शहरं
Join us  
Trending Stories
1
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
2
Afghanistan Earthquake : भीषण! भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; ७ जणांचा मृत्यू, १५० जखमी; मजार-ए-शरीफचं नुकसान
3
स्मृती मंधानाचा ट्रॉफी सोबतचा फोटो, हातावर टॅटू..., होणारा नवरा पलाश मुच्छलची पोस्ट व्हायरल
4
व्होडाफोन आयडियाला पुन्हा अच्छे दिन येणार? अमेरिकेन कंपनी गुंतवणूक करण्याच्या तयारीत; पण एका अटीवर
5
३० कोटींच्या उधळपट्टीचा घोटाळा सिद्ध, मुख्यमंत्र्यांचीही परवानगी नाही; रोहित पवार म्हणाले, 'हिवाळी अधिवेशनात सरकारची धिंड काढणार'
6
'हेरा फेरी'मधील बाबूरावच्या भूमिकेला कंटाळले परेश रावल, म्हणाले - "५०० कोटींची..."
7
नोट चोरी बंद झाल्याने वोट चोरीची आठवण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल
8
आणखी एक मोठा बस अपघात, भरधाव ट्रकने बसला समोरून दिली धडक, २० जणांचा मृत्यू
9
मोठा निष्काळजीपणा! सरकारी रुग्णवाहिकेचा टायर पंक्चर, १ तास मिळाली नाही स्टेपनी; रुग्णाचा तडफडून मृत्यू
10
वैकुंठ चतुर्दशी २०२५: श्रीविष्णू-महादेवांचे वरदान, पुण्य लाभेल; ‘असे’ करा व्रत, शुभच घडेल!
11
मुंबईकर अमोल मुजुमदारची शांतीत क्रांती! भारतीय महिला संघाला असं बनवलं वर्ल्ड चॅम्पियन  
12
“पुढील आषाढी एकादशीपर्यंत अजितदादा CM व्हावेत अन् विठ्ठलाची महापूजा करावी”: कुणाची इच्छा?
13
६० दिवस सोन्याहून पिवळे, ५ राशींच्या घरी लक्ष्मी पाणी भरेल; भरपूर भरभराट, लक्षणीय यश-सुख-लाभ!
14
अखेर 'बिग बॉस'मधून प्रणित मोरेची Exit! सलमान खानलाही बसला धक्का, म्हणाला- "तू एलिमिनेट झाला नाहीस, पण..."
15
याच महिन्यात लाँच होणार ई-आधार ॲप; पाहा घरबसल्या काय-काय अपडेट करता येणार?
16
Anil Ambani ED: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
17
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
18
PPF चा जबरदस्त प्लान! पत्नीसोबत गुंतवणूक करा; मिळवा ₹१.३३ कोटींचा टॅक्स फ्री फंड, पाहा कसं?
19
Video: शाहरुख रात्री सर्वांना भेटायला आला, पण चाहत्यांनी केलं असं काही की पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला
20
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !

खेळता-खेळता मुलाने बाहुलीसह स्वतःलाही फास का लावला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2022 12:37 IST

मोबाईल, टीव्ही या सगळ्या आभासी गोष्टी आहेत...

पुणे: मुलांसाठी खरं-खोटं असं काहीच नसतं. त्यांना सगळी दुनिया खरी वाटते कारण ती सत्यात जगत असतात. मोबाईल, टीव्ही या सगळ्या आभासी गोष्टी आहेत. खोटं आहे. हे त्यांना कळत नाही.

त्या एका नातवाची गोष्ट आपण ऐकलेली असेलच. आजोबा, नातू रस्त्यावरून जाताना आजोबांना गाडीचा धक्का लागला आणि ते रस्त्यावर पडले. नातू जोरात हसायला लागला. कारण त्याला वाटलं की कार्टूनमध्ये दाखवतात तसं आजोबा काहीही न होता आपोआप उभे राहतील. जखम होणे, दुखावणे या गोष्टी कार्टूनमध्ये नसतात. मुलाला तेच खरं वाटत होतं. बरीचशी कार्टून बघणारी मुलं बोलताना त्या कार्टूनमधल्या लोकांसारखीच बोलतात, तशीच वागतात.

