शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

सोलापूर रस्त्याच्या कोंडीचे ग्रहण सुटणार कधी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2018 02:25 IST

उड्डाणपूल, सायकल ट्रॅक, बीआरटी मार्ग : रुंदीकरण होऊनही, हडपसरमध्ये रोज होते तासन्तास कोंडी; अयोग्य फलकाने वाहनचालक रस्ता चुकतात

हडपसर : सोलापूर रस्ता आणि वाहतूककोंडी हे एक समीकरणच बनले आहे. स्वारगेट ते हडपसरदरम्यान सोलापूर रस्त्यावरील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी अनेक शस्त्रक्रिया केल्या तरीसुद्धा वाहतूककोंडीचा आजार काही सापडला नाही, वाहतूककोंडी सुटावी, यासाठी रस्ता रुंदीकरण, उड्डाणपूल, त्यानंतर सायकलट्रॅक आणि पदपथ बनविले, त्यामुळे रस्ता रुंद होण्याऐवजी अरुंद झाला आणि वाहतूककोंडी सुटण्याऐवजी जटिल बनली आहे, असा त्रागा वाहनचालक आणि नागरिकांनी केला आहे.

हडपसर गाडीतळ येथील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी उड्डाणपुलावर उड्डाणपूल, मगरपट्टा चौकात उड्डाणपूल उभारले आहेत. मात्र, या दोन्ही पुलांच्या सुरुवातीला दिशादर्शक फलक नसल्यामुळे नवशिक्या आणि शहरात नव्याने येणाऱ्या वाहनचालकांचा गोंधळ होत आहे. वैभव चित्रमंदिरासमोरील मगरपट्टा चौकातील उड्डाणपुलाच्या सुरुवातीला नामफलक आणि रिफ्लेक्टर नसल्यामुळे दररोज वाहनचालक फसतात. पुलाच्या कठड्याची उंची कमी असून, तीसुद्धा तुटलेली आहे, त्यामुळे दररोज रात्रीच्या वेळी वाहने त्यावरून जात असल्याने अपघात होत आहेत. याबाबत वारंवार तक्रार करूनही महापालिका प्रशसानाने त्याची दुरुस्ती केली नसल्याचे नागरिकांनी सांगितलेसोलापूर रस्त्यावर अवघा दोन किमी बीआरटी मार्ग शिल्लक आहे, त्यासाठी वॉर्डनची नियुक्ती केली आहे. बीआरटी मार्गातून येणाºया वाहनांवर वाहतूक विभागाकडून कारवाई केली जाते. मात्र, तुटपुंज्या बीआरटी मार्गामुळे वाहतूककोंडी सुरळीत होण्याऐवजी विस्कळीत आणि वाहनचालकांना मन:स्ताप होण्यास जास्त मदत होत आहे, अशी तक्रार अनेक वाहनचालकांनी केली आहे. मगरपट्टा चौकातून पुण्याकडे जाण्यासाठी बीआरटी मार्ग शिल्लक नाही. मात्र, मार्ग फलक आजही झळकत आहे. त्यामुळे बाहेरगावाहून येणारे बुचकळ्यात पडत आहेत.बीआरटी असून अडचण नसून खोळंबासोलापूर रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी तुटपुंज्या बीआरटी मार्ग काढून टाकला पाहिजे. हडपसर ते स्वारगेटदरम्यान सकाळी आणि सायंकाळी वाहनांची गर्दी असते. त्यात मगरपट्टा चौक ते फातिमानगर चौकादरम्यान शिल्लक असलेला तुटपुंज्या बीआरटी मार्ग वाहनचालकांना अडथळा ठरत आहे. बसथांबे रस्त्यात असल्याने गर्दीतून बसथांब्यावर कसे जायचे, अशा प्रश्न पीएमपी प्रवाशांना पडला आहे.अस्वच्छ पीएमपीचे थांबे४पीएमपी प्रशासनाने लाखो रुपये खर्च करूनपीएमपी प्रवाशांसाठी बसथांबे उभारले आहेत. मात्र, रामटेकडी पूल, वैदूवाडी चौक या ठिकाणच्या बसथांब्यांची दयनीय अवस्था झाली आहे.रंगरंगोटी नाही, स्वच्छता केली जात नाही. त्यामुळे हे बसथांबे प्रवाशांसाठी बांधले आहेत की बसथांबे बांधल्याचे दाखवण्यासाठी उभारले आहेत, असा प्रश्न पडला आहे.झाडे जळाली कशी...?रस्त्याची शोभा वाढावी आणि प्रवास करताना आल्हाददायक वातावरण असावे, या संकल्पनेतून महापालिका प्रशासनाने लाखो रुपये खर्च वृक्षारोपण केले. मात्र, त्याची निगा राखण्याचे काम करण्याकडे कायम दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. अनेक झाडांची वाढ झाली नाही, तर अनेक झाडे जळालेली दिसत आहेत. मात्र देखभाल-दुरुस्तीसाठी खर्च दाखविला आहे, तो कुठे जातो, याचा जाब नागरिकांनी विचारला आहे.बीआरटीचे धोकादायक बसथांबेगेल्या आठवड्यात बीआरटी मार्गात बस आणि मोटारीचा समोरासमोर अपघात झाला, त्यामध्ये सहा जण जखमी झाले. आतापर्यंतच्या अपघातामध्ये सर्वात जास्त अपघात बीआरटी मार्गात झाले आहेत. बीआरटी मार्गामुळे बसथांबे रस्त्याच्या मध्येच आणून ठेवले आहेत. त्यामुळे अपंग, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना बसथांब्यावर जीव मुठीत धरून जावे लागत आहे. अपघाताचा धोका असूनही प्रशासन अद्याप त्याकडे डोळेझाक का करीत आहे? 

टॅग्स :PuneपुणेSolapurसोलापूरroad transportरस्ते वाहतूक