शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
2
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
3
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
4
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
5
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
6
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
7
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणूकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
8
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
9
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
10
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
11
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
12
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
13
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
14
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
15
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
16
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
17
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
18
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
19
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
20
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती

लोकसभेच्या पुण्याच्या जागेसाठी काँग्रेसचा उमेदवार कोण? प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले...

By राजू इनामदार | Updated: January 23, 2024 14:46 IST

यावेळी बोलताना पटोलेंनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीबद्दलही सांगितले...

पुणे : आमचे सरकार होते त्यावेळी विरोधी पक्षनेते असलेले देवेंद्र फडणवीस, ‘आरक्षण देणे हा राज्य सरकारचा अधिकार आहे’ असे म्हणत होते. मग आता त्यांचेच सरकार आहे तर ते निर्णय का घेत नाहीत? असा प्रश्न काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. मराठा ओबीसी यांच्यातील वाद हे आताच्या सरकारचे पाप आहे अशी टीका त्यांनी केली. यावेळी बोलताना पटोलेंनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीबद्दलही सांगितले. पुण्यातील लोकसभेच्या जागेसाठी आम्ही पक्षाच्या शहर शाखेकडून रितसर नावाची यादी मागवली आहे. त्यातून ज्यांच्याकडे निवडून येण्याची गुणवत्ता असेल त्यांचे नाव निश्चित होईल असे पटोले यांनी सांगितले.

पक्षाच्या लोकसभा निवडणूकपूर्व विभागीय बैठकीसाठी म्हणून पुण्यात आलेल्या पटोले यांनी काँग्रेसभवनमध्ये पत्रकारांबरोबर संवाद साधला.  पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, माजी मंत्री बाळासाहेब थोरात तसेच अन्य राज्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. पटोले म्हणाले, राज्यातील सरकारकडे आता पाशवी बहूमत आहे, ते निवडणूकीतून मिळवलेले नाही, कारण त्यांचा लोकशाहीवर विश्वासच नाही. इडीच्या धमक्या देऊन तयार झालेले हे सरकार आहे. राज्य सरकारकडे निर्णय आहे तर मग आरक्षणाचा निर्णय का घेत नाही ते जनतेला सांगा. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर कोणाचीही तुलना होऊच शकत नाही. शिवाजी महाराज रयतेचे राजे होते, रयतेचे राजेच राहणार. त्यामुळे कोणी त्यांच्याबरोबर तुलना करत असेल तर ते अयोग्य आहे.

मराठा मोर्चा घेऊन मुंबईकडे निघालेले जरांगे पाटील मुंबईत पोहचले तर काय होईल याचा विचार सरकार करणार आहे की नाही? त्यांच्या बाबतीत सरकार गोलमटोल भूमिका घेत आहे. राज्यातील जनतेला हे सरकार कसे झाले? कशामुळे झाले? ते काय करत आहेत? हे सगळे कळत नसेल असे त्यांना वाटत असेल तर ते चुकीचे आहे. जनतेला सगळे कळते. त्यामुळे त्यांनी भ्रमात राहू नये असे पटोले म्हणाले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेPuneपुणेcongressकाँग्रेस