शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोण आहेत हे तुषार भोसले? उपमुख्यमंत्री अजित पवारांचा खास शैलीत टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2021 20:30 IST

राज्य सरकारने बसने वारीचा घेतलेला निर्णय तातडीने बदलावा अन्यथा राज्यातून असंख्य वाऱ्या निघतील असा इशारा भाजपा आध्यात्मिक आघाडीचे आचार्य तुषार भोसले यांनी दिला होता.

ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांचा पायी पालखी सोहळा झाला पाहिजे याच मताचे आम्ही आहोत. एव्हाना कोरोना संकट नसतं तर आम्ही देखील या पालख्यांचे स्वागतच केले असते. पण सध्या कोरोना संकट असल्यानेच बसने वारीचा निर्णय घ्यावा लागला, हे स्पष्ट करताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपच्या आध्यात्मिक आघाडी प्रमुख आचार्य तुषार भोसले यांच्यावर देखील आपल्या खास शैलीत निशाणा साधला. 

यंदा पण राज्य सरकारने बसनेच आषाढी वारी सोहळ्याला परवानगी दिली आहे. याबाबतचा आदेश नुकताच जारी करण्यात आला आहे. मात्र पायी वारी सोहळ्याला परवानगी द्या, अन्यथा पायी वारी काढणारच असा इशारा भाजपा आध्यात्मिक आघाडी प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी राज्य सरकारला दिला होता.

याबाबत अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी कोण तुषार भोसले? असा प्रतिसवाल उपस्थित करत टोला लगावला. तसेच कोणत्याही राजकीय पक्षाच्या व्यक्तीने अशाप्रकारे विधान केले तर कितपत गांभीर्याने घ्यायचे ते  वेगळे आहे. आम्ही वारकरी संप्रदायाशी चर्चा करूनच हा निर्णय घेतला आहे. आम्ही देखील पालख्या निघाव्यात याच मताचे आहोत. पण ते सत्तेत नाही म्हणून काहीही बोलत आहे. कुंभमेळा किंवा ज्या ठिकाणी निवडणुका झाल्या त्या ठिकाणी कोरोना वाढला आहे. कोरोनाचं संकट आहे. त्यामुळे वारकऱ्यांना निर्बंधांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे.

काय म्हणाले होते तुषार भोसले...

आषाढी वारी हे जागतिक वैभव आहे. मात्र,राज्यातील आघाडी सरकारने पायी आषाढी वारीला खोडा घातला आहे. राज्य सरकारचा निर्णय वारकऱ्यांना मान्य नाही. राज्यातील आघाडी सरकारने वारकऱ्यांचा अपमान केला आहे. त्यामुळे पायी वारी  व्हावी ही वारकरी संप्रदायाची भावना आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने आपला निर्णय बदलावा अन्यथा राज्यातून असंख्य वाऱ्या निघतील असा इशारा भाजपा आध्यात्मिक आघाडीचे आचार्य तुषार भोसले यांनी दिला होता.

यंदा असा होणार आषाढी वारी सोहळा... 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही आषाढी वारीसाठी परवानगी दिलेल्या पालख्या या बसनेच नेण्यात येणार आहेत. राज्य शासनाने याबाबत आदेश नुकताच जारी केला आहे. या आदेशानुसार गतवर्षीप्रमाणेच वारीचं स्वरुप असणार आहे. प्रातिनिधिक स्वरूपात वाखरी ते पंढरपूर दरम्यानचे दीड किलोमीटर अंतरच पायीवारी होणार आहे.

यंदाची आषाढी वारी पायी चालत करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी वारकरी, देवस्थान आणि महाराज मंडळींकडून करण्यात येत होती. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता महाविकास आघाडी सरकारनं यंदाही एसटी बसने पालख्या पंढरपूरला घेऊन जाण्याची परवानगी दिली आहे. शासनानं वारीसाठी काढलेल्या सुधारित नियमावलीनुसार मानाच्या दहा पालख्यांनाच या वारी प्रस्थान सोहळ्यात सहभागी होता येणार आहे. त्यासाठी यावर्षी देहू आणि आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० व उर्वरीत आठ सोहळयांसाठी प्रत्येकी ५० वारकऱ्यांना सहभागी होता येणार आहे.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारPandharpur Wariपंढरपूर वारीcorona virusकोरोना वायरस बातम्याBJPभाजपा