शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

पुण्याच्या ग्रामीण भागात ड्रोन कशासाठी फिरवले जातात, गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे - अमोल कोल्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2024 13:15 IST

ग्रामीण भागात ड्रोनची दहशत पसरली असून वारंवार चौकशीची मागणी करूनही प्रशासन गांभीर्याने घेत नाही

मंचर : ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी आकाशात फिरणाऱ्या ड्रोनची दहशत पसरली आहे. वारंवार चौकशी करण्याची मागणी करूनही प्रशासन गांभीर्याने घेत नाही. यासंदर्भात गृहमंत्र्यांनी विधानसभेत निवेदन देऊन स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली आहे.

मंचर येथील शरद पवार सभागृहात आज खासदार कोल्हे यांनी जनता दरबार घेतला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, आजच्या जनता दरबाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सर्वसामान्य नागरिक नेत्याशिवाय अथवा शिफारशी शिवाय समस्या घेऊन आले होते. प्रशासनापर्यंत पोहोचण्याचा दुवा जनता दरबार आहे. यापुढे प्रत्येक तालुक्यात दर महिन्याला जनता दरबार सुरू ठेवणार असल्याचे सांगून कोल्हे म्हणाले, महसूल, रस्ते, वीज मंडळ, पोलिस यासंदर्भात अनेक समस्या आल्या आहेत. शंभर अधिकारी उपस्थित होते. त्यांना या समस्यांचे निराकरण करण्याची सूचना केली आहे. या भागात रात्रीच्या वेळी आकाशात ड्रोन घिरट्या घालत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वारंवार चौकशीची मागणी करूनही समर्पक उत्तर दिली जात नाहीत. याबाबत मी पत्र दिले होते. प्रशासनाने त्याबाबत अद्याप गांभीर्याने घेतले नाही. जिल्हा पोलिस अधीक्षकांशी बोललो असता त्यांच्याकडून कारवाई करू असे उत्तर येत आहे. ग्रामीण भागात अनोळखी ड्रोनमुळे भयाण वातावरण निर्माण झाले असून, सदर ड्रोन कशासाठी वापरले जातात याचे निवेदन व स्पष्टीकरण गृहमंत्र्यांनी विधानसभेत द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

‘माझी लाडकी बहीण’ योजना चालू राहण्याची जबाबदारी युती सरकारने घेतलेली नाही. केवळ तीन महिन्याचे पैसे मिळतील, पुढे काय होईल याबाबत माहीत नाही, असे त्यांनी सांगितले. इतर पक्षातील कार्यकर्ते महाविकास आघाडीत येण्यासाठी इच्छुक आहेत, मात्र इतर पक्षातील कार्यकर्त्यांना का घ्यायचे हा प्रश्न आहे. आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा अवमान करणार नाही, असे ते म्हणाले. विधानसभा निवडणुकीत १८० ते १९० जागा महाविकास आघाडीला मिळतील, असा दावा खासदार कोल्हे यांनी केला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम, जिल्हाप्रमुख सुरेश भोर, बाळासाहेब बाणखेले, पूजा वळसे, सुरेश अण्णा निघोट आदी उपस्थित होते.

खासदार कोल्हे यांनी प्रथमच मंचर येथे जनता दरबार घेतल्याने त्याला प्रतिसाद मिळाला. गावोगावचे नागरिक निवेदन घेऊन आले होते. सकाळी सुरू झालेला हा जनता दरबार दुपारपर्यंत सुरू होता. असा जनता दरबार कायम घेतल्यास नागरिकांच्या समस्या सुटण्यास मदत होईल, अशी प्रतिक्रिया यावेळी उपस्थितांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसHome Ministryगृह मंत्रालयPoliceपोलिस