शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

खेळता-खेळता मुलाने बाहुलीसह स्वतःलाही फास का लावला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2022 12:37 IST

मोबाईल, टीव्ही या सगळ्या आभासी गोष्टी आहेत...

पुणे: मुलांसाठी खरं-खोटं असं काहीच नसतं. त्यांना सगळी दुनिया खरी वाटते कारण ती सत्यात जगत असतात. मोबाईल, टीव्ही या सगळ्या आभासी गोष्टी आहेत. खोटं आहे. हे त्यांना कळत नाही.

त्या एका नातवाची गोष्ट आपण ऐकलेली असेलच. आजोबा, नातू रस्त्यावरून जाताना आजोबांना गाडीचा धक्का लागला आणि ते रस्त्यावर पडले. नातू जोरात हसायला लागला. कारण त्याला वाटलं की कार्टूनमध्ये दाखवतात तसं आजोबा काहीही न होता आपोआप उभे राहतील. जखम होणे, दुखावणे या गोष्टी कार्टूनमध्ये नसतात. मुलाला तेच खरं वाटत होतं. बरीचशी कार्टून बघणारी मुलं बोलताना त्या कार्टूनमधल्या लोकांसारखीच बोलतात, तशीच वागतात.

आपण मुलांना आभासी गोष्टींकडे का ढकलत आहोत? त्यांना खरं आणि खोटं यातलं अंतर माहीत नाही हे आपण कधी समजावून घेणार? मूल कधी समजून घेणार? खूप वेळा असं वाटतं की बऱ्याच पालकांसाठी कामावरच्या एखाद्या प्रोजेक्टसारखाच मूल हा एक प्रोजेक्ट आहे. आपल्याला योग्य वेळ बघायची, मूल होऊ द्यायचं आणि मग प्रत्येक गोष्ट आऊटसोर्स करायची.

त्याला वयाच्या तिसऱ्या, चौथ्या महिन्यापासूनच डे केअरमध्ये ठेवायचं, वेगवेगळ्या क्लासेसमध्ये टाकायचं, आपल्याला वेळ, फुरसत असेल तेव्हा लाड करायचे, आपल्याला सांभाळता येत नाही या अपराधीपणातून त्यांच्यावर विकतची महागडी खेळणी, कपडे, चित्रविचित्र खायच्या वस्तू यांचा भडीमार करायचा. मुलांना एवढ्या लहान वयात मार्केटचे गुलाम बनवून टाकलं आहे.

मूल एक जिवंत, रसरशीत, व्हल्नरेबल व्यक्तिमत्त्व आहे, त्याला फक्त निरपेक्ष प्रेम, शारीरिक, मानसिक सुरक्षितता, स्वातंत्र्य आणि विश्वास याच गोष्टी बहरून येण्यासाठी आवश्यक आहेत, बाकी काही नाही हे आपण कधी समजून घेणार?

मुलांना मोबाईलचं व्यसन लावणारे आईवडील सगळीकडे सर्रास दिसतात. मूल जेवत नाही, मूल कंटाळलं, मूल दुपारी झोपत नाही, मूल त्रास देतं या सगळ्यासाठी आपल्याकडे एकच उपाय आहे, त्याच्यासमोर मोबाईल ठेवणे, त्यावर सतत बदलत असणारी भडक रंगाची चित्रं असणारी गाणी, कार्टून्स, गोष्टी लावणे. मग मुलांना त्याचं व्यसन लागतं. हो, स्क्रीन आणि मोबाईल ही व्यसनं आहेत. मूल जेवत नाही, मूल कंटाळलं, मूल दुपारी झोपत नाही, मूल त्रास देतं यामागे वेगळी काही कारणं असू शकतात याबद्दल आपण विचारच करत नाही.

अशा मोबाईल, स्क्रीनच्या व्यसनातून जर एखादं मूल असं वावगं वागलं तर त्याच्या आईवडिलांनाच पूर्ण दोषी मानायला पाहिजे असं मनापासून वाटतं. हे सगळं जमत नसेल तर लोकांनी मुलांना जन्माला घालूच नये. तो ऑफिसमधला प्रोजेक्ट नव्हे, जो फसला तर गुंडाळून ठेवता येईल किंवा अन्डू करता येईल.

प्रत्येक मुलाला वयाच्या किमान १२-१३ वर्षांपर्यंत तरी आरोग्यदायी बालपण (काळजी घेणारे आईवडील, त्यात एखादा पालक घरी असणे, चांगला समाज, आरोग्य संपन्न परिसर आणि नो स्क्रीन अनुभवायला मिळायलाच पाहिजे. हा त्यांचा अत्यंत महत्त्वाचा बालहक्क म्हणून मांडला गेला पाहिजे.

- रंजना बाजी, लेखिका शिक्षणतज्ज्ञ आणि कार्यकर्त्या आहेत.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी