शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

लोकसभेच्या पुण्याच्या जागेसाठी काँग्रेसचा उमेदवार कोण? प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले...

By राजू इनामदार | Updated: January 23, 2024 14:46 IST

यावेळी बोलताना पटोलेंनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीबद्दलही सांगितले...

पुणे : आमचे सरकार होते त्यावेळी विरोधी पक्षनेते असलेले देवेंद्र फडणवीस, ‘आरक्षण देणे हा राज्य सरकारचा अधिकार आहे’ असे म्हणत होते. मग आता त्यांचेच सरकार आहे तर ते निर्णय का घेत नाहीत? असा प्रश्न काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. मराठा ओबीसी यांच्यातील वाद हे आताच्या सरकारचे पाप आहे अशी टीका त्यांनी केली. यावेळी बोलताना पटोलेंनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीबद्दलही सांगितले. पुण्यातील लोकसभेच्या जागेसाठी आम्ही पक्षाच्या शहर शाखेकडून रितसर नावाची यादी मागवली आहे. त्यातून ज्यांच्याकडे निवडून येण्याची गुणवत्ता असेल त्यांचे नाव निश्चित होईल असे पटोले यांनी सांगितले.

पक्षाच्या लोकसभा निवडणूकपूर्व विभागीय बैठकीसाठी म्हणून पुण्यात आलेल्या पटोले यांनी काँग्रेसभवनमध्ये पत्रकारांबरोबर संवाद साधला.  पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, माजी मंत्री बाळासाहेब थोरात तसेच अन्य राज्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. पटोले म्हणाले, राज्यातील सरकारकडे आता पाशवी बहूमत आहे, ते निवडणूकीतून मिळवलेले नाही, कारण त्यांचा लोकशाहीवर विश्वासच नाही. इडीच्या धमक्या देऊन तयार झालेले हे सरकार आहे. राज्य सरकारकडे निर्णय आहे तर मग आरक्षणाचा निर्णय का घेत नाही ते जनतेला सांगा. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर कोणाचीही तुलना होऊच शकत नाही. शिवाजी महाराज रयतेचे राजे होते, रयतेचे राजेच राहणार. त्यामुळे कोणी त्यांच्याबरोबर तुलना करत असेल तर ते अयोग्य आहे.

मराठा मोर्चा घेऊन मुंबईकडे निघालेले जरांगे पाटील मुंबईत पोहचले तर काय होईल याचा विचार सरकार करणार आहे की नाही? त्यांच्या बाबतीत सरकार गोलमटोल भूमिका घेत आहे. राज्यातील जनतेला हे सरकार कसे झाले? कशामुळे झाले? ते काय करत आहेत? हे सगळे कळत नसेल असे त्यांना वाटत असेल तर ते चुकीचे आहे. जनतेला सगळे कळते. त्यामुळे त्यांनी भ्रमात राहू नये असे पटोले म्हणाले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेPuneपुणेcongressकाँग्रेस