद इतके विकोपाला जात आहेत की याचे पर्यवसान हाणामारी आणि अगदी खून करण्यामध्ये होत आहे. ही नात्यातील वाढती हिंसा एक चिंतेची बाब बनली असून, पती-पत्नीच्या सुंदर नात्यात इतकी हिंसकता येतेच कुठून, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

एक काळ असा होता की, पुरुषी वर्चस्व सिद्ध करण्यासाठी किंवा स्वत:चे नैराश्य, अपयश लपविण्यासाठी पती आपल्या पत्नीवर हात उगारत असे. दुर्दैव म्हणजे कुटुंबातील सदस्यांना यात वावगे काहीच वाटत नव्हते. कुणी पुरुषाला अडविण्याचा प्रयत्नही करीत नव्हता. अजूनही ही स्थिती फारशी बदललेली नाही. मात्र, आता एकविसाव्या शतकात सबला पत्नीकडूनदेखील क्षुल्लक कारणावरून मागचापुढचा विचार न करता पतीला शिवीगाळ करणे, मारहाण करणे, विवाहबाह्य संबंधातून खून करणे असे प्रकार वाढत आहेत.

दोन वर्षांपूर्वी पती गिफ्ट देत नाही, फिरायला नेत नाही म्हणून पत्नीने पतीच्या नाकावर ठोसा मारून त्याला घायाळ केल्याची घटना गाजली होती. दोन दिवसांपूर्वीच उत्तमनगरमध्ये पत्नीने न सांगता रिक्षाचे हप्ते भरले म्हणून पत्नीला शिवीगाळ आणि मारहाण केल्याची घटना घडली. त्याप्रकरणी पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यांनी एकमेकांसमवेत आयुष्य घालविण्याची स्वप्न रंगवली तेच एकमेकांना दुखापत करायलादेखील मागेपुढे पाहत नाहीत, ही नात्यासाठी नक्कीच धोक्याची घंटा आहे. यावर विचारमंथन होण्याची गरज आहे. अन्यथा विवाह संस्था मोडकळीस येईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

लग्न, संसार म्हणजे काय? याच गोष्टी आता पती-पत्नी विसरत चालले आहेत. मी, माझं आणि मला इतकंच त्यांचं नातं व्यावहारिक झालं आहे. मोबाइलमुळे निर्माण झालेल्या विसंवादाचा परिणाम लहान मुलांना भोगावा लागत आहे. पूर्वी कुटुंबातील सदस्य एकत्रित बसून चहा पित असत. आता चहा पितानाही हातात मोबाइल असतो अशी स्थिती आहे. पती-पत्नीमध्ये भावनिकता राहिलेली नाही. - संगीता जाधव, पोलिस निरीक्षक, भरोसा सेलअनेकदा पती-पत्नीच्या नात्यात संवादाचा अभाव, विश्वासाचा तुटलेला धागा आणि ताणतणाव यामुळे टोकाच्या घटना घडतात. त्यामागे मानसिक ताण, चिडचिड, किंवा नैराश्य यांचा मोठा वाटा असतो. "बायका पुरुषांना मारत नाहीत" हे सार्वकालिक सत्य मानणे चुकीचे आहे, कारण काही विशिष्ट परिस्थितींमध्ये महिलाही आक्रमक होऊ शकतात. भारतात महिलांसाठी अनेक संरक्षणात्मक कायदे आहेत, जसे घटनेतील कलम 498 अ (कौटुंबिक हिंसेविरुद्ध संरक्षण); परंतु पुरुषांसाठी अशा प्रकारच्या संरक्षणात्मक तरतुदी फारशा उपलब्ध नाहीत. त्यामुळे काही प्रमाणात महिलांकडून असे प्रकार घडतात - ॲड. राणी माणिक सोनावणे, उच्च न्यायालय नियुक्त मध्यस्थ आणि चेअरमन, पुणे लाॅयर्स कन्झ्युमर सोसायटी

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडFamilyपरिवारCourtन्यायालयhusband and wifeपती- जोडीदार