शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

लोकसभेच्या पुण्याच्या जागेसाठी काँग्रेसचा उमेदवार कोण? प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले...

By राजू इनामदार | Updated: January 23, 2024 14:46 IST

यावेळी बोलताना पटोलेंनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीबद्दलही सांगितले...

पुणे : आमचे सरकार होते त्यावेळी विरोधी पक्षनेते असलेले देवेंद्र फडणवीस, ‘आरक्षण देणे हा राज्य सरकारचा अधिकार आहे’ असे म्हणत होते. मग आता त्यांचेच सरकार आहे तर ते निर्णय का घेत नाहीत? असा प्रश्न काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. मराठा ओबीसी यांच्यातील वाद हे आताच्या सरकारचे पाप आहे अशी टीका त्यांनी केली. यावेळी बोलताना पटोलेंनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीबद्दलही सांगितले. पुण्यातील लोकसभेच्या जागेसाठी आम्ही पक्षाच्या शहर शाखेकडून रितसर नावाची यादी मागवली आहे. त्यातून ज्यांच्याकडे निवडून येण्याची गुणवत्ता असेल त्यांचे नाव निश्चित होईल असे पटोले यांनी सांगितले.

पक्षाच्या लोकसभा निवडणूकपूर्व विभागीय बैठकीसाठी म्हणून पुण्यात आलेल्या पटोले यांनी काँग्रेसभवनमध्ये पत्रकारांबरोबर संवाद साधला.  पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, माजी मंत्री बाळासाहेब थोरात तसेच अन्य राज्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. पटोले म्हणाले, राज्यातील सरकारकडे आता पाशवी बहूमत आहे, ते निवडणूकीतून मिळवलेले नाही, कारण त्यांचा लोकशाहीवर विश्वासच नाही. इडीच्या धमक्या देऊन तयार झालेले हे सरकार आहे. राज्य सरकारकडे निर्णय आहे तर मग आरक्षणाचा निर्णय का घेत नाही ते जनतेला सांगा. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर कोणाचीही तुलना होऊच शकत नाही. शिवाजी महाराज रयतेचे राजे होते, रयतेचे राजेच राहणार. त्यामुळे कोणी त्यांच्याबरोबर तुलना करत असेल तर ते अयोग्य आहे.

मराठा मोर्चा घेऊन मुंबईकडे निघालेले जरांगे पाटील मुंबईत पोहचले तर काय होईल याचा विचार सरकार करणार आहे की नाही? त्यांच्या बाबतीत सरकार गोलमटोल भूमिका घेत आहे. राज्यातील जनतेला हे सरकार कसे झाले? कशामुळे झाले? ते काय करत आहेत? हे सगळे कळत नसेल असे त्यांना वाटत असेल तर ते चुकीचे आहे. जनतेला सगळे कळते. त्यामुळे त्यांनी भ्रमात राहू नये असे पटोले म्हणाले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेPuneपुणेcongressकाँग्रेस