शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

पुण्याच्या ग्रामीण भागात ड्रोन कशासाठी फिरवले जातात, गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे - अमोल कोल्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2024 13:15 IST

ग्रामीण भागात ड्रोनची दहशत पसरली असून वारंवार चौकशीची मागणी करूनही प्रशासन गांभीर्याने घेत नाही

मंचर : ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी आकाशात फिरणाऱ्या ड्रोनची दहशत पसरली आहे. वारंवार चौकशी करण्याची मागणी करूनही प्रशासन गांभीर्याने घेत नाही. यासंदर्भात गृहमंत्र्यांनी विधानसभेत निवेदन देऊन स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली आहे.

मंचर येथील शरद पवार सभागृहात आज खासदार कोल्हे यांनी जनता दरबार घेतला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, आजच्या जनता दरबाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सर्वसामान्य नागरिक नेत्याशिवाय अथवा शिफारशी शिवाय समस्या घेऊन आले होते. प्रशासनापर्यंत पोहोचण्याचा दुवा जनता दरबार आहे. यापुढे प्रत्येक तालुक्यात दर महिन्याला जनता दरबार सुरू ठेवणार असल्याचे सांगून कोल्हे म्हणाले, महसूल, रस्ते, वीज मंडळ, पोलिस यासंदर्भात अनेक समस्या आल्या आहेत. शंभर अधिकारी उपस्थित होते. त्यांना या समस्यांचे निराकरण करण्याची सूचना केली आहे. या भागात रात्रीच्या वेळी आकाशात ड्रोन घिरट्या घालत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वारंवार चौकशीची मागणी करूनही समर्पक उत्तर दिली जात नाहीत. याबाबत मी पत्र दिले होते. प्रशासनाने त्याबाबत अद्याप गांभीर्याने घेतले नाही. जिल्हा पोलिस अधीक्षकांशी बोललो असता त्यांच्याकडून कारवाई करू असे उत्तर येत आहे. ग्रामीण भागात अनोळखी ड्रोनमुळे भयाण वातावरण निर्माण झाले असून, सदर ड्रोन कशासाठी वापरले जातात याचे निवेदन व स्पष्टीकरण गृहमंत्र्यांनी विधानसभेत द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

‘माझी लाडकी बहीण’ योजना चालू राहण्याची जबाबदारी युती सरकारने घेतलेली नाही. केवळ तीन महिन्याचे पैसे मिळतील, पुढे काय होईल याबाबत माहीत नाही, असे त्यांनी सांगितले. इतर पक्षातील कार्यकर्ते महाविकास आघाडीत येण्यासाठी इच्छुक आहेत, मात्र इतर पक्षातील कार्यकर्त्यांना का घ्यायचे हा प्रश्न आहे. आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा अवमान करणार नाही, असे ते म्हणाले. विधानसभा निवडणुकीत १८० ते १९० जागा महाविकास आघाडीला मिळतील, असा दावा खासदार कोल्हे यांनी केला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम, जिल्हाप्रमुख सुरेश भोर, बाळासाहेब बाणखेले, पूजा वळसे, सुरेश अण्णा निघोट आदी उपस्थित होते.

खासदार कोल्हे यांनी प्रथमच मंचर येथे जनता दरबार घेतल्याने त्याला प्रतिसाद मिळाला. गावोगावचे नागरिक निवेदन घेऊन आले होते. सकाळी सुरू झालेला हा जनता दरबार दुपारपर्यंत सुरू होता. असा जनता दरबार कायम घेतल्यास नागरिकांच्या समस्या सुटण्यास मदत होईल, अशी प्रतिक्रिया यावेळी उपस्थितांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसHome Ministryगृह मंत्रालयPoliceपोलिस