शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

ED ला भाजपवाले का दिसत नाहीत? डॉ. कुमार सप्तर्षी: लोकसंसदेमध्ये परिवर्तनाचा संघटनांनी केला निर्धार

By श्रीकिशन काळे | Updated: February 4, 2024 17:01 IST

अनैतिक कारभारी बदलणे हाच सत्याग्रह आहे,’’ असे आवाहन युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांनी केले...

पुणे : 'मोदींनी, शहांनी सर्व राजकारण खराब करून टाकले आहे. लोकसभा निवडणुक होईपर्यंत अनेक अटक सत्रे होणार आहेत. इडीला पैसै खाणारे भाजपवाले का दिसत नाहीत? ज्यांना निवडून दिले, ते काम करीत नसल्याने मतदारांनी निवडणूक हाती घ्यावी. अनैतिक कारभारी बदलणे हाच सत्याग्रह आहे,’’ असे आवाहन युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांनी केले.

रविवारी गांधी भवन येथे झालेल्या लोकसंसदमध्ये परिवर्तनाचा निर्धार करण्यात आला. युवक क्रांती दल, रिपब्लिक युवा मोर्चा, निर्भय बनो, पँथर आर्मी, स्वराज्य क्रांती सेना, संविधान प्रचारक चळवळ, सत्यशोधक बहुजन आघाडी, संविधानिक राष्ट्रवाद मंच आणि अभ्यासिका विद्यार्थी कृती समिती यांच्या वतीने लोकसंसदचे आयोजन केले होते. केंद्र सरकार भारतीय संसदेला धर्मसंसद बनविण्याचा प्रयत्न करत आहे, हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी भाजपविरोधी पक्ष संघटनांनी रविवारी, दि.४ फेब्रुवारी रोजी ‘लोकसंसद’ हा कार्यक्रम आयोजित केला.

युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम कोथरूड येथील गांधी भवनात दुपारी एक ते सायंकाळी पाच या झाला . लोकसंसदेत रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे हे स्वागताध्यक्ष होते. डॉ.विश्वंभर चौधरी, डॉ अभिजित वैद्य,अभ्यासक चंद्रकांत झटाले, सामाजिक कार्यकर्ते अब्दुल सत्तार शहा, धर्मगुरू बिशप थॉमस डाबरे, ह भ प धर्मकिर्ती परभणीकर, युनूस तांबटकर अशा अनेक मान्यवरांनी भाषणे केली.

सभागृहात डॉ अभिजित वैद्य,डॉ. अच्युत गोडबोले, आनंद करंदीकर,डॉ. उर्मिला सप्तर्षी,डॉ प्रवीण सप्तर्षी, अन्वर राजन, प्रशांत कोठदिया, फिरोज मुल्ला,अभय छाजेड, संदीप बर्वे, जांबुवंत मनोहर, उत्पल व. बा., रवींद्र धनक,अप्पा अनारसे, एम एस जाधव, इद्रिस कारी सुदर्शन चखाले उपस्थित होते.

डॉ. विश्वंभर चौधरी म्हणाले,'इंडिया आघाडीची ताकद अजूनही चांगली आहे. भाजप आपली ताकद फुगवून सांगत आहे. भाजपचे दक्षिणेचे दार बंद झाले आहेत. पूर्वोत्तर भागात भाजप विरोधी वातावरण आहे. विरोधी पक्षाला हतबलता वाटली तर नागरिकांनी, सिव्हील सोसायटीने पुढे येवून या पक्षांना युद्धासाठी तयार केले पाहिजे. शेतकरी भाजपाच्या विरोधात गेले आहेत.आर्थिक धोरणांमुळे मोदी सरकार हरणार आहेत. बिशप थॉमस डाबरे म्हणाले, 'संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांचा महाराष्ट्र आहे. धर्मा धर्मात असंतोष वाढीस लागणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. अल्पसंख्य समुदायाला सुरक्षित वाटेल असे वातावरण देशात असले पाहिजे. कोणीही इतर धर्मा विरोधात विधाने करता कामा नये. गरिबांची स्थिती सुधारली पाहिजे'.

टॅग्स :PuneपुणेEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयBJPभाजपा