शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

‘गावाकडं जाऊन काय ढेकळं खायची काय; जनावरांपुढं आडवं पडावं का आम्हीच...?’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2023 12:30 IST

कारखाना सुरू होताना आठ ते दहा हजारांच्या आसपास ऊसतोडणी कामगार कारखान्यांवर येत असतात...

- महेश जगताप

सोमेश्वरनगर (पुणे) : जिह्यातील ऊसतोड हंगाम आता संपला असून, बहुतांश कारखान्यांनी चिमण्या बंद केल्या आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी सर्वच कारखाने एक ते सव्वा महिने आधी बंद झाले आहेत. ऊसउत्पादक शेतकरी व कारखानदार निवांत झाले असले, तरी साखर उद्योगातील तिसरा घटक असलेल्या ऊसतोडणी कामगारांच्या जीवाला मात्र घोर लागला आहे. कारखाने बंद होऊन तीन दिवस झाले तरी ऊसतोडणी मजुरांचा पाय काही घराकडे निघेना. ऊसतोडणी मजुरांना गावाकडे कधी जाणार, असा प्रश्न विचारला असता, ‘गावाकडं जाऊन काय ढेकळं खायची काय; जनावरांपुढं आडवं पडावं का आम्हीच..?’ असे उत्तर बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील रोहोतवाडीच्या सुनीता नागरगोजे व चंद्रकांत नागरगोजे यांनी दिले.

सोमेश्वर कारखाना बंद होऊन आता तीन दिवस उलटत आले; पण ऊसतोडणी कामगार काही गावाकडे जायचं नाव घेत नसल्याचे दिसत आहे. जे काही जात आहेत ते उगाच जायचं म्हणून जड अंत:करणाने जात आहेत. कारण यावर्षी जिल्ह्यातील साखर कारखान्यांसह सोमेश्वर कारखाना देखील एक महिना लवकर बंद झाला होता. त्यामुळे आता गावाकडे जाऊन काय करणार? असा सवाल पिठीनायगावचे ऊसतोडणी कामगार सीताराम खिलारे यांनी सांगितले.

दरवर्षी सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ ऊस हंगाम चालतो. त्यामुळे ऊसतोडणी कामगारांच्या हाताला काम मिळते, तर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मिटतो; पण आता पावसाळा सुरू होण्यास अजून अडीच महिने कालावधी आहे. त्यामुळे गावाला पाणी, जनावरांना विकत चारा घ्यावा लागतो. त्यासाठी आता मुकादमाकडून पुन्हा उचल घेयची... आणि मुलांच्या शाळा, लग्न यांचा खर्च करायचा. आमचं कर्ज कधीच फिटत नाही. पाहिलेतेच एक लाख अंगावर असताना आता अजून एक लाख कर्ज करून ठेवायचं... तर दुष्काळ असल्याने हाताला काम मिळत नाही.

दुसरीकडे मजुरीला जाऊन पोट भरायचं... चांगली बैलं विकून जमत नाही... पुन्हा बैल मिळत नाहीत. त्यामुळे विकत चारा घेऊन का होईना बैलांना सांभाळावे लागते. तसं तर गावाकडे जाऊच वाटत नाही... इथं राहून कमीत कमी हाताला काम आणि जनावरांना मुबलक पाणी आणि चारा तरी मिळतो, असे बीड जिल्ह्यातील रोहोतवाडीच्या सुनीता नागरगोजे यांनी सांगितले. सोमेश्वर कारखान्याने चालू गळीत हंगामात पाच हजार प्रतिदिन गाळप क्षमता असलेल्या साखर कारखान्याचे विस्तारीकरण करीत तो साडेसात हजार प्रतिदिन गाळप क्षमतेचा केला. त्यामुळे गेल्या हंगामात एवढाच ऊस गाळप करण्यासाठी ‘सोमेश्वर’ला एप्रिलअखेर आला होता.

यावर्षी गाळप क्षमता वाढविल्याने तेवढाच ऊस गाळप करण्यासाठी कारखाना २७ मार्चलाच बंद करावा लागला. चालू हंगामात ‘सोमेश्वर’ने ११.५० च्या साखर उताऱ्याने १२ लाख ५६ हजार ७६८ मेट्रिक टन उसाचे गाळप करीत १४ लाख ६५ हजार ७५० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे.

आर्थिक गणिते कोलमडली

ऊसतोडणी कामगार हा मुकादमाकडून उचल घेताना सहा महिने ऊस हंगाम चालेल आणि घेतलेली सर्व उचल फुटेल या हिशेबाने घेत असतो; मात्र गळीत हंगाम लवकर बंद झाल्याने अनेक ऊसतोडणी कामगारांच्या उचली फिटल्याच नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे उचलीचे वाटप करणारे मुकादम हे आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

परिसरात शुकशुकाट होणार

कारखाना सुरू होताना आठ ते दहा हजारांच्या आसपास ऊसतोडणी कामगार कारखान्यांवर येत असतात. त्यामुळे परिसरातील हॉटेल, किराणा, केशकर्तनालाय, दवाखाने, मेडिकल व्यावसायिकांना चांगले दिवस येतात. या ठिकाणावरून ऊसतोडणी कामगार निघून गेले की, उद्योग, व्यावसायिकांना देखील आर्थिक फटका बसत असतो.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSugar factoryसाखर कारखाने