शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

मायबापड्यांची कव्हा कीव येणार..?

By admin | Updated: March 24, 2017 03:50 IST

‘‘आखं आयुष्य सरलं पण आमच्या डोईवरचा हंडा काय खाली उतरला न्हाय. सरकारला आम्हा आदिवासी मायबापड्यांची कव्हा कीव येणार

तळेघर : ‘‘आखं आयुष्य सरलं पण आमच्या डोईवरचा हंडा काय खाली उतरला न्हाय. सरकारला आम्हा आदिवासी मायबापड्यांची कव्हा कीव येणार अन् आमच्या डोईवरचा हंडा कव्हा खाली येणार? मुलकातल्या पोरी आमच्या कोंढवळी देयाचं म्हणलं, तर पोरीचा बा म्हणतो, ‘नको गड्या पकी पाण्याची टिपवण (दुष्काळ) आहे. त्या गावाली माया पोरीचं आखं आयुष्य पाणी भरता-भरता जायाचं.’ आमच्या गावाली पोरी देयाला कोणी धजत नाही....’’ हे केविलवाणे शब्द आहेत आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील हजारो फूट डोंगरदऱ्यांमध्ये खोल असणाऱ्या कोंढवळ येथील आदिवासी महिला इंदूबाई लक्ष्मण कारोटे व रखमाबाई वाजे यांचे. मरणयातना सोसत घोटभर पाण्यासाठी रखरखत्या उन्हात काढलेले हे शब्द...आदिवासी भागात असलेले कोंढवळ हे गाव वन विभागाचा खोडा असल्यामुळे विकासाच्या दृष्टीने व भौतिक सेवासुविधांच्या अभावाने आबाळलेलेच. कोंढवळ हे गाव शंभर घरांचा उंबरा असलेले. जवळपास चारशे ते पाचशेच्या आसपास लोकवस्ती असलेले हे आदिवासी गाव घनदाट अशा भीमाशंकर अभयारण्यात वसलेले असून एकदा का उन्हाळ्याची चाहूल लागली, की या गावातील आदिवासी बांधवांना दुष्काळाशी सामना करावा लागतो. दर वर्षीपेक्षा चालूवर्षी पावसाने लवकरच काढता पाय घेतल्याने या गावातील आदिवासी बांधव व महिलांना मोठ्या प्रमाणात दुष्काळाशी सामना करावा लागत आहे. या गावाला मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्याने चरवीभर पाण्यासाठी तीन ते चार मैल जीव मुठीत घेऊन डोंगरदऱ्याखोऱ्यांमधून खडतर पायपीट महिलांना करावी लागत आहे.आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर खोऱ्यामध्ये हजार ते दीड हजार फूट दरीतमध्ये अत्यंत घनदाट जंगलामध्ये कोंढवळ हे गाव वसलेले असून, कोंढवळ गाव त्याचप्रमाणे शिंदेवाडी, गवांदेवाडी, उंबरवाडी, कृष्णावाडी केवाळवाडी या वाड्यांना दुष्काळाशी सामना करावा लागत आहे. हंडाभर पाण्यासाठी रात्रन् रात्र घालवावी लागत आहे. संपूर्ण गाव व वाड्यावस्त्यांसाठी एक कूपनलिका व त्यामध्येही सध्या पाण्याचा खडाखडाट झाला आहे. हंडाभर पाण्यासाठी ३ ते ४ किमी पायी जाऊन पुन्हा २५० ते ३०० फूट खाली खोल दरीत उतरून व पुन्हा तेवढेच वर चढून चोंढीच्या (झऱ्याच्या) धबधब्यावरून हंडा वर काढताना मरणयातना सहन कराव्या लागतात. या ठिकाणीही एका हंड्यासाठी अहोरात्र काढावे लागतात. आदल्या दिवशी नंबर लावल्यावर दुसऱ्या दिवशीच हंडाभर पाणी मिळते. डोक्यावर पाण्याने भरलेला हंडा व २५० ते ३०० फूट वर चढत येताना या गावातील महिलांची दमछाक होते. हंडा वर चढून घेऊन येताना खाली पाहिले असता डोळे फिरतात. एकदा पाय घसरला, की २५० फूट खाली खोल असणाऱ्या दरीत कोसळण्याशिवाय पर्याय नाही अशी परिस्थिती आहे. त्यामध्येही या चोंढीतील पाणी दूषित झाल्यामुळे या गावातील ग्रामस्थांना साथीच्या रोगांचा सामना करावा लागत आहे. वय वर्षे ६० असणाऱ्या कांताबाई गायकवाड लोकमतशी बोलताना म्हणाल्या, ‘‘एकीकडे घोटभर पाणी प्यायला नाही मिळाल्यावर मरण, तर दुसरीकडे पाणी आणताना दरीत पाय घसरून पडले तर मरण. आम्ही जीवन जगायचं तरी कसं? या वयात आम्हाला पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून कित्येक वर्षे झाली, आम्ही पारतंत्र्यातच हाये.’’आंबेगाव तालुक्याचा पश्चिम आदिवासी भाग हे पावसाचे माहेरघर समजले जाते. पावसाळ्यामध्ये चार महिने या भागात मुसळधार पाऊस पडतो; परंतु दुर्भाग्य असे, की उन्हाळ्यात या भागातील आदिवासी जनतेला पाण्यासाठी सैरवैर भटकावे लागते. रणरणत्या उन्हामध्ये डोक्यावर हंडा व डोंगरदऱ्याकपाऱ्यांतून वणवण करावी लागते. चोंढीची दरी चढताना डोक्यावर हंडा असताना हातामध्ये काठी टेकवल्याशिवाय पुढील पाऊल टाकता येत नाही. कोंढवळ या गावाला वर्षानुवर्षे पाण्याचा दुष्काळ असल्यामुळे या गावामध्ये मुलींचे लग्न करण्यास मुलीचे वडील तयार होत नसल्याची खंत या गावातील महिलांनी व्यक्त केली. (वार्ताहर)