शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

MPSC Exam | सी-सॅट पेपर पात्र करण्याबाबत दिरंगाई का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 16:52 IST

सी-सॅट पेपरबाबत देशपातळीवर लोकसेवा आयोगाने घेतलेले निर्णय महत्त्वाचे आहेत

-महेश बढे

सी-सॅटबाबत यूपीएससीने (Union Public Service Commission) अरुण निगवेकर व अरविंद कुमार वर्मा या दोन समित्या स्थापन केल्या होत्या. या समितीने सी-सॅट पेपर ग्रामीण भागातील उमेदवारांसाठी नुकसानकारक आहे, असे सांगितले. या समित्यांनी जे महत्त्वाचे अभिप्राय यूपीएससीला दिले, त्याच निकषांवर २०१५ मध्ये यूपीएससीने सी-सॅट पेपर केवळ पात्रतेसाठी ग्राह्य धरण्याचा निर्णय घेतला. २०१५ पासून आम्ही एमपीएससीकडे (Maharashtra Public Service Commission) सी-सॅट पेपर यूपीएससीच्या धर्तीवर पात्र करण्याची मागणी करीत आहोत. एमपीएससी सर्व गोष्टींमध्ये यूपीएससीचे अनुकरण करीत असते. मग केवळ सी-सॅटबाबत दुजाभाव का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आयोगाच्या या निर्णयामुळे फक्त विशेष घटकातील उमेदवारांना संधी मिळत आहे व बाकीच्या शाखेतील उमेदवारांवर अन्याय झाला असून, त्यांचे अधिकारी होण्याचे स्वप्न संकटात आले आहे. ही स्पर्धा परीक्षा असल्याने येथे स्पर्धा झाली पाहिजे, येथे सर्वांना समानतेची संधी मिळाली पाहिजे; पण सी-सॅट पेपर पात्र न केल्यामुळे विशेष वर्गाला त्याचा आतापर्यंत फायदा झाला आहे.

सी-सॅट पेपरबाबत देशपातळीवर लोकसेवा आयोगाने घेतलेले निर्णय महत्त्वाचे आहेत. यामध्ये मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, ओरिसा, उत्तरांचल, हिमाचल प्रदेश या लोकसेवा आयोगामध्ये सी-सॅट पेपर पात्र करण्यात आला आहे. या सर्व लोकसेवा आयोगांनी सी-सॅट पेपरबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. एमपीएससीने विद्यार्थी हित व परीक्षेतील समान संधींबाबत सकारात्मक विचार करून निर्णय घेणे आवश्यक आहे.

सी-सॅट पेपर इंजिनिअर, मेडिकल आणि मॅनेजमेंट या शाखांतील उमेदवारांसाठी विशेष फायदेशीर असल्याने कृषी, कला, वाणिज्य व इतर शाखांतील उमेदवारांसाठी नुकसानकारक आहे. केवळ या विषयांमुळे अंतिम गुणवत्ता यादीत ठरावीक शाखांतील विद्यार्थी निवडले जात आहेत. त्यामुळे हा पेपर पात्र होणे आवश्यक आहे. हा पेपर पात्र न केल्यास एका विशेष शाखेतीलच पदवीधरांना याचा फायदा होणार आहे.

सी-सॅट पेपर पात्र करण्यात यावा यासाठी आयोगाकडे मागील पाच ते सहा वर्षांपासून आम्ही पाठपुरावा करीत आहोत, तसेच सी-सॅट पेपरबाबत आम्ही राज्यातील उमेदवारांकडून वोटिंग पोल मतदानदेखील घेतले. यात ६० हजारांपेक्षा जास्त उमेदवारांनी सहभाग घेतला व आपले मत नोंदवले. ६७ टक्के उमेदवारांनी हा पेपर पात्र करण्यात यावा या बाजूने मत नोंदवले, तसेच राज्यातील उमेदवारांकडून आयोगाकडे वारंवार निवेदन सादर करण्यात आले आहे. यामुळे आयोगाने विचार करून हा पेपर पात्र करण्याबाबत निर्णय घ्यावा.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडexamपरीक्षाEducationशिक्षण