शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
3
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
4
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
5
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
6
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
7
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
9
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
10
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
11
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
12
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
13
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
14
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
15
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
16
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
17
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
18
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
19
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
20
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

Eknath Shinde: पुणे महापालिकेच्या मदतीला ठाणे, पनवेलचे कर्मचारी का आले? मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नेमकं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2024 18:14 IST

पुणे महापालिकेच्या मदतीला ठाणे, नवी मुंबई, पनवेल यांचे अधिकारी आणि कर्मचारी आल्याने पुणे महापालिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले होते

पुणे: पुण्यातील पूरग्रस्त भागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज पाहणी केली. त्या भागातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या. सिंहगड  रोडच्या एकतानगरीतही शिंदेंनी भेट दिली. यावेळी त्यांनी पनवेल, ठाणे या भागातून कर्मचारी का पाठवले? याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. पुण्यात सिंहगड रोड भागात एकतानगरीत निर्माण झालेल्या पूर परिस्थितीत पुणे महापालिकेच्या मदतीसाठी पनवेल, ठाणे, नवी मुंबईचे काही अधिकारी आणि कर्मचारी पाठवण्यात आले होते. पूरपरिस्थिती निर्माण झाल्यावर एका महापालिकेवर खूप लोड येतो. चिपळूणला आलेल्या पुराच्या वेळीसुद्धा मी ठाणे, पनवेलच्या अधिकाऱ्यांना पाठवलं होत. त्याप्रमाणे पुण्यात पुराच्या वेळी  ठाणे, नवी मुंबई, पनवेल यांचे अधिकारी आणि कर्मचारी पाठवले असल्याचे एकनाथ शिंदेंनी सांगितले आहे. 

पुण्याच्या सिंहगड रोड भागात आलेल्या पुरामुळे नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यांच्या घरातल्या वस्तू पाण्यात वाहून गेल्या. त्यांचा संसार रस्त्यावर आला. त्यावेळी प्रशासकीय यंत्रणेने तातडीने लोकांना मदतीचा हात देऊन पुरातून बाहेर काढले. आर्मीचे पुणेकरांसाठी धावून आले होते. त्याबरोबरच महापालिका अधिकारी, कर्मचारी, अग्निशमनचे जवान मैदानात उतरले होते. मुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार आर्मी तातडीने धावून आली. तर ठाणे, नवी मुंबई, पनवेल यांचे अधिकारी आणि कर्मचारीही मदतीस आले होते. 

पुणे महापालिकेवर झाली होती टीका 

पुणे महापालिकेच्या मदतीला ठाणे, नवी मुंबई, पनवेल यांचे अधिकारी आणि कर्मचारी आल्याने पुणे महापालिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा पुणे महापालिकेवर टिका केली होती. पुण्यासारख्या मोठ्या शहरात दुसऱ्या महापालिकेचे अधिकारी बोलवावे लागतात हि लाजिरवाणी गोष्ट असल्याचे ते म्हणाले होते. तर विरोधकांनी सुद्धा बाहेरचे कर्मचारी का बोलवावे लागतात?  हा सवाल उपस्थित केला होता.   

रेस्क्यू ऑपरेशन अतिशय सुरळीतपणे झालं

पुण्यात पुर आला तेव्हा मी कंट्रोल रूम मधून पाहत होतो. त्यावेळी जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, एनडीआरएफ, प्रशासन यंत्रणा शिवाय आर्मीच्या अधिकाऱ्यांना देखील सांगितलं कि, तुम्ही तात्काळ या सर्व पूरग्रस्तांच्या मदतीला जा. आपली फायर ब्रिगेडही इथे कार्यरत होती. इतर ठिकणी सर्व झाल्यावर आर्मी जाते. पण आपल्याकडे आर्मी सर्व प्रथम आली आणि आपल्याला मदतीचा हात दिला. रेस्क्यू ऑपरेशन अतिशय सुरळीतपणे झालं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जीव वाचवण्याला प्राधान्य दिले गेले. असे एकनाथ शिंदे यांनी नागरिकांशी संवाद साधल्यानंतर सांगितलं.  

टॅग्स :PuneपुणेEknath Shindeएकनाथ शिंदेChief Ministerमुख्यमंत्रीpanvelपनवेलthaneठाणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाMuncipal Corporationनगर पालिका