आपण मुलांना आभासी गोष्टींकडे का ढकलत आहोत? त्यांना खरं आणि खोटं यातलं अंतर माहीत नाही हे आपण कधी समजावून घेणार? मूल कधी समजून घेणार? खूप वेळा असं वाटतं की बऱ्याच पालकांसाठी कामावरच्या एखाद्या प्रोजेक्टसारखाच मूल हा एक प्रोजेक्ट आहे. आपल्याला योग्य वेळ बघायची, मूल होऊ द्यायचं आणि मग प्रत्येक गोष्ट आऊटसोर्स करायची.

त्याला वयाच्या तिसऱ्या, चौथ्या महिन्यापासूनच डे केअरमध्ये ठेवायचं, वेगवेगळ्या क्लासेसमध्ये टाकायचं, आपल्याला वेळ, फुरसत असेल तेव्हा लाड करायचे, आपल्याला सांभाळता येत नाही या अपराधीपणातून त्यांच्यावर विकतची महागडी खेळणी, कपडे, चित्रविचित्र खायच्या वस्तू यांचा भडीमार करायचा. मुलांना एवढ्या लहान वयात मार्केटचे गुलाम बनवून टाकलं आहे.

मूल एक जिवंत, रसरशीत, व्हल्नरेबल व्यक्तिमत्त्व आहे, त्याला फक्त निरपेक्ष प्रेम, शारीरिक, मानसिक सुरक्षितता, स्वातंत्र्य आणि विश्वास याच गोष्टी बहरून येण्यासाठी आवश्यक आहेत, बाकी काही नाही हे आपण कधी समजून घेणार?

मुलांना मोबाईलचं व्यसन लावणारे आईवडील सगळीकडे सर्रास दिसतात. मूल जेवत नाही, मूल कंटाळलं, मूल दुपारी झोपत नाही, मूल त्रास देतं या सगळ्यासाठी आपल्याकडे एकच उपाय आहे, त्याच्यासमोर मोबाईल ठेवणे, त्यावर सतत बदलत असणारी भडक रंगाची चित्रं असणारी गाणी, कार्टून्स, गोष्टी लावणे. मग मुलांना त्याचं व्यसन लागतं. हो, स्क्रीन आणि मोबाईल ही व्यसनं आहेत. मूल जेवत नाही, मूल कंटाळलं, मूल दुपारी झोपत नाही, मूल त्रास देतं यामागे वेगळी काही कारणं असू शकतात याबद्दल आपण विचारच करत नाही.

अशा मोबाईल, स्क्रीनच्या व्यसनातून जर एखादं मूल असं वावगं वागलं तर त्याच्या आईवडिलांनाच पूर्ण दोषी मानायला पाहिजे असं मनापासून वाटतं. हे सगळं जमत नसेल तर लोकांनी मुलांना जन्माला घालूच नये. तो ऑफिसमधला प्रोजेक्ट नव्हे, जो फसला तर गुंडाळून ठेवता येईल किंवा अन्डू करता येईल.

प्रत्येक मुलाला वयाच्या किमान १२-१३ वर्षांपर्यंत तरी आरोग्यदायी बालपण (काळजी घेणारे आईवडील, त्यात एखादा पालक घरी असणे, चांगला समाज, आरोग्य संपन्न परिसर आणि नो स्क्रीन अनुभवायला मिळायलाच पाहिजे. हा त्यांचा अत्यंत महत्त्वाचा बालहक्क म्हणून मांडला गेला पाहिजे.

- रंजना बाजी, लेखिका शिक्षणतज्ज्ञ आणि कार्यकर्त्या आहेत.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी