शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

Eknath Shinde: पुणे महापालिकेच्या मदतीला ठाणे, पनवेलचे कर्मचारी का आले? मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नेमकं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2024 18:14 IST

पुणे महापालिकेच्या मदतीला ठाणे, नवी मुंबई, पनवेल यांचे अधिकारी आणि कर्मचारी आल्याने पुणे महापालिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले होते

पुणे: पुण्यातील पूरग्रस्त भागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज पाहणी केली. त्या भागातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या. सिंहगड  रोडच्या एकतानगरीतही शिंदेंनी भेट दिली. यावेळी त्यांनी पनवेल, ठाणे या भागातून कर्मचारी का पाठवले? याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. पुण्यात सिंहगड रोड भागात एकतानगरीत निर्माण झालेल्या पूर परिस्थितीत पुणे महापालिकेच्या मदतीसाठी पनवेल, ठाणे, नवी मुंबईचे काही अधिकारी आणि कर्मचारी पाठवण्यात आले होते. पूरपरिस्थिती निर्माण झाल्यावर एका महापालिकेवर खूप लोड येतो. चिपळूणला आलेल्या पुराच्या वेळीसुद्धा मी ठाणे, पनवेलच्या अधिकाऱ्यांना पाठवलं होत. त्याप्रमाणे पुण्यात पुराच्या वेळी  ठाणे, नवी मुंबई, पनवेल यांचे अधिकारी आणि कर्मचारी पाठवले असल्याचे एकनाथ शिंदेंनी सांगितले आहे. 

पुण्याच्या सिंहगड रोड भागात आलेल्या पुरामुळे नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यांच्या घरातल्या वस्तू पाण्यात वाहून गेल्या. त्यांचा संसार रस्त्यावर आला. त्यावेळी प्रशासकीय यंत्रणेने तातडीने लोकांना मदतीचा हात देऊन पुरातून बाहेर काढले. आर्मीचे पुणेकरांसाठी धावून आले होते. त्याबरोबरच महापालिका अधिकारी, कर्मचारी, अग्निशमनचे जवान मैदानात उतरले होते. मुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार आर्मी तातडीने धावून आली. तर ठाणे, नवी मुंबई, पनवेल यांचे अधिकारी आणि कर्मचारीही मदतीस आले होते. 

पुणे महापालिकेवर झाली होती टीका 

पुणे महापालिकेच्या मदतीला ठाणे, नवी मुंबई, पनवेल यांचे अधिकारी आणि कर्मचारी आल्याने पुणे महापालिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा पुणे महापालिकेवर टिका केली होती. पुण्यासारख्या मोठ्या शहरात दुसऱ्या महापालिकेचे अधिकारी बोलवावे लागतात हि लाजिरवाणी गोष्ट असल्याचे ते म्हणाले होते. तर विरोधकांनी सुद्धा बाहेरचे कर्मचारी का बोलवावे लागतात?  हा सवाल उपस्थित केला होता.   

रेस्क्यू ऑपरेशन अतिशय सुरळीतपणे झालं

पुण्यात पुर आला तेव्हा मी कंट्रोल रूम मधून पाहत होतो. त्यावेळी जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, एनडीआरएफ, प्रशासन यंत्रणा शिवाय आर्मीच्या अधिकाऱ्यांना देखील सांगितलं कि, तुम्ही तात्काळ या सर्व पूरग्रस्तांच्या मदतीला जा. आपली फायर ब्रिगेडही इथे कार्यरत होती. इतर ठिकणी सर्व झाल्यावर आर्मी जाते. पण आपल्याकडे आर्मी सर्व प्रथम आली आणि आपल्याला मदतीचा हात दिला. रेस्क्यू ऑपरेशन अतिशय सुरळीतपणे झालं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जीव वाचवण्याला प्राधान्य दिले गेले. असे एकनाथ शिंदे यांनी नागरिकांशी संवाद साधल्यानंतर सांगितलं.  

टॅग्स :PuneपुणेEknath Shindeएकनाथ शिंदेChief Ministerमुख्यमंत्रीpanvelपनवेलthaneठाणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाMuncipal Corporationनगर पालिका