शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

जिन्हे नाज है " हिंद " ; पर वो कहा है ? योगेंद्र यादव यांचा परखड सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 20:25 IST

ज्यांच्या जाहीरनाम्यात शिक्षण आणि रोजगार याला स्थान नाही अशा राज्यकर्त्यांकडून कसली अपेक्षा करणार?

ठळक मुद्देशिक्षण आणि बेरोजगारीचा प्रश्न निर्माण करणाऱ्या सरकारला धरले धारेवररोजगारीच्या संधी कशा उपलब्ध करुन देणार हा मुख्य प्रश्न सरकारसमोर

पुणे : सत्तेचे केंद्रीकरण करुन त्यामागील शक्ती कायम आपल्या पाठीमागे राहायला हवी असा अट्टाहास सत्ताधा-यांचा आहे. मात्र यासगळ्यात देशातील तरुणांच्या भविष्य अंधातरीत आहे याची पर्वा त्यांना नाही. ज्यांच्या जाहीरनाम्यात शिक्षण आणि रोजगार याला स्थान नाही अशा राज्यकर्त्यांकडून कसली अपेक्षा करणार? देशाच्या लोकशाही, सांस्कृतिक विभिन्नता आणि विकास या तीन स्तंभावर दबाव आणला.  विकासाची भाषा बोलणा-यांनी आतापर्यंत शिक्षण आणि रोजगार याविषयी सातत्याने खोटे सांगत आहे. त्यामुळे जिन्हे नाज है वो  हिंद कहा है ? असा प्रश्न स्वराज्य सेनेचे अध्यक्ष योगेंद्र यादव यांनी सरकारला विचारत धारेवर धरले.  देश मेरा वोट मेरा मुद्दा मेरा या अभियनातर्गत सुराज्य सेनेच्या वतीने योगेंद्र यादव यांनी तरुणाईशी संवाद साधला. सामाजिक कार्यक र्ते सुभाष वारे, सुराज्य सेनेचे मार्गदर्शक राजन भिसे आणि समन्वयक अमोल कार्ले उपस्थित होते. यादव म्हणाले, अद्यापही आपल्याकडे युरोपीय देशांतील विद्यापीठांमध्ये सुरु असणा-या अभ्यासक्रमाची  कॉपी केली जाते. सुरुवातीला तो अभ्यासक्रम दिल्ली युनिव्हर्सिटी, जेएनयु त्यानंतर मुंबई मग पुणे विद्यापीठात शिकविला जातो. प्रवाहाबाहेर पडून काही वेगळा विचार करुन नवशिक्षणाची निर्मिती करण्याचे धाडसाचा आपल्याकडे अभाव आहे. त्यात शिक्षणामध्ये वाढत जाणारा हस्तक्षेप देखील धोकादायक आहे. मागील पाच वर्षात जॉब लॉस ग्रोथ झाली आहे. असे म्हणावे लागेल. रोजगार प्राप्तीकरिता समाजात नकारात्मकता वाढीस चालली आहे. एक कोटी युवक दरवर्षी नोकरीच्या शोधात देशभरात फिरताना दिसत आहे. मात्र ज्या देशात रोजगाराचा दर कमी होत आहे तिथे युवकांना रोजगारीच्या संधी कशा उपलब्ध करुन देणार हा मुख्य प्रश्न सरकारसमोर आहे

* न्यायाकरिता राष्ट्रव्यापी युवक आंदोलन छेडावे लागेलयुवकांनी स्वत:ला गुलामी हवी की हक्काची नोकरी हे ठरविण्याची वेळ आली आहे. विद्रोह करुन त्यांना आपल्या हक्कांकरिता भांडावे लागेल. सध्या सांस्कृतिक व वैचारिक संघर्ष सुरु असून त्याविरोधात  बँटिंग कुणीही केली तरी विकेट  घेण्याकरिता आरएसएस तयार आहे. त्यामुळे भविष्यात अस्तित्वाकरिता तरुणाईला संवाद वाढवावा लागेल. रोजगार निर्मितीकरिता दीर्घकालीन संरचनात्मक कृती कार्यक्रम हाती घ्यावा लागेल. त्यासाठी अथक संघर्ष, संरचनात्मक कार्य आणि ज्ञान यावर भर देणे गरजेचे असल्याचे यादव यांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेYogendra Yadavयोगेंद्र यादवGovernmentसरकारEducationशिक्षणLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९