शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

देशाच्या पंतप्रधानांबद्दल बोलताना काय बोलतो त्याचा संयम ठेवला पाहिजे; पाटलांचा राऊतांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 11:40 IST

संजय राऊत यांची बोलण्याची पात्रता खाली चालली आहे

पुणे : गुजरात विद्यापीठाने उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन पीएम मोदींच्या पदवीची माहिती आरटीआय कायद्यांतर्गत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना देण्याचा आदेश रद्द करण्याची विनंती केली होती. एप्रिल 2016 मध्ये तत्कालीन सीआयसी एम श्रीधर आचार्युलू यांनी दिल्ली विद्यापीठ आणि गुजरात विद्यापीठाला सीएम केजरीवाल यांना पीएम मोदींना दिलेल्या पदवीबद्दल माहिती देण्याचे निर्देश दिले होते. तीन महिन्यांनंतर विद्यापीठाने या आदेशाविरोधात याचिका दाखल केली तेव्हा गुजरात उच्च न्यायालयाने सीआयसीच्या आदेशाला स्थगिती दिली.

गुजरात उच्च न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या पदवीची मागणी करणाऱ्या प्रकरणात शुक्रवारी निकाल दिला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीची माहिती देण्याचे गुजरात विद्यानव्या संसद भवनाच्या मुख्य द्वारावर पीठाला निर्देश देणारा केंद्रीय माहिती आयोगाचा (सीआयसी) आदेश उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. याशिवाय, न्यायालयाने केजरीवाल यांना 25 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. याच दरम्यान आता संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे. 

"मोदींची ही डिग्री बोगस असल्याचं लोक म्हणतात. पण मी म्हणतो- ‘Entire Political Science’ या विषयावरील ही ऐतिहासिक आणि क्रांतिकारी डिग्री आहे" असं म्हणत निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. तसेच ट्विटमध्ये एका डिग्रीचा फोटो शेअर केला आहे. मोदींची डिग्री फ्रेम करून संसद भवनात लावा असंही म्हटलं आहे. डिग्रीचा हा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. त्यावरून चंद्रकांत पाटलांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत करता करता इतक्या बोलण्याची पात्रता खाली चालली आहे. आपण कोणाबद्दल बोलावं कळत नाही. देशाचे पंतप्रधान ज्यांना जगात उच्च स्थान मिळालं आहे. त्यांच्याबद्दल आपण काय बोललो पाहिजे त्याचा संयम ठेवला पाहिजे. त्यामुळे देशात नकारात्मक भावना तयार होत असल्याचे पाटील यावेळी म्हणाले आहेत. 

गिरीश बापट यांच्या अस्थी दर्शनासाठी पाटील पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. गिरीश बापट यांच्या अस्थींचा कलश ठेवला होता. खूप लांबून लोकं येत आहेत. आज हा कलश गौरव वाराणसीला घेऊन चालला आहे. या अस्थिंच दर्शन घेण्यासाठी मी आलो होतो. मी पुन्हा एकदा त्यांना विनम्र अभिवादन करतो. गिरीश जी यांचा स्वभाव होता की सगळ्या पक्षांचा आदर करायचा. त्यामुळे सगळ्यांना आपला घरातील माणूस गेला आहे असं वाटतं असल्याची भावना पाटील यांनी व्यक्त केली आहे.  

टॅग्स :Puneपुणेchandrakant patilचंद्रकांत पाटीलSanjay Rautसंजय राऊतPoliticsराजकारणNarendra Modiनरेंद्र मोदी