शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

जेव्हा शिवनेरी गावात दहशतवादी लपतात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 15:56 IST

दहशतवादांचा बिमोड करण्यासाठी भारत आणि श्रीलंका या दोन्ही देशांच्या लष्कराचा युद्धसराव गेल्या १३ दिवसांपासून पुण्यात सुरू आहे. औंध येथील लष्कराच्या लळावर काल्पनिक उभारलेल्या गावात हे प्रात्यक्षिक करण्यात आले.

ठळक मुद्देअशोक चंद्रा, अजिथ पाल्लेवाल यांनी घेतला प्रात्यक्षिकांचा आढावाभारत, श्रीलंका या दोन्ही देशांचे १२० जवान यात सहभागीप्रशिक्षणादरम्यान दोन्ही देशांनी माहितीचे आदान प्रदान करत केली कारवाई

पुणे : पुण्याजवळील शिवनेरी गावात दहशतवादी लपल्याची माहिती लष्कराला मिळते. या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी कोव्हर्ट आॅपरेशन सुरू होते. माहिती  प्रशिक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत, दहशतवाद्यांच्या ठिकाणाचा शोध घेतला जातो. या माहितीच्या आधारे सुरू होते लष्कराची कारवाई. गोळीबार, बॉम्बवर्षाव.. हेलीकॉप्टरमधून उतरणारे चपळ जवान दहशदवाद्यांच्या तळाकडे जात त्यांना घेराव घालतात. त्यांचा खात्मा करतात आणि संपूर्ण गावाला त्यांच्या तावडीतून मुक्त करतात. हा प्रसंग आहे पुण्यातील औंध मिलीटरी तळातील भारत आणि श्रीलंका यांच्या पाचव्या  मित्र शक्ती युद्ध सरावाचा. संपूर्ण जग आज दहशतवादी कारवायांनी ग्रासले आहे. दहशतवादांचा बिमोड करण्यासाठी दोन्ही देशांच्या लष्कराचा युद्धसराव गेल्या १३ दिवसांपासून पुण्यात सुरू आहे. आज प्रशिक्षणाच्या शेवटच्या दिवशी या प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. औंध येथील लष्कराच्या लळावर काल्पनिक उभारलेल्या गावात हे प्रात्यक्षिक करण्यात आले. भारतीय लष्कराच्या महार रेजिमेन्टचे जवान आणि श्रीलंका लष्कराच्या सिंह रेजीमेंन्टच्या जवानांनी ही संयुक्त कारवाई केली. नियोजन, माहिती आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालत दहशतवाद्यांचा ठिकाणे जवानांनी शोधली. त्यांच्या लपण्याच्या ठिकाणी छुपे खंदक बनवून त्यांच्यावर सलग वॉच ठेऊन ही कारवाई करण्यात आली. भारतीय लष्कराचे ब्रिगेडियर अशोक चंद्रा तर श्रीलंकेच्या लष्कराचे ब्रिगेडियर अजिथ पाल्लेवाल यांनी या प्रात्यक्षिकांचा आढावा घेतला. दोन्ही देशांचे १२० जवान यात सहभागी झाले होते. यावेळी अशोक ब्रिगेडियर चंद्रा म्हणाले, दहशतवाद ही संपूर्ण देशांसमोरील प्रमुख समस्या आहे. जगातील अनेक देशांसमोर ही मोठी समस्या आहे. १३ दिवस चाललेल्या या प्रात्यक्षिकांचा दोन्ही देशांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी या प्रशिक्षणादरम्यान दोन्ही देशांनी माहितीचे आदान प्रदान करत ही कारवाई केली.  या प्रकारचे युद्धाभ्यास भविष्यातही दोन्ही देशादरम्यान होईल. ब्रिगेडियर अजिथ पल्लेवाल म्हणाले, जागगिक दहशतवादाला तोंड देण्यासाठी या प्रकारचे प्रात्यक्षिके महत्त्वाची आहे. दोन्ही इंटेलीजन्स आणि आॅपरेशन यामुळे जवानांना विविध प्रसंगाना सामोरे जाणे शक्य होणार आहे. यामुळे दोन्ही देशातील विश्वास वाढीबरोबर जागतिक शांतता टिकवण्यासाठी मदत होणार आहे.

हेलीकॉप्टरच्या मदतीने थेट युद्धभूमीवरदहशतवाद्यांची माहितीमिळताच कमी वेळात त्यांच्या ठिकाणांचा वेध घेण्यासाठी हेलिकॉप्टरच्या मदतीने जवान कसे जातात याच बरोबर जखमींना युद्धभूमीतून बाहेर कसे काढतात याचे प्रात्यक्षिक जवानांनी दाखवले.

छुप्या खंदकातून टेहळणीदहशतवाद्यांची माहिती मिळल्यानंतर त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी तसेच त्यांची अधिकाअधिक माहिती मिळवण्यासाठी छुपे खंदक तयार करण्यात आले होते. जवळपास ७२ तास जवान या खंदकात राहू शकतात. या खंदकात खान्यापिण्याच्या सामानाबरोबरच वायफाय सेवा तसेच  रेडीओ फ्रिक्वेन्सीद्वारे अधिका-यांशी संवाद सांधण्याची यंत्रणाही जवानांबरोबर असते. 

२४० जवानांचा सहभागदहशतवादी विरोधाच्या या संयुक्त कारवाईत दोन्ही देशांचे मिंळून २४० जवानांनी या सरावात सहभाग घेतला. 

भविष्यात बटालीयन स्तरावर होणार सरावदोन्ही देशात आतापर्यंत चार वेळा युद्ध सराव झाले आहेत. आतापर्यंत ग्रुप तसेच कंपनीस्तरापर्यंत हे सराव झाले आहेत. भविष्यात दोन्ही देशांच्या लष्कराच्या बटालीयन स्तरावर हे सराव होऊ शकतात.

टॅग्स :SoldierसैनिकPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड