शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
12
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
13
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
14
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
15
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
16
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
17
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
18
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
19
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

कोण आहेत हे तुषार भोसले? उपमुख्यमंत्री अजित पवारांचा खास शैलीत टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2021 20:30 IST

राज्य सरकारने बसने वारीचा घेतलेला निर्णय तातडीने बदलावा अन्यथा राज्यातून असंख्य वाऱ्या निघतील असा इशारा भाजपा आध्यात्मिक आघाडीचे आचार्य तुषार भोसले यांनी दिला होता.

ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांचा पायी पालखी सोहळा झाला पाहिजे याच मताचे आम्ही आहोत. एव्हाना कोरोना संकट नसतं तर आम्ही देखील या पालख्यांचे स्वागतच केले असते. पण सध्या कोरोना संकट असल्यानेच बसने वारीचा निर्णय घ्यावा लागला, हे स्पष्ट करताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपच्या आध्यात्मिक आघाडी प्रमुख आचार्य तुषार भोसले यांच्यावर देखील आपल्या खास शैलीत निशाणा साधला. 

यंदा पण राज्य सरकारने बसनेच आषाढी वारी सोहळ्याला परवानगी दिली आहे. याबाबतचा आदेश नुकताच जारी करण्यात आला आहे. मात्र पायी वारी सोहळ्याला परवानगी द्या, अन्यथा पायी वारी काढणारच असा इशारा भाजपा आध्यात्मिक आघाडी प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी राज्य सरकारला दिला होता.

याबाबत अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी कोण तुषार भोसले? असा प्रतिसवाल उपस्थित करत टोला लगावला. तसेच कोणत्याही राजकीय पक्षाच्या व्यक्तीने अशाप्रकारे विधान केले तर कितपत गांभीर्याने घ्यायचे ते  वेगळे आहे. आम्ही वारकरी संप्रदायाशी चर्चा करूनच हा निर्णय घेतला आहे. आम्ही देखील पालख्या निघाव्यात याच मताचे आहोत. पण ते सत्तेत नाही म्हणून काहीही बोलत आहे. कुंभमेळा किंवा ज्या ठिकाणी निवडणुका झाल्या त्या ठिकाणी कोरोना वाढला आहे. कोरोनाचं संकट आहे. त्यामुळे वारकऱ्यांना निर्बंधांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे.

काय म्हणाले होते तुषार भोसले...

आषाढी वारी हे जागतिक वैभव आहे. मात्र,राज्यातील आघाडी सरकारने पायी आषाढी वारीला खोडा घातला आहे. राज्य सरकारचा निर्णय वारकऱ्यांना मान्य नाही. राज्यातील आघाडी सरकारने वारकऱ्यांचा अपमान केला आहे. त्यामुळे पायी वारी  व्हावी ही वारकरी संप्रदायाची भावना आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने आपला निर्णय बदलावा अन्यथा राज्यातून असंख्य वाऱ्या निघतील असा इशारा भाजपा आध्यात्मिक आघाडीचे आचार्य तुषार भोसले यांनी दिला होता.

यंदा असा होणार आषाढी वारी सोहळा... 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही आषाढी वारीसाठी परवानगी दिलेल्या पालख्या या बसनेच नेण्यात येणार आहेत. राज्य शासनाने याबाबत आदेश नुकताच जारी केला आहे. या आदेशानुसार गतवर्षीप्रमाणेच वारीचं स्वरुप असणार आहे. प्रातिनिधिक स्वरूपात वाखरी ते पंढरपूर दरम्यानचे दीड किलोमीटर अंतरच पायीवारी होणार आहे.

यंदाची आषाढी वारी पायी चालत करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी वारकरी, देवस्थान आणि महाराज मंडळींकडून करण्यात येत होती. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता महाविकास आघाडी सरकारनं यंदाही एसटी बसने पालख्या पंढरपूरला घेऊन जाण्याची परवानगी दिली आहे. शासनानं वारीसाठी काढलेल्या सुधारित नियमावलीनुसार मानाच्या दहा पालख्यांनाच या वारी प्रस्थान सोहळ्यात सहभागी होता येणार आहे. त्यासाठी यावर्षी देहू आणि आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० व उर्वरीत आठ सोहळयांसाठी प्रत्येकी ५० वारकऱ्यांना सहभागी होता येणार आहे.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारPandharpur Wariपंढरपूर वारीcorona virusकोरोना वायरस बातम्याBJPभाजपा