शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

‘गावाकडं जाऊन काय ढेकळं खायची काय; जनावरांपुढं आडवं पडावं का आम्हीच...?’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2023 12:30 IST

कारखाना सुरू होताना आठ ते दहा हजारांच्या आसपास ऊसतोडणी कामगार कारखान्यांवर येत असतात...

- महेश जगताप

सोमेश्वरनगर (पुणे) : जिह्यातील ऊसतोड हंगाम आता संपला असून, बहुतांश कारखान्यांनी चिमण्या बंद केल्या आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी सर्वच कारखाने एक ते सव्वा महिने आधी बंद झाले आहेत. ऊसउत्पादक शेतकरी व कारखानदार निवांत झाले असले, तरी साखर उद्योगातील तिसरा घटक असलेल्या ऊसतोडणी कामगारांच्या जीवाला मात्र घोर लागला आहे. कारखाने बंद होऊन तीन दिवस झाले तरी ऊसतोडणी मजुरांचा पाय काही घराकडे निघेना. ऊसतोडणी मजुरांना गावाकडे कधी जाणार, असा प्रश्न विचारला असता, ‘गावाकडं जाऊन काय ढेकळं खायची काय; जनावरांपुढं आडवं पडावं का आम्हीच..?’ असे उत्तर बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील रोहोतवाडीच्या सुनीता नागरगोजे व चंद्रकांत नागरगोजे यांनी दिले.

सोमेश्वर कारखाना बंद होऊन आता तीन दिवस उलटत आले; पण ऊसतोडणी कामगार काही गावाकडे जायचं नाव घेत नसल्याचे दिसत आहे. जे काही जात आहेत ते उगाच जायचं म्हणून जड अंत:करणाने जात आहेत. कारण यावर्षी जिल्ह्यातील साखर कारखान्यांसह सोमेश्वर कारखाना देखील एक महिना लवकर बंद झाला होता. त्यामुळे आता गावाकडे जाऊन काय करणार? असा सवाल पिठीनायगावचे ऊसतोडणी कामगार सीताराम खिलारे यांनी सांगितले.

दरवर्षी सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ ऊस हंगाम चालतो. त्यामुळे ऊसतोडणी कामगारांच्या हाताला काम मिळते, तर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मिटतो; पण आता पावसाळा सुरू होण्यास अजून अडीच महिने कालावधी आहे. त्यामुळे गावाला पाणी, जनावरांना विकत चारा घ्यावा लागतो. त्यासाठी आता मुकादमाकडून पुन्हा उचल घेयची... आणि मुलांच्या शाळा, लग्न यांचा खर्च करायचा. आमचं कर्ज कधीच फिटत नाही. पाहिलेतेच एक लाख अंगावर असताना आता अजून एक लाख कर्ज करून ठेवायचं... तर दुष्काळ असल्याने हाताला काम मिळत नाही.

दुसरीकडे मजुरीला जाऊन पोट भरायचं... चांगली बैलं विकून जमत नाही... पुन्हा बैल मिळत नाहीत. त्यामुळे विकत चारा घेऊन का होईना बैलांना सांभाळावे लागते. तसं तर गावाकडे जाऊच वाटत नाही... इथं राहून कमीत कमी हाताला काम आणि जनावरांना मुबलक पाणी आणि चारा तरी मिळतो, असे बीड जिल्ह्यातील रोहोतवाडीच्या सुनीता नागरगोजे यांनी सांगितले. सोमेश्वर कारखान्याने चालू गळीत हंगामात पाच हजार प्रतिदिन गाळप क्षमता असलेल्या साखर कारखान्याचे विस्तारीकरण करीत तो साडेसात हजार प्रतिदिन गाळप क्षमतेचा केला. त्यामुळे गेल्या हंगामात एवढाच ऊस गाळप करण्यासाठी ‘सोमेश्वर’ला एप्रिलअखेर आला होता.

यावर्षी गाळप क्षमता वाढविल्याने तेवढाच ऊस गाळप करण्यासाठी कारखाना २७ मार्चलाच बंद करावा लागला. चालू हंगामात ‘सोमेश्वर’ने ११.५० च्या साखर उताऱ्याने १२ लाख ५६ हजार ७६८ मेट्रिक टन उसाचे गाळप करीत १४ लाख ६५ हजार ७५० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे.

आर्थिक गणिते कोलमडली

ऊसतोडणी कामगार हा मुकादमाकडून उचल घेताना सहा महिने ऊस हंगाम चालेल आणि घेतलेली सर्व उचल फुटेल या हिशेबाने घेत असतो; मात्र गळीत हंगाम लवकर बंद झाल्याने अनेक ऊसतोडणी कामगारांच्या उचली फिटल्याच नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे उचलीचे वाटप करणारे मुकादम हे आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

परिसरात शुकशुकाट होणार

कारखाना सुरू होताना आठ ते दहा हजारांच्या आसपास ऊसतोडणी कामगार कारखान्यांवर येत असतात. त्यामुळे परिसरातील हॉटेल, किराणा, केशकर्तनालाय, दवाखाने, मेडिकल व्यावसायिकांना चांगले दिवस येतात. या ठिकाणावरून ऊसतोडणी कामगार निघून गेले की, उद्योग, व्यावसायिकांना देखील आर्थिक फटका बसत असतो.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSugar factoryसाखर कारखाने